शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

गावागावात जलसाठे निर्माण करणार  : सदाभाऊ खोत 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2017 16:55 IST

कोल्हापूर : जलयुक्त शिवार अभियान हे राज्य शासनाचे प्राधान्यक्रमाचे अभियान असून ते यापुढेही अधिक प्रभावीपणे राबवून गावागावात जलसाठे निर्माण करुन गावे जलसमृध्द बनविण्याचा शासनाचा प्रयत्न राहील, असे प्रतिपादन असल्याचे कृषि राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी मंगळवारी येथे केले.जलयुक्त शिवार अभियानांतर्गत कळंबे तर्फ ठाणे (ता. करवीर) येथे राबविलेल्या जलसंधारणाच्या विविध प्रणालींची राज्याचे ...

ठळक मुद्दे ‘जलयुक्त शिवार’अंतर्गत कळंबे तर्फ ठाणे येथे पाणी पूजनशेतकºयांना ट्रॅक्टर व पॉवर टेलरचे वितरण शेतकºयांना ट्रॅक्टर व पॉवर टेलरचे वितरण शेतकºयांना ट्रॅक्टर व पॉवर टेलरचे वितरण कृषिविषयक योजना शेतकºयांच्या बांधापर्यंत प्रभावीपणे पोहोचवाउन्नत शेती -समृध्द शेतकरी मोहिम गतीमान करा

कोल्हापूर : जलयुक्त शिवार अभियान हे राज्य शासनाचे प्राधान्यक्रमाचे अभियान असून ते यापुढेही अधिक प्रभावीपणे राबवून गावागावात जलसाठे निर्माण करुन गावे जलसमृध्द बनविण्याचा शासनाचा प्रयत्न राहील, असे प्रतिपादन असल्याचे कृषि राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी मंगळवारी येथे केले.जलयुक्त शिवार अभियानांतर्गत कळंबे तर्फ ठाणे (ता. करवीर) येथे राबविलेल्या जलसंधारणाच्या विविध प्रणालींची राज्याचे कृषि राज्यमंत्री सदाशिव खोत यांनी पाहणी करुन सिमेंट नालाबांधातील पाण्याचे पूजन केले. यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार अमल महाडीक, गोकुळ दुध संघाचे संचालक बाबा देसाई, जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, कृषि सहसंचालक डॉ. नारायण शिसोदे आदि प्रमुख उपस्थित होते. यावेळी मंत्री खोत यांच्या हस्ते कृषि यांत्रिकीकरणातून शेतकºयांना ट्रॅक्टर व पॉवर टेलरचे वितरण करण्यात आले.कळंबे तर्फ ठाणे येथे कृषी विभागामार्फत जलयुक्त शिवार अभियानांतर्गत राबविलेल्या जलसंधारणाच्या विविध प्रणालींची पाहणी करुन मंत्री खोत यांनी समाधान व्यक्त केले. शेतकºयांसाठी शासन अनेकविध योजना आणि उपक्रम राबवित असून या कृषिविषयक योजना शेतकºयांच्या बांधापर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचे काम कृषि अधिकाºयांनी करण्याची सूचनाही त्यांनी यावेळी केली. कृषि विभागामार्फत उन्नत शेती -समृध्द शेतकरी ही मोहिमही शेतकºयांसाठी अतिशय उपयुक्त असून ही मोहिम कृषि विभागाने अधिक गतीमान करावी असेही त्यांनी सांगितले.जिल्हा अधिक्षक कृषिअधिकारी बसवराज मास्तोळी म्हणाले, जलयुक्त शिवार अभियानांतर्गत कळंबे तर्फ ठाणे येथे जलसंधारण प्रणालीची विविध १८ कामे हाती घेण्यात आली आहेत. यामध्ये शेततळी, सिमेंट नालाबांध खोलीकरण व रुंदीकरण, गाळ काढणे, सलग समतल चर, साखळी सिमेंट काँक्रीट नाला बांध खोलीकरण व रुंदीकरण, गाव तलावातील गाळ लोकसहभागातून काढणे, पाण्याचे स्त्रोत बळकटीकरणाच्या कार्यक्रमांचा समावेश आहे.

यावेळी पाटबंधारे विभागाचे कायर्कारी अभियंता संग्राम पाटील, विभागीय अधिक्षक कृषि अधिकारी उमेश पाटील, कृषि विकास अधिकारी चंद्रकांत सुयर्वंशी, उपविभागीय कृषि अधिकारी रविंद्र पाठक यांच्यासह शेतकरी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.