शहरं
Join us  
Trending Stories
1
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
2
अदानींचा मोठा निर्णय; एका आठवड्यापूर्वी केलेला ड्रॅगनपास करार केला रद्द, चिनी कंपनीला दणका
3
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा
4
IPL 2025: लखनौच्या अडचणीत वाढ, दुखापतीमुळं मयांक यादव आयपीएलमधून बाहेर!
5
Shiv Sena: पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील संशयितांची माहिती देणाऱ्याला १० लाख रुपयांचे बक्षीस
6
भारताचा तुर्कीला दणका, विमानतळांवर सेवा देणाऱ्या सेलेबी कंपनीची सुरक्षा मंजुरी केली रद्द!
7
बिहार दौऱ्यात राहुल गांधी यांच्याविरोधात दोन गुन्हे दाखल, पोलिसांनी शंभराहून अधिक जणांना केलं आरोपी
8
India Pakistan Ceasefire: "भारत-पाकिस्तान यांच्यात १८ मेपर्यंत शस्त्रसंधी"; पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री डार यांचे विधान
9
आधी ट्रम्प यांच्यावर भडकली, नंतर पोस्ट डिलीट; कंगना म्हणाली, "जेपी नड्डांनी डिलीट करायला सांगितली"
10
ED Raid: 23 कोटींचं सोनं, 8 कोटी रोख; वसई विरार मनपाचे नगररचना उपसंचालक रेड्डीकडे सापडली कोट्यवधींची माया
11
Donald Trump : "मी असं म्हणत नाही की..."; भारत-पाकिस्तान युद्धविरामावर मोठे दावे करणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांची पलटी
12
सुटी रद्द झाल्याने कामावर परतणाऱ्या मेजरवर काळाचा घाला; डोळ्यादेखत पत्नीचा मृत्यू, लेक गंभीर जखमी
13
'पाकिस्तानशी फक्त दहशतवाद अन् PoK वर चर्चा होईल; तिसऱ्याचा हस्तक्षेप खपवून घेणार नाही'
14
'गदर'मधला दरम्यान सिंग आठवतोय का? एका आजारामुळे झालं होत्याचं नव्हतं, अभिनेत्याचा झाला दुर्देवी शेवट
15
व्यापाऱ्यांनी कोणाच्या धमकीला भीक घालू नये; आम्ही तुमच्या पाठीशी आहोत - देवेंद्र फडणवीस
16
इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; 'लेडी सेहवाग'ला मिळाली कमबॅकची संधी
17
अटक करण्याची धमकी देत मागितली खंडणी: उल्हासनगर पोलीस ठाण्यातील दोन पोलीस निलंबित
18
Crime: निवृत्त न्यायाधीशाच्या दोन मुले आणि सुनेला जन्मठेपेची शिक्षा; 2007 मधील प्रकरण काय?
19
Motivational Story: वडिलांचं सायकल दुरूस्तीचं दुकान, कष्टाची जाणीव ठेवून मुलानं दहावीत मिळवले घवघवीत यश
20
आश्चर्यकारक! आरोपीने बलात्कार पिडितेला भरकोर्टात केलं 'प्रपोज'; सर्वोच्च न्यायालयातील प्रसंग

सरकारकडून दहशतीचे राजकारण

By admin | Updated: February 19, 2016 01:22 IST

पृथ्वीराज चव्हाण : आम्हीसुद्धा त्यांचे घोटाळे तडीस नेऊ

सांगली : घोटाळे करणाऱ्यांवर कारवाई करावी, पण विनाकारण त्रास देण्याचा हेतू नसावा. द्वेषबुद्धीने सरकारविरोधी नेत्यांना लक्ष्य करून कारवाईच्या माध्यमातून दहशतीचे राजकारण करीत आहे. एका वर्षाच्या कालावधित भाजप सरकारने केलेले घोटाळेही आम्ही तडीस नेऊ, असा इशारा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गुरुवारी सांगलीत पत्रकार परिषदेत दिला. चव्हाण म्हणाले की, सरकारच्या चुकीच्या धोरणांवर जे नेते आक्रमक होऊ पाहत आहेत, त्यांना टार्गेट करून त्यांच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. तुरुंगात टाकण्याची भाषाही केली जात आहे. अशापद्धतीने दहशत दाखवून विरोधातील आवाज दडपण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. घोटाळ्यांची चौकशी करताना राजकारण करू नये. एका बाजूला स्वत:च्या सरकारचे घोटाळे लपवायचे आणि विरोधकांच्याच घोटाळ्यांवर लोकांचे लक्ष कसे केंद्रित होईल, याची व्यवस्था करायची, असे धोरण भाजप सरकार राबवित आहे. आम्ही त्यांच्या या दहशतीला भीक घालणार नाही. त्यांच्या घोटाळ्यांबाबत आम्ही आक्रमक झालो नव्हतो, पण आता आम्ही ते घोटाळे तडीस नेऊ. यामध्ये चिक्की घोटाळा, तावडेंच्या शिक्षणाचा मुद्दा, डाळीचा घोटाळा यांचा समावेश आहे. विभागीय राजकारण आम्ही कधीच केले नाही. विदर्भ, मराठवाड्यात कामे होऊ नयेत, अशी भूमिकाही आमची कधीच नव्हती. तरीही याप्रकारचे चित्र रंगवून काही नेते राजकारण करीत आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार असूनही विदर्भ आणि मराठवाड्यातील प्रश्न तसेच आहेत. दुष्काळाच्या प्रश्नावर कोणतेही उपाय नाहीत. कधी नव्हे इतक्या आत्महत्या विदर्भ आणि मराठवाड्यात झाल्या. त्यामुळे सर्वच ठिकाणी हे सरकार अपयशी ठरलेले आहे. दिशाहीन आणि विस्कळीत झालेले हे सरकार आहे, अशी टीका त्यांनी केली. (प्रतिनिधी)डाळीचा घोटाळा सरकारचाचसचिवांची टिपणी डावलून मुख्यमंत्री, अन्न व नागरी पुरवठा मंत्र्यांनी त्यांच्या अधिकारात डाळीवरील साठाबंदी उठविली. आघाडी सरकारने सात वर्षे ती ठेवली होती. हे वास्तव असताना मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांच्या नावे खापर फोडणे चुकीचे आहे. त्यांनी सभागृहात दिलेली माहिती चुकीची आहे. आम्ही शिस्तभंगाच्या कारवाईसाठी प्रयत्न करणार, असा इशारा चव्हाण यांनी दिला. कसला हा व्यवहार...‘स्मार्ट सिटी’साठी म्हणे शंभर कोटींची तरतूद प्रतिवर्षी केंद्र सरकारने केली आहे. दुसरीकडे एलबीटी रद्द करून सहा हजार कोटी रुपये हक्काचे उत्पन्न बुडविले. एवढ्या मोठ्या रकमेवर पाणी सोडून शंभर कोटीची योजना आणण्याचा हा सरकारचा कसला व्यवहार आहे?, असा सवाल त्यांनी केला. सरकार पडेल!मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी राज्यातील भाजप-शिवसेनेत जोरदार मतभेद होऊन, हे सरकार अल्पमतात येण्याची चिन्हे आहेत. शिवसेनेलाही भाजपचे वागणे पटत नसल्याने, लवकरच ते त्यांचा पाठिंबा काढून घेण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे मत चव्हाण यांनी यावेळी व्यक्त केली. ...तर राजकारण सोडून देतोकेंद्र सरकारच्या निकषानुसार उत्पन्नाच्या २३ टक्के कर्ज राज्य सरकारांनी घ्यायचे बंधन असते. गेल्या पंधरा वर्षांच्या कालावधित आमच्या सरकारने कधीही हा आकडा १९ टक्क्यांवर जाऊ दिला नाही. विद्यमान सरकारने त्यामुळे कर्जाचा बाऊ करू नये. खरोखरच सरकारमध्ये क्षमता असेल, तर त्यांनी राज्याचे कर्ज १ टक्का तरी कमी करुन दाखवावे. तसे त्यांनी केले, तर मी कायमचे राजकारण सोडून देईन, असे आव्हान चव्हाण यांनी दिले.