शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

गोवंशहत्याबंदी कायदा म्हणजे अल्पसंख्याकांना मारण्याचा निर्णय

By admin | Updated: June 4, 2015 00:01 IST

धनाजी गुरव : लोकशाहीवादी श्रमिक मुक्ती दलाचा आजऱ्यात मोर्चा

आजरा : गोवंशहत्याबंदी कायदा म्हणजे मुस्लिम, ख्रिश्चन बांधवांसह अल्पसंख्याकांना बंदुकीच्या गोळ्या न वापरता कसे मारता येईल याची केंद्र सरकारने केलेली व्यूहरचना आहे. या कायद्यामुळे राबणारा शेतकरी अडचणीत येणार आहे. अल्पदरात बीफच्या माध्यमातून गरिबांना मिळणारे प्रोटिन येथून पुढे न मिळाल्याने भूकबळी वाढण्याची शक्यता आहे. सरकारचा धार्मिक द्वेष वाढवून शेतकऱ्याला देशोधडीला लावण्याचा डाव संघटितरीत्या हाणून पाडा, असे आवाहन कॉ. धनाजी गुरव यांनी केले.लोकशाहीवादी श्रमिक मुक्ती दलाच्या नेतृत्वाखाली गोवंशहत्या बंदी कायद्याच्या विरोधात आजरा तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी कॉ. धनाजी गुरव बोलत होते. बाजार मैदान येथून मोर्चास सुरुवात झाली. सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्य्त आली. मोर्चामध्ये सर्वधर्मीय स्त्री-पुरुषांसह भाकड जनावरांनाही सामील करून घेण्यात आले होते.मोर्चासमोर बोलताना कॉ. जाधव म्हणाले, या आधीच्या सरकारने गोहत्यासंबंधी कायदा केला होता. त्याचे चांगले-वाईट परिणाम शेतकरी गायींच्या प्रेमापोटी सहन करीत आला आहे; पण सध्या सत्तेवर आलेले सरकार हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नेतृत्वाखालील असून, राबणाऱ्या शेतकऱ्याला नागविण्याचे प्रयत्न सरकारकडून सुरू आहेत.कॉ. संजय तर्डेकर म्हणाले, आता शेतातील कामाचे दिवस सुरू आहेत. नवेजुने करून शेतातील कामासाठी बैल उपलब्ध करणे आवश्यक आहे. जुने म्हातारे बैल सरकारच्या कायद्यामुळे कोणी विकत घेण्याचे धाडस करेनासा झाला आहे. जनावरांचे बाजार ओस पडू लागले आहेत. या कायद्यामुळे मुळात कर्जात बुडालेल्या शेतकऱ्यांवर निरूपयोगी जनावरे सांभाळण्याची जबाबदारी येऊन पडली आहे. कॉ. गुरव म्हणाले, रात्रीत कायदे बदलण्याचे सरकारचे कावेबाजपणाचे डाव ओळखण्याची गरज आहे. सामान्य शेतकऱ्याला जनावरे बाळगण्याचे धाडस करताना विचार करावयास लावणारे कायदे सरकारकडून सुरू आहेत. यासाठी सर्व ताकदीनिशी या कायद्याला विरोध करण्याशिवाय पर्याय नाही.यावेळी संग्राम सावंत, कॉ. शिवाजी गुरव, बी. के. कांबळे, काशिनाथ मोरे, पद्मिनी पिळणकर, प्रतिभाताई कांबळे, गौतम कांबळे, सादीक सिराज, करीम मुल्ला, रशीद बेपारी, मुस्ताक दरवाजकर यांच्यासह कार्यकर्ते मोर्चात सहभागी झाले होते.मोर्चातील मागण्याप्रत्येक गाय व बैलामागे सरकारने त्यांच्या सांभाळासाठी एकरकमी रुपये ४० हजार अनुदान द्यावे.म्हातारे बैल ताब्यात घेऊन नवा बैल घेण्यासाठी प्रतिबैल ४० हजार रुपये द्यावेत.सर्व भाकड, निरूपयोगी जनावरांच्या सांभाळासाठी दिवसाला प्रती जनावर १०० रुपये द्यावेत.देशी गाय, जर्सी गाय व बैल यामध्ये फरक करावा.गोवंशहत्याबंदी कायदा रद्द करावा.