शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
5
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
6
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
7
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
8
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
9
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
10
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
11
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
12
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
13
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
14
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
15
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
16
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
17
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
18
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
19
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
20
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
Daily Top 2Weekly Top 5

गैरव्यवहारप्रकरणी पाचजणांवर फौजदारी होणार

By admin | Updated: December 29, 2015 00:23 IST

आमजाई व्हरवडे पेयजल प्रकरण : सीईओंचा कारवाईचा आदेश; काम पूर्ण न करता जादा रक्कम देय

कोल्हापूर : राधानगरी तालुक्यातील आमजाई व्हरवडे येथील राष्ट्रीय पेयजल अंतर्गत झालेल्या नळपाणी पुरवठा योजनेतील कामात अनियमितता, गैरव्यवहार, शासनाची फसवणूक करणे, आदी ठपका ठेवत ठेकेदारासह पाचजणांवर फौजदारी करण्याचा आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश सुभेदार यांनी काढला.आदेशानुसार फौजदारी गुन्हा दाखल करण्यासाठी सोमवारी राधानगरी पाणीपुरवठा विभागाचे कर्मचारी पोलीस ठाण्यात गेले होते. दरम्यान, काही तांत्रिक माहितीच्या कागदपत्रांची पूर्तता करून फौजदारी दाखल केली जाईल, असे राधानगरी पोलिसांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. ग्रामीण पाणी व स्वच्छता समितीचे अध्यक्ष अशोक दिनकर पाटील, सचिव अरुण शंकर पाटील, ग्रामपंचायत शिपाई साताप्पा पाटील, संजय शंकर जाधव (सर्व, रा. आमजाई व्हरवडे), ठेकेदार दिलीप शहाजीराव पाटील (रा. ठाणे, ता. पन्हाळा) यांच्यावर फौजदारी करण्याचा आदेश देण्यात आला आहे. पेयजल योजना २०११-१२ मध्ये मंजूर झाली. त्यात गैरव्यवहार आणि अनियमितता झाल्याची तक्रार पेयजल कमिटीचे सदस्य अशोक सुतार, केरबा वरुटे, मारुती रणदिवे यांच्यासह १३ सदस्यांनी गटविकास अधिकारी यांच्याकडे ६ डिसेंबर २०१४ रोजी केली होती. याबाबत पाठपुरावा केल्यामुळे या तक्रारीची जिल्हा परिषद प्रशासनाने दखल घेतली. निविदा प्रक्रिया विहित पद्धतीने केलेली नाही, सुरक्षा ठेव जमा करून घेतलेली नाही, काही दिवसांनंतर सुरक्षा ठेव दोन हप्त्यांमध्ये रोखीने जमा करून घेतली आहे; पण ती किर्दीस जमा दर्शविलेली नाही. ग्रामसभेची खर्चास मंजुरी घेतलेली नाही. मक्तेदाराव्यतिरिक्त यातील पैसे संजय जाधव या त्रयस्ताच्या नावे काढले, ग्रामपंचायतीचा शिपाई साताप्पा पाटीलच्या नावे ५६ हजार ४४ रुपयांचा धनादेश काढला, पाणीपुरवठा समितीचे अध्यक्ष, सचिव यांनी ठेकेदार पाटील यांना २५ लाख २७ हजार ४९३ रुपये देयक असताना २९ लाख १९ हजार ९९२ रुपये दिले. तसेच काम पूर्ण नसताना जादा ४ लाख ४२ हजार ९९९ इतकी रक्कम काढली, कोऱ्या धनादेशावर स्वाक्षरी करून ठेवणे, रोज कीर्द न लिहिणे, असे आरोप या पाचजणांवर आहेत. अनियमितता स्पष्ट झाल्यानंतर पाचही जणांना फौजदारी का करू नये, अशी नोटीस दिली होती. मात्र, समाधानकारक खुलासा न आल्याने आर्थिक व प्रशासकीय अनियमितता, कंत्राटदारावर मेहेरबानी तसेच, संगनमत करणे, फसवणूक करणे, विश्वासभंग करणे, यामुळे सीईओ सुभेदार यांनी या पाचजणांवर फौजदारी करण्याचा आदेश दिला आहे. शासकीय निधीचा अपहारसचिव अरुण पाटील यांनी धनादेशाद्वारे ६७ हजार ६६७, ५५ हजार ७३१, १ लाख २५ हजार ३९८ इतक्या रकमांचा धनादेश स्वत:च्या नावे काढूून शासकीय निधीचा अपहार केला आहे, असा आरोप आहे. दरम्यान, या प्रकरणात तत्कालीन सरपंच, ग्रामसेवक यांचाही ‘हात’ असल्याची तक्रार तक्रारदारांची आहे. त्यामुळे जिल्हा परिषद ग्रामपंचायत प्रशासन त्या कालावधीतील सरपंच, ग्रामसेवक यांचीही स्वतंत्र चौकशी करीत आहे. यामध्ये ते दोषी असल्याचे पुढे आल्यानंतर कारवाई होणार आहे.