शहरं
Join us  
Trending Stories
1
सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात 'तारा'चा भीमपराक्रम! मगरींच्या विळख्यात दीड किमी पोहून वारणा धरण केले पार
2
उल्हासनगर: शाखा ताब्यात घेण्यावरून उद्धवसेना व शिंदेसेना आमने-सामने, पोलिसांचा हस्तक्षेप
3
KTM Duke: केटीएम ड्यूक १६० आता आणखी पॉवरफुल! ग्राहकांना मिळणार नवीन अपडेट्स
4
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
5
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
6
ग्लॅमर अन् परंपरेचा 'गुलाबी संगम'... BIGG BOSS गाजवणाऱ्या मालती चहरचा 'सुपरहॉट' लूक (PHOTOS)
7
बॉक्सर नीरजनं विचारलं, कसे आहात? पंतप्रथान मोदींनी उत्तर दिलं, तुझ्यासारखाच...!; VIDEO व्हायरल
8
भाजपाचा मित्रपक्षाच्या आमदारांवरच डोळा? पक्षाच्या बैठकीला दांडी, बिहारमध्ये मोठी उलथापालथ होणार
9
VIDEO: Hardik Pandya चं 'लेडी लव्ह'! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला सांभाळून कारमध्ये बसवलं...
10
Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!
11
आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
12
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
13
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
14
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
15
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
16
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
17
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
18
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
19
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
20
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
Daily Top 2Weekly Top 5

माकपचे शुक्रवारी ‘जवाब दो’ आंदोलन

By admin | Updated: May 19, 2015 00:22 IST

भाजपच्या आश्वासनांचा होणार ‘पोलखोल’

कोल्हापूर : कोल्हापुरातला टोल रद्द करण्याची घोषणा विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्तेत येण्यापूर्वी केली होती. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या झाल्यानंतर तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांचा राजीनामा याच फडणवीसांनी मागितला होता पण आजही कोल्हापुरातील टोल रद्द झाला नाही. ज्येष्ठ कामगार नेते गोविंद पानसरे यांचे मारेकरी तीन महिन्यांनंतरही सापडलेले नाहीत. कोल्हापूरकरांच्या या प्रश्नांची सोडवणूक करण्यात अपयशी ठरलेल्या फडणवीस सरकारकडे जाब विचारण्यासाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षातर्फे (माकप) कोल्हापुरात शुक्रवारी (दि. २२) भाजप सरकारविरोधात ‘जवाब दो’ आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती माकपचे जिल्हा सचिव उदय नारकर यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. नारकर म्हणाले, कोल्हापुरातील टोल रद्द करण्यात आणि पानसरेंच्या मारेकऱ्यांचा शोध घेण्यात फडणवीस सरकार अपयशी ठरले आहे. पंतप्रधान मोदी यांनी सत्तेत येण्यापूर्वी काळा पैसा देशात आणण्याचे, महागाई कमी करण्याचे आश्वासन दिले होते, पण सत्तेत येऊन वर्ष झाले तरी या देशात काळा पैसा आलेला नाही. महागाई दिवसें-दिवस वाढतच आहे. भूसंपादनाच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या जमिनी गिळंकृत केल्या जात आहेत. औषधे महागली आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पेट्रोल - डिझेलचे दर कमी असले तरी देशातील पेट्रोल व डिझेलचे दर वाढत आहेत. जाती-धर्मातील तेढ निर्माण होत आहे. या पार्श्वभूमीवर ‘जवाब दो आंदोलन’ होणार आहे. या आंदोलनादरम्यान दसरा चौक ते मिरजकर तिकटी या मार्गावर मोर्चा काढण्यात येणार आहे. मिरजकर तिकटी येथे जाहीर सभाही होणार आहे. माकपचे जिल्हा समिती सदस्य चंद्रकांत यादव म्हणाले, भाजप सरकारच्या काळात अन्नधान्याचे दर वाढत आहेत. कामगारांनी संघर्ष करून मिळवलेले कायदे बदललेले जात आहेत. विकासाच्या नावाखाली कॉर्पोरट विकासाला प्राधान्य दिले जात असून कामगार, शेतकरी, शासकीय योजनांत काम करणारे कर्मचाऱ्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष केले जात आहे. रेशन व्यवस्थाच बंद करण्याचा घाट सरकारने घातला आहे. शासनाचे हे धोरण कामगार, गरीब आणि शेतकरी यांना मारक आहे. यावेळी प्राचार्य ए. बी. पाटील, अ‍ॅड. जयंत बलुगडे, प्रा. आबासाहेब चौगले, शंकर काटाळे, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)टोल रद्द करून मते मिळवलीत, टोल कधी रद्द होणार ?ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येला तीन महिने झाले. पानसरेंच्या खुन्यांना कधी पकडणार?दाभोलकरांच्या खुन्यांना कधी पकडणार?ऊस उत्पादकांना एफआरपीप्रमाणे दर का देत नाही?गोवंश हत्याबंदी कायदा करून कोणाला खूश करत आहात?एक वर्षात किती काळा पैसा देशात आणला?डिझेल-पेट्रोलचे भाव का वाढवले जात आहेत?महागाई कमी करण्याचे आश्वासन देऊन महागाई का कमी केली नाही?