शहरं
Join us  
Trending Stories
1
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
2
आजचे राशीभविष्य - २२ जून २०२५, मान-प्रतिष्ठा ह्यात वाढ झाल्याने आपण आनंदित व्हाल
3
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
4
विशेष लेख: शिंदे-ठाकरे दोघांना भांडू द्या, तुम्ही निवडून कसे येणार हे बघा!
5
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
6
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
7
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही
8
कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी घेणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
9
अटल सेतूवर खड्डे! कंत्राटदाराला २० लाखांचा दंड; पाऊस, तेल गळतीमुळे प्रकार 
10
लेख: आषाढी पायी वारी :विज्ञाननिष्ठ उत्सव
11
मुंबईत विमानाच्या महिला पायलटचा कॅब प्रवासादरम्यान विनयभंग; चालकासह दोन तरुणांविरोधात गुन्हा 
12
मुलाला आईची जात लावण्यास मुंबई उच्च न्यायालयाने दिला नकार; प्रकरण काय? 
13
भारतीय संगीत पुढे आणण्याची गरज, आशा भोसले यांनी मांडले मत; देवेंद्र फडणवीसांनी गायले गाणे
14
फिजिओथेरपीच्या इंटर्न्सच्या वेतनात वाढ, बीएस्सी नर्सिंगच्या इंटर्सना मिळणार विद्यावेतन
15
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
16
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
17
IND vs ENG : बुमराह एकटा नडला! फिल्डिंगवेळी गडबड घोटाळा; ओली पोपच्या सेंच्युरीसह दुसरा दिवस इंग्लंडचा
18
इराणवर मोठा हल्ला; इस्रायलने पुन्हा खामेनेईंचे कमांडर मारले; अणुशास्त्रज्ञाचाही मृत्यू
19
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
20
बुमराहचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या मैदानात पाकच्या वसीम अक्रमच्या विक्रमाला लावला सुरुंग

गावागावात जलसाठे निर्माण करणार  : सदाभाऊ खोत 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2017 16:55 IST

कोल्हापूर : जलयुक्त शिवार अभियान हे राज्य शासनाचे प्राधान्यक्रमाचे अभियान असून ते यापुढेही अधिक प्रभावीपणे राबवून गावागावात जलसाठे निर्माण करुन गावे जलसमृध्द बनविण्याचा शासनाचा प्रयत्न राहील, असे प्रतिपादन असल्याचे कृषि राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी मंगळवारी येथे केले.जलयुक्त शिवार अभियानांतर्गत कळंबे तर्फ ठाणे (ता. करवीर) येथे राबविलेल्या जलसंधारणाच्या विविध प्रणालींची राज्याचे ...

ठळक मुद्दे ‘जलयुक्त शिवार’अंतर्गत कळंबे तर्फ ठाणे येथे पाणी पूजनशेतकºयांना ट्रॅक्टर व पॉवर टेलरचे वितरण शेतकºयांना ट्रॅक्टर व पॉवर टेलरचे वितरण शेतकºयांना ट्रॅक्टर व पॉवर टेलरचे वितरण कृषिविषयक योजना शेतकºयांच्या बांधापर्यंत प्रभावीपणे पोहोचवाउन्नत शेती -समृध्द शेतकरी मोहिम गतीमान करा

कोल्हापूर : जलयुक्त शिवार अभियान हे राज्य शासनाचे प्राधान्यक्रमाचे अभियान असून ते यापुढेही अधिक प्रभावीपणे राबवून गावागावात जलसाठे निर्माण करुन गावे जलसमृध्द बनविण्याचा शासनाचा प्रयत्न राहील, असे प्रतिपादन असल्याचे कृषि राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी मंगळवारी येथे केले.जलयुक्त शिवार अभियानांतर्गत कळंबे तर्फ ठाणे (ता. करवीर) येथे राबविलेल्या जलसंधारणाच्या विविध प्रणालींची राज्याचे कृषि राज्यमंत्री सदाशिव खोत यांनी पाहणी करुन सिमेंट नालाबांधातील पाण्याचे पूजन केले. यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार अमल महाडीक, गोकुळ दुध संघाचे संचालक बाबा देसाई, जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, कृषि सहसंचालक डॉ. नारायण शिसोदे आदि प्रमुख उपस्थित होते. यावेळी मंत्री खोत यांच्या हस्ते कृषि यांत्रिकीकरणातून शेतकºयांना ट्रॅक्टर व पॉवर टेलरचे वितरण करण्यात आले.कळंबे तर्फ ठाणे येथे कृषी विभागामार्फत जलयुक्त शिवार अभियानांतर्गत राबविलेल्या जलसंधारणाच्या विविध प्रणालींची पाहणी करुन मंत्री खोत यांनी समाधान व्यक्त केले. शेतकºयांसाठी शासन अनेकविध योजना आणि उपक्रम राबवित असून या कृषिविषयक योजना शेतकºयांच्या बांधापर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचे काम कृषि अधिकाºयांनी करण्याची सूचनाही त्यांनी यावेळी केली. कृषि विभागामार्फत उन्नत शेती -समृध्द शेतकरी ही मोहिमही शेतकºयांसाठी अतिशय उपयुक्त असून ही मोहिम कृषि विभागाने अधिक गतीमान करावी असेही त्यांनी सांगितले.जिल्हा अधिक्षक कृषिअधिकारी बसवराज मास्तोळी म्हणाले, जलयुक्त शिवार अभियानांतर्गत कळंबे तर्फ ठाणे येथे जलसंधारण प्रणालीची विविध १८ कामे हाती घेण्यात आली आहेत. यामध्ये शेततळी, सिमेंट नालाबांध खोलीकरण व रुंदीकरण, गाळ काढणे, सलग समतल चर, साखळी सिमेंट काँक्रीट नाला बांध खोलीकरण व रुंदीकरण, गाव तलावातील गाळ लोकसहभागातून काढणे, पाण्याचे स्त्रोत बळकटीकरणाच्या कार्यक्रमांचा समावेश आहे.

यावेळी पाटबंधारे विभागाचे कायर्कारी अभियंता संग्राम पाटील, विभागीय अधिक्षक कृषि अधिकारी उमेश पाटील, कृषि विकास अधिकारी चंद्रकांत सुयर्वंशी, उपविभागीय कृषि अधिकारी रविंद्र पाठक यांच्यासह शेतकरी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.