शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

देशाची वाटचाल हुकूमशाहीकडे

By admin | Updated: January 9, 2017 00:49 IST

सुभाष देसाई : ब्लॅक पँथरच्या मेळाव्यात सावित्रीबार्इंचा पुतळा विद्यापीठात उभारण्याची मागणी

कोल्हापूर : सध्या देशाची वाटचाल ही हुकूमशाहीकडे जात असून, ते धोकादायक आहे. दिवसेंदिवस महिलांवरील अत्याचार वाढत आहेत. त्याला सरकारच जबाबदार असून, अशा घटना रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजनांची अंमलबजावणी होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन ब्लॅक पँथरचे अध्यक्ष सुभाष देसाई यांनी रविवारी येथे केले. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा पुतळा शिवाजी विद्यापीठाच्या प्रांगणात उभारावा, अशी मागणीही त्यांनी केली.शाहू स्मारक भवन येथे ब्लॅक पँथर पक्षातर्फे सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त महिला मेळावा व पक्षप्रवेश, अशा संयुक्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी सुभाष देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘आरपीआय’च्या वंदना कांबळे, संगीता पाटील, प्रवीण आजरेकर यांनी ब्लॅक पँथर पक्षात प्रवेश केला. देसाई म्हणाले, पूर्वीच्या काळात अनेक आव्हाने पेलत सावित्रीबाई फुलेंनी स्त्री शिक्षणाची कवाडे खुली केली. अशा क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा पुतळा शिवाजी विद्यापीठाच्या प्रांगणात उभारला पाहिजे.वंदना कांबळे म्हणाल्या, सावित्रीबाई फुलेंनी महिलांच्या शिक्षणासाठी योगदान दिल्यामुळेच आज महिला अनेक मोठ्या पदांवर काम करीत आहेत. जिल्हा युवक अध्यक्ष दयानंद कांबळे, अश्विनी कांबळे, विजय माने, संगीता पाटील, बाबूराव जैताळकर, मालुबाई कांबळे यांनी मनोगत व्यक्त केले.महिला अध्यक्ष दीपाली कांबळे यांनी स्वागत केले. जिल्हाध्यक्ष पुंडलिक नाईक यांनी प्रास्ताविक केले. वसंत लिंगनूरकर यांनी सूत्रसंचालन केले. धोंडिराम कांबळे यांनी आभार मानले.मेळाव्यातील ठराव सावित्रीबाई फुले यांचा पुतळा शिवाजी विद्यापीठाच्या प्रांगणात उभा करण्यात यावा, फायनान्स कंपन्यांकडून अत्यल्प उत्पन्न असलेल्या महिलांनी घेतलेली कर्जे माफ करावी, इंदू मिल येथील बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाच्या कामास लवकर सुरुवात करावी, ब्राह्मण, मराठा, मुस्लिम, इत्यादींसह सर्व जाती धर्मातील फक्त गरिबांना आरक्षण देण्यात यावे, पाच वर्षांपर्यंतची कष्टकरी शेतकऱ्यांची कर्जे माफ करावीत, अशा विविध ठरावांचा यामध्ये समावेश आहे.