शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्या' शेतकऱ्याचा मृतदेह ताब्यात घेण्यास नकार ! कुटुंबीयांनी धानोरकरांवर केले गंभीर आरोप
2
समीर पाटील कोण, १०० कोटी कुठून आले?;  चंद्रकांत पाटलांवर शिंदेसेनेच्या नेत्याचा गंभीर आरोप
3
“छगन भुजबळ मराठ्यांना शत्रू मानतो, म्हातारा बावचळलाय”; मनोज जरांगे पाटलांची बोचरी टीका
4
भारतासोबतच्या संघर्षादरम्यान मोठी घडामोड; अमेरिका पाकिस्तानला देणार अत्याधुनिक क्षेपणास्त्रे!
5
इटलीच्या पंतप्रधान मेलोनी यांच्याविरुद्ध आंतरराष्ट्रीय न्यायालयात खटला दाखल; गाझाशी आहे कनेक्शन
6
IND vs WI 2nd Test: बुमराहला संघाबाहेर ठेवणार? Playing XI मध्ये 'हे' २ बदल होण्याची शक्यता
7
अरे हा माणूस आहे का 'क्रेडिट कार्ड'? तब्बल १६३८ कार्ड वापरुन कमावतो पैसे; एक रुपयाही कर्ज नाही
8
शिवसेना पक्ष, चिन्हाचा खटला पुन्हा लांबणीवर; अंतिम सुनावणीसाठी पुढील तारीख, कोर्टात आज काय घडलं?
9
देश सोडा अन् IPL खेळा! पॅट कमिन्स-ट्रॅविस हेडला प्रत्येकी ५८-५८ कोटींची ऑफर; ही काय आहे भानगड?
10
Nashik Crime: पाळत ठेवून घराजवळ गाठलं, अमोलची भररस्त्यात सपासप वार करत हत्या; रक्ताच्या थारोळ्यातच गेला जीव
11
कंपनीला एक चूक महागात पडली; सॅलरीपेक्षा ३०० पट रक्कम कर्मचाऱ्याच्या खात्यावर पाठवली, मग जे घडलं...
12
Rajvir Jawanda: लोकप्रिय गायक राजवीर जवंदा यांच्या मृत्युमागचं कारण आलं समोर!
13
पतीवर उकळतं तेल फेकलं; तडफडताना पाहून मिरची पावडर जखमांवर ओतली! पत्नी इतकी क्रूर का झाली?
14
“धनुष्यबाण चिन्ह आम्हाला द्या, अन्यथा गोठवा”; ठाकरे गटाच्या नेत्याची सुप्रीम कोर्टाला विनंती
15
मराठी अभिनेत्री २५ वर्षांनंतर मूळ गावी रमली, कुटुंबासोबतचे व्हिडिओ पोस्ट करत म्हणाली...
16
प्रचंड मानसिक त्रास; पूरन कुमार यांचा सुसाइड नोटमधून 8 IPS आणि 2 IAS अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप
17
लखनऊच्या नवाबांचा वारसा: १७० वर्षांपूर्वी ईस्ट इंडिया कंपनीला ४ कोटींचे कर्ज दिलेले, आजही मिळतेय व्याज...
18
बंपर लिस्टिंग...! या शेअरनं पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांची चांदी केली; दुप्पट केला पैसा, दिला छप्परफाड परतावा
19
Vastu Tips: घराच्या उत्तर दिशेला ठेवा 'या' ५ वस्तू, कुबेर महाराज म्हणतील तथास्तु!
20
टेस्लाचा मोठा निर्णय! भारतात 'स्वस्त' इलेक्ट्रिक कार आणण्याची तयारी; २ नवीन मॉडेल लाँच, काय आहे किंमत?

देशाला ध्येयवादी शिक्षकांची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2018 00:38 IST

कोल्हापूर : उद्याच्या भारताचा विचार करता निष्ठावंत आणि ध्येयवादी शिक्षकांची गरज आहे. त्या दृष्टीने सर्व घटकांनी गंभीरपणे विचार करण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांनी रविवारी येथे केले.मराठी साहित्यातील ज्येष्ठ समीक्षक प्राचार्य डॉ. प्रकाश कुंभार यांच्या गौरव समारंभ आणि गौरवग्रंथ प्रकाशनाच्या ...

कोल्हापूर : उद्याच्या भारताचा विचार करता निष्ठावंत आणि ध्येयवादी शिक्षकांची गरज आहे. त्या दृष्टीने सर्व घटकांनी गंभीरपणे विचार करण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांनी रविवारी येथे केले.मराठी साहित्यातील ज्येष्ठ समीक्षक प्राचार्य डॉ. प्रकाश कुंभार यांच्या गौरव समारंभ आणि गौरवग्रंथ प्रकाशनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. राजर्षी शाहू स्मारक भवनातील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कौन्सिल आॅफ एज्युकेशनच्या अध्यक्षा रजनीताई मगदूम, तर क्रांती उद्योग व शैक्षणिक समूहाचे अध्यक्ष अरुणअण्णा लाड, मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष उत्तम कांबळे, ‘नॅक’चे सल्लागार डॉ. जगन्नाथ पाटील, माजी महापौर मारुतराव कातवरे प्रमुख उपस्थित होते.डॉ. कोत्तापल्ले म्हणाले, औद्योगिक, शिक्षण, आदी क्षेत्रांची स्थिती पाहता, देशात येत्या काही वर्षांत अराजकता निर्माण होण्याचे चित्र दिसते. अशा स्थितीत निष्ठावंत, ध्येयवादी शिक्षकांची गरज आहे. मात्र, असे शिक्षक निवृत्त होत आहेत. प्राध्यापकांच्या नियुक्तीबाबतची स्थिती सर्वांनाच माहीत आहे. त्यामुळे निष्ठावंत आणि ध्येयवादी शिक्षक मिळतील का? हा प्रश्न आहे.‘नॅक’चे सल्लागार डॉ. पाटील म्हणाले, देशात उच्च शिक्षणाची स्थिती गंभीर आहे. बेरोजगारांची फौज वाढल्यास अराजकता निर्माण होईल. ते टाळण्यासाठी प्राचार्य, शिक्षक आणि संस्थांनी बांधीलकीच्या भूमिकेतून कार्यरत राहावे.क्रांती समूहाचे अध्यक्ष लाड म्हणाले, कुंभार यांच्यावर क्रांतिअग्रणी जी. डी. बापू लाड यांच्या विचार, संस्कारांचा प्रभाव असल्याने त्यांच्याकडून शिक्षण क्षेत्रात चांगले काम झाले. मगदूम म्हणाल्या, प्राचार्य कुंभार यांनी शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली. त्यांनी साहित्य, सामाजिक चळवळीत योगदान द्यावे.लाड यांच्या हस्ते प्राचार्य कुंभार यांचा सत्कार करण्यात आला. डॉ. जगन्नाथ पाटील यांच्या हस्ते मानपत्र प्रदान करण्यात आले. यानंतर प्रमुख उपस्थितांच्या हस्ते ‘मराठी साहित्य अवकाशातील संदर्भ’ या गौरवग्रंथाचे आणि ‘दलित साहित्य : काही विचार काही दिशा’ या ग्रंथाचे प्रकाशन झाले. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुरेश शिपूरकर, प्राचार्य कुंभार यांच्या पत्नी ज्योती यांचा सत्कार करण्यात आला. यानंतर माजी संमेलनाध्यक्ष उत्तम कांबळे, माजी महापौर मारुतराव कातवरे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी यशवंतराव चव्हाण, गोपाळ गावडे, दीपक वळवी, मीना बडसकर, मोहन पाटील, आदी उपस्थित होते. डॉ. शिवकुमार सोनाळकर यांनी प्रास्ताविक केले. डॉ. सुजय पाटील यांनी मानपत्राचे वाचन केले.विचाराच्या वारसातून घडलोसत्काराने जबाबदारी वाढते. हा सत्कार माझा नसून आपल्या सर्वांचा आहे. जी. डी. बापू लाड, अप्पा लाड, शाहीर निकम, रत्नाप्पाण्णा कुंभार यांच्या विचारांच्या वारशातून घडलो. विद्यार्थी घडवीत गेलो. यापुढेदेखील या विचारांनी कार्यरत राहीन, असे प्राचार्य कुंभार यांनी सांगितले.नागनाथ कोत्तापल्ले म्हणालेअभ्यासक चिकित्सक असावा. त्याने विद्यार्थी, समाजाला नवे भान दिले पाहिजे. ते प्राचार्य कुंभार यांनी जाणले आहे.हा गौरवग्रंथ बुद्धीला धार देणारा आहे.चांगल्या आर्थिक धोरणांमुळेच देश महासत्ता होईल. देशाची समृद्धी उद्योगांतून वाढते.देशात मूळ प्रश्नांकडे दुर्लक्ष करायला लावणारी यंत्रणा कार्यरत