गारगोटी :
आदमापूर, ता. भुदरगड येथे संचारबंदीचे उल्लंघन करून विनापरवाना दारात मंडप घालून गर्दी जमवून लग्नकार्य केल्याबद्दल वरपिता, नवरदेव - नवरी, भटजीसह ५० लोकांवर भुदरगड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
आदमापूर येथे शिवाजी केरबा पाटील यांच्या मुलाचे लग्न होते. विनापरवाना दारात मंडप टाकून कोरोना संसर्गाच्या काळात संचारबंदी असताना गर्दी जमवून लग्न केल्याबद्दल वरपिता शिवाजी पाटील तसेच नवरदेव मुलगा नितीन, नवरी मुलगी मयूरी, संजय पाटील व (मुलाचे चुलते), किरण मुदाळकर, नामदेव पाटील (सर्व रा. आदमापूर), भटजी मुकुंद अनंत शुक्ल (रा. मुदाळ), अशोक नायकवडे (रा. पडेवाडी) व अनोळखी ४० ते ५० लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.