शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

गावागावात जलसाठे निर्माण करणार  : सदाभाऊ खोत 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2017 16:55 IST

कोल्हापूर : जलयुक्त शिवार अभियान हे राज्य शासनाचे प्राधान्यक्रमाचे अभियान असून ते यापुढेही अधिक प्रभावीपणे राबवून गावागावात जलसाठे निर्माण करुन गावे जलसमृध्द बनविण्याचा शासनाचा प्रयत्न राहील, असे प्रतिपादन असल्याचे कृषि राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी मंगळवारी येथे केले.जलयुक्त शिवार अभियानांतर्गत कळंबे तर्फ ठाणे (ता. करवीर) येथे राबविलेल्या जलसंधारणाच्या विविध प्रणालींची राज्याचे ...

ठळक मुद्दे ‘जलयुक्त शिवार’अंतर्गत कळंबे तर्फ ठाणे येथे पाणी पूजनशेतकºयांना ट्रॅक्टर व पॉवर टेलरचे वितरण शेतकºयांना ट्रॅक्टर व पॉवर टेलरचे वितरण शेतकºयांना ट्रॅक्टर व पॉवर टेलरचे वितरण कृषिविषयक योजना शेतकºयांच्या बांधापर्यंत प्रभावीपणे पोहोचवाउन्नत शेती -समृध्द शेतकरी मोहिम गतीमान करा

कोल्हापूर : जलयुक्त शिवार अभियान हे राज्य शासनाचे प्राधान्यक्रमाचे अभियान असून ते यापुढेही अधिक प्रभावीपणे राबवून गावागावात जलसाठे निर्माण करुन गावे जलसमृध्द बनविण्याचा शासनाचा प्रयत्न राहील, असे प्रतिपादन असल्याचे कृषि राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी मंगळवारी येथे केले.जलयुक्त शिवार अभियानांतर्गत कळंबे तर्फ ठाणे (ता. करवीर) येथे राबविलेल्या जलसंधारणाच्या विविध प्रणालींची राज्याचे कृषि राज्यमंत्री सदाशिव खोत यांनी पाहणी करुन सिमेंट नालाबांधातील पाण्याचे पूजन केले. यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार अमल महाडीक, गोकुळ दुध संघाचे संचालक बाबा देसाई, जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, कृषि सहसंचालक डॉ. नारायण शिसोदे आदि प्रमुख उपस्थित होते. यावेळी मंत्री खोत यांच्या हस्ते कृषि यांत्रिकीकरणातून शेतकºयांना ट्रॅक्टर व पॉवर टेलरचे वितरण करण्यात आले.कळंबे तर्फ ठाणे येथे कृषी विभागामार्फत जलयुक्त शिवार अभियानांतर्गत राबविलेल्या जलसंधारणाच्या विविध प्रणालींची पाहणी करुन मंत्री खोत यांनी समाधान व्यक्त केले. शेतकºयांसाठी शासन अनेकविध योजना आणि उपक्रम राबवित असून या कृषिविषयक योजना शेतकºयांच्या बांधापर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचे काम कृषि अधिकाºयांनी करण्याची सूचनाही त्यांनी यावेळी केली. कृषि विभागामार्फत उन्नत शेती -समृध्द शेतकरी ही मोहिमही शेतकºयांसाठी अतिशय उपयुक्त असून ही मोहिम कृषि विभागाने अधिक गतीमान करावी असेही त्यांनी सांगितले.जिल्हा अधिक्षक कृषिअधिकारी बसवराज मास्तोळी म्हणाले, जलयुक्त शिवार अभियानांतर्गत कळंबे तर्फ ठाणे येथे जलसंधारण प्रणालीची विविध १८ कामे हाती घेण्यात आली आहेत. यामध्ये शेततळी, सिमेंट नालाबांध खोलीकरण व रुंदीकरण, गाळ काढणे, सलग समतल चर, साखळी सिमेंट काँक्रीट नाला बांध खोलीकरण व रुंदीकरण, गाव तलावातील गाळ लोकसहभागातून काढणे, पाण्याचे स्त्रोत बळकटीकरणाच्या कार्यक्रमांचा समावेश आहे.

यावेळी पाटबंधारे विभागाचे कायर्कारी अभियंता संग्राम पाटील, विभागीय अधिक्षक कृषि अधिकारी उमेश पाटील, कृषि विकास अधिकारी चंद्रकांत सुयर्वंशी, उपविभागीय कृषि अधिकारी रविंद्र पाठक यांच्यासह शेतकरी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.