शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

माकपचे शुक्रवारी ‘जवाब दो’ आंदोलन

By admin | Updated: May 19, 2015 00:22 IST

भाजपच्या आश्वासनांचा होणार ‘पोलखोल’

कोल्हापूर : कोल्हापुरातला टोल रद्द करण्याची घोषणा विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्तेत येण्यापूर्वी केली होती. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या झाल्यानंतर तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांचा राजीनामा याच फडणवीसांनी मागितला होता पण आजही कोल्हापुरातील टोल रद्द झाला नाही. ज्येष्ठ कामगार नेते गोविंद पानसरे यांचे मारेकरी तीन महिन्यांनंतरही सापडलेले नाहीत. कोल्हापूरकरांच्या या प्रश्नांची सोडवणूक करण्यात अपयशी ठरलेल्या फडणवीस सरकारकडे जाब विचारण्यासाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षातर्फे (माकप) कोल्हापुरात शुक्रवारी (दि. २२) भाजप सरकारविरोधात ‘जवाब दो’ आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती माकपचे जिल्हा सचिव उदय नारकर यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. नारकर म्हणाले, कोल्हापुरातील टोल रद्द करण्यात आणि पानसरेंच्या मारेकऱ्यांचा शोध घेण्यात फडणवीस सरकार अपयशी ठरले आहे. पंतप्रधान मोदी यांनी सत्तेत येण्यापूर्वी काळा पैसा देशात आणण्याचे, महागाई कमी करण्याचे आश्वासन दिले होते, पण सत्तेत येऊन वर्ष झाले तरी या देशात काळा पैसा आलेला नाही. महागाई दिवसें-दिवस वाढतच आहे. भूसंपादनाच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या जमिनी गिळंकृत केल्या जात आहेत. औषधे महागली आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पेट्रोल - डिझेलचे दर कमी असले तरी देशातील पेट्रोल व डिझेलचे दर वाढत आहेत. जाती-धर्मातील तेढ निर्माण होत आहे. या पार्श्वभूमीवर ‘जवाब दो आंदोलन’ होणार आहे. या आंदोलनादरम्यान दसरा चौक ते मिरजकर तिकटी या मार्गावर मोर्चा काढण्यात येणार आहे. मिरजकर तिकटी येथे जाहीर सभाही होणार आहे. माकपचे जिल्हा समिती सदस्य चंद्रकांत यादव म्हणाले, भाजप सरकारच्या काळात अन्नधान्याचे दर वाढत आहेत. कामगारांनी संघर्ष करून मिळवलेले कायदे बदललेले जात आहेत. विकासाच्या नावाखाली कॉर्पोरट विकासाला प्राधान्य दिले जात असून कामगार, शेतकरी, शासकीय योजनांत काम करणारे कर्मचाऱ्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष केले जात आहे. रेशन व्यवस्थाच बंद करण्याचा घाट सरकारने घातला आहे. शासनाचे हे धोरण कामगार, गरीब आणि शेतकरी यांना मारक आहे. यावेळी प्राचार्य ए. बी. पाटील, अ‍ॅड. जयंत बलुगडे, प्रा. आबासाहेब चौगले, शंकर काटाळे, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)टोल रद्द करून मते मिळवलीत, टोल कधी रद्द होणार ?ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येला तीन महिने झाले. पानसरेंच्या खुन्यांना कधी पकडणार?दाभोलकरांच्या खुन्यांना कधी पकडणार?ऊस उत्पादकांना एफआरपीप्रमाणे दर का देत नाही?गोवंश हत्याबंदी कायदा करून कोणाला खूश करत आहात?एक वर्षात किती काळा पैसा देशात आणला?डिझेल-पेट्रोलचे भाव का वाढवले जात आहेत?महागाई कमी करण्याचे आश्वासन देऊन महागाई का कमी केली नाही?