शहरं
Join us  
Trending Stories
1
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं?
2
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 
3
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
4
"दिल्लीत ठाकरेंचा मान काय ते लक्षात आलं, आमच्यासोबत असताना ते..."; CM देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंवर बाण
5
'माझे मित्र पुतिन...', ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान PM मोदींनी रशियन राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला; भारत भेटीचे आमंत्रण दिले
6
"...नाहीतर भारताने अमेरिकेला गुड बाय म्हणावं"; शशी थरूर यांचा मोदी सरकारला मोलाचा सल्ला
7
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
8
Nashik: पती-पत्नीने एक्स्प्रेस ट्रेनसमोर उडी मारत आयुष्य संपवले, लग्नाला झाली होती ११ वर्ष
9
Donald Trump Tariff News : ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात भारत 'अ‍ॅक्शन'मोडवर ! अमेरिकेकडून शस्त्र खरेदी थांबवली, राजनाथ सिंह यांचा USA दौराही पुढे ढकलला
10
'महादेवी हत्तीणीवर उपचार करण्यासाठी महाराष्ट्रात एकही केंद्र नाही', 'पेटा'ने जाहीर केली भूमिका
11
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
12
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
13
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
14
DPL 2025 च्या नव्या हंगामात प्रितीच्या 'हिरो'नं केली हवा! १९८ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या १११ धावा
15
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
16
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
17
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
18
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
19
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
20
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी

खरमाटेंसह कर्मचाऱ्यांवर फौजदारी करा

By admin | Updated: July 11, 2017 00:47 IST

खरमाटेंसह कर्मचाऱ्यांवर फौजदारी करा

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : करवीर विधानसभा मतदारसंघातील शिंगणापूर, पाडळी खुर्द, बालिंगा, हसूर दुमाला, म्हालसवडे येथे बोगस मतदार नोंदणी करण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. यामध्ये करवीरचे तत्कालीन तहसीलदार योगेश खरमाटेंसह ग्रामसेवक व कर्मचारी जबाबदार आहेत. त्यामुळे त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, तसेच मृत मतदारांची नावे यादीतून काढावीत, अशी मागणी सोमवारी आमदार चंद्रदीप नरके यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.निवडणूक विभागातर्फे जिल्ह्यात सध्या नवीन मतदार नोंदणी प्रक्रिया सुरू आहे. यामध्ये करवीर मतदारसंघातील काही गावांमध्ये बोगस मतदार नोंदणी झाल्याचे आढळून आले आहे. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये बालिंगा येथे ५८० बोगस मतदार आढळून आले. या मतदारांकडे स्थानिक ग्रामस्थांनी योग्य कागदपत्रांसाठी तगादा लावल्यावर काहीजणांनी मतदान न करता पळ काढला होता. या बोगस मतदारांच्या नावांची यादी निवडणूक विभागाकडे देऊनही आतापर्यंत त्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही. येथील ग्रामसेवकांनी बोगस दाखला व बोगस ओळखपत्रे देऊन नोंदणी करण्यास हातभार लावला होता, असे नरके म्हणाले.म्हालसवडेतील काही मतदारांची नावे ही हसूर दुमालाच्या मतदारयादीत नोंद करण्यात आली आहेत, तर हसूरमधील नावे ही म्हालसवडे गावात नोंद केली आहेत. याबाबत संबंधित ग्रामसेवक व कर्मचाऱ्यांची चौकशी होऊन निलंबनाची कारवाई करण्यात आली. असे असूनही त्यांना पुन्हा कामावर घेण्यात आले. खरमाटे यांच्यासह संबंधित ग्रामसेवक व कर्मचारी यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करून खऱ्या सूत्रधाराला समोर आणा, अशी मागणी नरके यांनी केली. यावर योग्य ती कार्यवाही केली जाईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सर्जेराव पाटील, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) रवींद्र खाडे, दादासो लाड, किशोर पाटील, संजय पाटील, विलास पाटील, आनंदा पाटील, जिल्हा परिषद सदस्या मनीषा कुरणे, आदी उपस्थित होते.शिंगणापूरमध्ये डाटा आॅपरेटर्सचा प्रताप शिंगणापूर गावात तेथील मतदार नोंदणीसाठी नेमलेल्या डाटा आॅपरेटर्सनीच मनमानी पद्धतीने बोगस नावे घुसडली. नक्कीच याच्यामागे कोणी तरी आहे? याचा शोध प्रशासनाने घ्यावा, अशी मागणी आ. नरके यांनी केली.चावडी वाचन करून नावे कमी कराबोगस झालेली मतदार नोंदणीतील नावे जिल्हा प्रशासनाने चावडी वाचन करून कमी करावीत, असे आमदार नरके यांनी सांगितले.