शहरं
Join us  
Trending Stories
1
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
2
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
3
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
4
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
5
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
6
भारताविरोधात गन सेलिब्रेशन करणाऱ्या पाकिस्तानच्या फरहानचा माजोरडेपणा कायम, आता म्हणाला....
7
काँग्रेसचे नेते आणि हिमाचलमधील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी केलं दुसरं लग्न, कोण आहे त्यांची दुसरी पत्नी?
8
डीजेचा मोठा आवाज ठरेल जीवघेणा; हार्ट अटॅक, ब्रेन हॅमरेजचा धोका, फुटू शकते मेंदूची नस
9
चार्ली किर्कच्या शोकसभेत पत्नीने केलं अनपेक्षित विधान; एरिका किर्क म्हणाल्या," त्या तरुणाला मी..."
10
“युद्धाची गरजच भासणार नाही, एक दिवस POKतील जनता म्हणेल की आम्ही भारतवासी आहोत”: राजनाथ सिंह
11
जुगाराच्या व्यसनामुळे बनला 'चोर'; वडिलांशी खोटं बोलून मित्रांच्या नावाने घेतलं ३३ लाखांचं कर्ज
12
टाटा-महिंद्राच्या कंपनीचे शेअर आपटले! पण अदानींचा 'हा' स्टॉक ठरला टॉप गेनर; IT क्षेत्राला सर्वाधिक फटका
13
मेट्रोचे सर्व टप्पे २०२६च्या अखेरपर्यंत प्रवाशांकरता खुले होतील- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
14
“आता रिकामे ठेवू नका, काहीतरी जबाबदारी द्या, चुकलो असेन तर...”; धनंजय मुंडेंची भरसभेत विनंती
15
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
16
VIDEO: आईची माया! सिंहीणने रेडकूवर घातली झडप, म्हशीने शिंगाने लावलं उडवून अन् पुढे...
17
बगरम हवाई तळावर अमेरिकेचा 'डोळा'; ट्रम्प यांना आता का हवंय अफगाणिस्तानचं 'एअरफील्ड'?
18
ज्या सुटकेसवर बसून रील बनवलं, त्यातच तिला भरून नदीत फेकलं; लव्हस्टोरीचा भयंकर शेवट
19
कहो ना कहो...! इमरान हाश्मीसमोर गाताना राघव जुयालच्या डोळ्यात आलेलं पाणी, म्हणाला...
20
आजपासून स्वस्त झालं Rail Neer; जीएसटी रिव्हिजननंतर रेल्वेनं कमी केली MRP

समताधिष्ठित समाज घडवूया

By admin | Updated: April 19, 2017 01:13 IST

शरद गायकवाड यांचे प्रतिपादन : मूलनिवासी मेळाव्यात प्रबोधन सत्र

कोल्हापूर : महापुरुषांच्या स्वप्नातील समताधिष्ठित समाज घडविण्यासाठी आपण सर्वांनी वेळ, पैसा, श्रम आणि बुद्धी खर्च करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन प्रा. डॉ. शरद गायकवाड यांनी मंगळवारी येथे केले.येथील मूलनिवासी संघातर्फे राष्ट्रपिता जोतिबा फुले यांची १९० वी आणि राष्ट्रनिर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२६ व्या संयुक्त जयंतीनिमित्त आयोजित मूलनिवासी मेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी डॉ. रवींद्र श्रावस्ती, तर प्रा. प्रभाकर निसर्गंध प्रमुख उपस्थित होते. मेळाव्यातील प्रबोधन सत्राचा विषय ‘समता नाकारण्यासाठी समरसतेचे ढोंग’ असा होता. प्रा. गायकवाड म्हणाले, देशाला क्रांती, प्रतिक्रांतीचा इतिहास आहे. महापुरुषांनी क्रांती केली, तर प्रतिक्रांतीने महापुरुषांच्या विचारांचे अपहरण केले. समतावादींचा विषमतावादीकडून छळ झाला. समताधिष्ठित समाज निर्माण करणे हे महापुरुषांचे स्वप्न होते. त्यासाठी ते आयुष्यभर झटले. त्यांचे विचार, तत्त्वज्ञान, वस्तूंचे अपहरण केले जात आहे. त्यामुळे या देशात क्रांती-प्रतिक्रांती दिसत आहे. समताधिष्ठित समाज घडविण्यासाठी वेळ, पैसा, श्रम, बुद्धी खर्च करूया. शिवाय समता, न्याय, बंधुभाव रुजलेला समाज घडूवया. कार्यक्रमाच्या प्रारंभी कुमार कांबळे यांचा सांस्कृतिक कार्यक्रम झाला. प्रमोद कोल्हे यांनी काव्यवाचन केले. यावेळी राजू कांबळे, मूलनिवासी संघाचे एसईसी सदस्य तुषार गवळी, आदी उपस्थित होते. मूलनिवासी संघाचे जिल्हाध्यक्ष दिलीप वायदंडे यांनी प्रास्ताविक केले. राहुल ढाले यांनी सूत्रसंचालन केले. बामसेफचे जिल्हाध्यक्ष एस. के. धनवडे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)सामाजिक संस्थांचा सत्कारया मेळाव्यात प्रमुख उपस्थितांच्या हस्ते सामाजिक चळवळीतील संस्थांना ‘मूलनिवासी लढा सन्मान’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यामध्ये बौद्ध प्रणाली चॅरिटेबल ट्रस्ट, समविचारी परिवर्तन मंच, नालंदा अकॅडमी, प्रज्ञा प्रकाशन, धम्म संस्कार केंद्र, बहुजन हिताय वसतिगृह, भरारी एज्युकेशनल अ‍ॅण्ड सोशल फौंडेशन, महाराष्ट्र राज्य मान्य खासगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर महासंघ, कोल्हापूर महानगर माध्यमिक शिक्षक संघ, आम्ही कोल्हापुरी, कास्ट्राईब कोल्हापूर, बुद्धभूषण या संस्थांचा समावेश होता. स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र असे पुरस्काराचे स्वरुप होते.वाचणे सुरू व्हावेसध्या महापुरुषांच्या जयंतीदिनी डॉल्बीवर नाचणे सुरू झाले आहे. ते बंद होऊन समताधिष्ठित समाजनिर्मितीसाठी वाचणे सुरू व्हावे, अशी अपेक्षा प्रा. गायकवाड यांनी व्यक्त केली.