शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रत्येक खासदाराला १५ कोटी देऊन भाजपाने मत खरेदी केले"; 'व्होट क्रॉसिंग'वर सर्वात मोठा दावा
2
खुद्द लष्करप्रमुखांनी विनवलं, तब्बल १५ तास महाचर्चा अन् सुशीला कार्कींचा PM पदासाठी होकार! Inside Story
3
जीएसटी काटके...! महिंद्रा, सोनालिका, जॉन डीअर ट्रॅक्टरची किंमत कितीने कमी होणार? 
4
ईडीचे १२ ठिकाणी छापे, यशवंत सावंतांच्या घरी सापडलं घबाड; ७२ लाखांची रोकड, ७ लग्झरी कार जप्त
5
रशिया- युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतीयांची फसवणूक, जबरदस्ती सैन्यात भरती केल्याची माहिती
6
तेजस्वी यादवांविरोधात लढण्याची केली होती तयारी, आता भररस्त्यात झाली हत्या, कोण होते राजकुमार राय? 
7
आईनं सोडलं, शिक्षणही सुटलं; तरीही उभं केलं ₹३३ लाख कोटींचं साम्राज्य; कसा आहे लॅरी एलिसन यांचा प्रवास?
8
मित्रासोबत मिळून बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडवर केला अत्याचार; गुन्हा लपवण्यासाठी केलं असं काही की ऐकून होईल संताप!
9
Nepal Crisis : नेपाळच्या लष्करप्रमुखांनी राष्ट्राला संबोधले, मागे हिंदू राजांचा फोटो, नेमके राजकारण काय?
10
Pitru Paksha 2025: पितृदोष दूर केला नाही तर किती पिढ्यांना त्रास होतो? गरुड पुराणात सापडते उत्तर!
11
मुंबईत घडलंय! मुलीच्या बॉयफ्रेंडसोबत आईचेच प्रेमसंबंध, १० लाखांचे दागिने विकून पळून जाण्याचा प्लॅन; पण...
12
रशियन नोकऱ्या स्वीकारू नका; जीवावर बेतू शकतं... परराष्ट्र मंत्रालयाचा भारतीयांना थेट इशारा
13
ना चीनला पळाले, ना दुबईत गेले; 'या' सीक्रेट जागेवर लपलेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली!
14
Thane Fraud: पोलिसालाही ‘तो’ शेअर्स महागात, कोट्यवधीचा ऑनलाइन डल्ला
15
IPS Archit Chandak : देशसेवेचं स्वप्न! तब्बल ३५ लाखांचं पॅकेज नाकारलं अन् पहिल्याच प्रयत्नात IPS, पत्नीही आहे IAS
16
iPhone 17 Series:'फोल्ड करून दाखवा', आयफोन १७ सिरीज लाँच होताच सॅमसंगने अ‍ॅपलची खिल्ली उडवली
17
"घाई काय आहे, अजिबात नाही"; भारत-पाक सामन्यावर सुप्रीम कोर्टाने दिला तीन वाक्यात निकाल
18
एफडी विसरा... पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत ५.५५ लाख रुपयांचा फिक्स परतावा; दरमहा मिळेल व्याज
19
Navya Malik : आधी मैत्री, मग ग्राहक बनवायची; नेत्यांच्या मुलांना केलं वेडं, ड्रग्ज क्वीनने ८५० श्रीमंतांना लावलं व्यसन
20
फ्रान्समध्ये सरकारविरोधात लाखो लोक रस्त्यावर का उतरले? चार कारणे समजून घ्या

शाश्वत जलसाठे निर्माण करणार

By admin | Updated: May 3, 2016 00:42 IST

चंद्रकांतदादा पाटील : दुष्काळ कायमचा संपविण्यासाठी उपाययोजना

कोल्हापूर : गेल्या चार वर्षांपासून राज्यावर दुष्काळाचे संकट असून, तो कायमचा संपविण्यासाठी राज्य शासनाने जलयुक्त शिवार अभियानातून पाच वर्षांत ३३ हजार गावांमध्ये शाश्वत जलसाठे निर्माण करण्यास प्राधान्य दिले आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी रविवारी येथे केले.महाराष्ट्र दिनानिमित्त छत्रपती शाहू स्टेडियम येथे आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभात ते बोलत होते.पालकमंत्री पाटील म्हणाले, जिल्ह्यातही जलयुक्त शिवार अभियानाला शासनाने गती दिली असून, गेल्या वर्षात ६९ गावांमध्ये जलसंधारणाची कामे हाती घेऊन पाणीसाठे निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. यंदा २० गावांत हे अभियान हाती घेतले असून, टंचाईग्रस्त अशा ११३ गावांमध्येही जलसंधारणाची कामे प्राधान्यक्रमाने करण्याची भूमिका प्रशासनाने स्वीकारली आहे.जिल्ह्यात रस्ते विकासाचा भरीव कार्यक्रम हाती घेतला असून, जवळपास ३५० कोटींची कामे जिल्ह्यात आणली आहेत. येत्या आॅगस्टमध्ये १२ वर्षांतून एकदा येणाऱ्या कन्यागत महापर्व सोहळ्यासाठी १२१ कोटींचा निधी शासनाने उपलब्ध करून दिला आहे, असेही पालकमंत्री पाटील यांनी सांगितले.स्वच्छ महाराष्ट्र अभियानात जिल्ह्यातील सहा तालुके आणि ६६० ग्रामपंचायती हागणदारीमुक्त झाल्या आहेत. तसेच कोल्हापूर महानगरपालिका आणि जिल्ह्यातील आठ नगरपालिकांनीही हागणदारीमुक्त होण्याचा बहुमान मिळविला आहे. अंबाबाई मूर्तीचा वज्रलेप यशस्वी झाला आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोल्हापूरला व्हावे, यासाठी मंत्रिमंडळाने ठरावही मंजूर केला आहे. तसेच कोल्हापूर विमानतळ, रंकाळा प्रदूषण, कोल्हापूरची हद्दवाढ, असे अनेक प्रलंबित प्रश्न मार्गी लावले जातील, असेही पालकमंत्री पाटील यांनी सांगितले.यावेळी अप्पर जिल्हाधिकारी अजित पवार, अप्पर पोलिस अधीक्षक एस. चैतन्या, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता सदाशिव साळुंखे, उप वनसंरक्षक रंगनाथ नाईकडे, निवासी उपजिल्हाधिकारी शंकर बर्गे, जिल्हा पुरवठा अधिकारी विवेक आगवणे, करवीरचे प्रांताधिकारी प्रशांत पाटील, आदींसह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. (प्रतिनिधी) २७ शाळांना ‘आयएसओ’ मानांकन महाराजस्व अभियान कार्यक्रमांतर्गत जनतेला लागणारे दाखले, प्रमाणपत्रे गावातच उपलब्ध करून देण्यासाठी जिल्ह्णात विस्तारित समाधान योजनेची ६७२ शिबिरे घेऊन एक लाखाहून अधिक विविध प्रकारच्या दाखल्यांचे वाटप करण्यात आले आहे. तसेच जिल्हा परिषदेच्या २७ शाळांना ‘आयएसओ’ मानांकन मिळाले असून, ८५६ शाळा डिजिटल केल्या आहेत. याबरोबरच आरोग्य विभागाने कायापालट योजनेच्या माध्यमातून प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये आमूलाग्र सुधारणा केल्या आहेत. कायापालट योजनेचे यश पाहून राज्य शासनाने ही योजना संपूर्ण राज्यभर राबविण्याचा निर्णय घेतला आहे.