शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
2
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
5
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक इनिंग; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
6
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
11
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
12
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
13
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
14
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
15
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
16
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
17
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
18
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
19
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
20
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या

देशाची वाटचाल हुकूमशाहीकडे

By admin | Updated: January 9, 2017 00:49 IST

सुभाष देसाई : ब्लॅक पँथरच्या मेळाव्यात सावित्रीबार्इंचा पुतळा विद्यापीठात उभारण्याची मागणी

कोल्हापूर : सध्या देशाची वाटचाल ही हुकूमशाहीकडे जात असून, ते धोकादायक आहे. दिवसेंदिवस महिलांवरील अत्याचार वाढत आहेत. त्याला सरकारच जबाबदार असून, अशा घटना रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजनांची अंमलबजावणी होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन ब्लॅक पँथरचे अध्यक्ष सुभाष देसाई यांनी रविवारी येथे केले. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा पुतळा शिवाजी विद्यापीठाच्या प्रांगणात उभारावा, अशी मागणीही त्यांनी केली.शाहू स्मारक भवन येथे ब्लॅक पँथर पक्षातर्फे सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त महिला मेळावा व पक्षप्रवेश, अशा संयुक्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी सुभाष देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘आरपीआय’च्या वंदना कांबळे, संगीता पाटील, प्रवीण आजरेकर यांनी ब्लॅक पँथर पक्षात प्रवेश केला. देसाई म्हणाले, पूर्वीच्या काळात अनेक आव्हाने पेलत सावित्रीबाई फुलेंनी स्त्री शिक्षणाची कवाडे खुली केली. अशा क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा पुतळा शिवाजी विद्यापीठाच्या प्रांगणात उभारला पाहिजे.वंदना कांबळे म्हणाल्या, सावित्रीबाई फुलेंनी महिलांच्या शिक्षणासाठी योगदान दिल्यामुळेच आज महिला अनेक मोठ्या पदांवर काम करीत आहेत. जिल्हा युवक अध्यक्ष दयानंद कांबळे, अश्विनी कांबळे, विजय माने, संगीता पाटील, बाबूराव जैताळकर, मालुबाई कांबळे यांनी मनोगत व्यक्त केले.महिला अध्यक्ष दीपाली कांबळे यांनी स्वागत केले. जिल्हाध्यक्ष पुंडलिक नाईक यांनी प्रास्ताविक केले. वसंत लिंगनूरकर यांनी सूत्रसंचालन केले. धोंडिराम कांबळे यांनी आभार मानले.मेळाव्यातील ठराव सावित्रीबाई फुले यांचा पुतळा शिवाजी विद्यापीठाच्या प्रांगणात उभा करण्यात यावा, फायनान्स कंपन्यांकडून अत्यल्प उत्पन्न असलेल्या महिलांनी घेतलेली कर्जे माफ करावी, इंदू मिल येथील बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाच्या कामास लवकर सुरुवात करावी, ब्राह्मण, मराठा, मुस्लिम, इत्यादींसह सर्व जाती धर्मातील फक्त गरिबांना आरक्षण देण्यात यावे, पाच वर्षांपर्यंतची कष्टकरी शेतकऱ्यांची कर्जे माफ करावीत, अशा विविध ठरावांचा यामध्ये समावेश आहे.