शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

देश कोणाची जहागीरदारी नाही

By admin | Updated: August 8, 2016 00:09 IST

अब्दुल गफार मलिक : शिक्षण, आरक्षण, संरक्षणाची मुस्लिम समाजाला गरज

कोल्हापूर : विविध जातिधर्मांतील माणसांचा हा देश आहे. ती कोणा एकाची जहागीरदारी नाही, हे मुस्लिममुक्त भारत करायला निघालेल्यांनी लक्षात ठेवावे, असा इशारा देत शिक्षण, आरक्षण, संरक्षणाची मुस्लिम समाजाला गरज असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी कॉँग्रेस अल्पसंख्याक सेलचे प्रदेशाध्यक्ष अब्दुल गफार मलिक यांनी केले. राष्ट्रवादी कॉँग्रेस अल्पसंख्याक सेलच्या वतीने रविवारी आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. मलिक म्हणाले, मुस्लिममुक्त भारत करण्याची भाषा साध्वी करीत आहेत; पण या देशात १७ टक्क्यांहून अधिक मुस्लिम समाज आहे. समाजात विनाकारण तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न कोणी करू नये. ज्यांना शिवाजी महाराज कळले नाहीत, त्यांना ‘जय शिवाजी, जय भवानी’ची घोषणा देण्याचा अधिकार नाही. त्यांनी खरा इतिहास जाणून घेण्याचा प्रयत्न करावा. शरद पवार यांनी खऱ्या अर्थाने शाहू-फुले-आंबेडकर यांच्या विचारांचे राजकारण व समाजकारण केले असून, सर्वधर्मीय लोकांसाठी त्यांनी उभ्या केलेल्या कामांचा डोंगर दुर्दैवाने महाराष्ट्रात तळागाळापर्यंत पोहोचू शकला नाही. अल्पसंख्याक सेलच्या कार्यकर्त्यांनी आगामी काळात पवार यांचे विचार पोहोचवत असतानाच बहुजन समाजाला ताकद देण्यासाठी काम करावे, असे आवाहनही मलिक यांनी केले. राष्ट्रवादी कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, शहराध्यक्ष राजेश लाटकर यांनी मनोगत व्यक्त केले. अल्पसंख्याक सेलचे जिल्हाध्यक्ष मुनीर शेख यांनी स्वागत केले. मुस्ताक सौदागर यांनी सूत्रसंचालन केले. उपमहापौर शमा मुल्ला, जिल्हा सरचिटणीस अनिल साळोखे, जिल्हा बॅँकेचे संचालक बाबासाहेब पाटील, ‘गोकुळ’चे माजी संचालक फिरोजखान पाटील, आदी उपस्थित होते. जिल्हा कार्यकारिणी व तालुकाध्यक्ष नियुक्तीची पत्रे यावेळी देण्यात आली. ेंधर्मयुद्ध नव्हे सत्तायुद्ध शिवाजी महाराज व अफझलखान यांच्यामध्ये झालेल्या युद्धाला धर्मयुद्धाचे स्वरूप देण्यात आले. हे धर्मयुद्ध नव्हे तर सत्तायुद्ध होते; पण दुर्दैवाने त्याचा चुकीचा प्रचार केल्याची टीकाही मलिक यांनी केली. शहरातील कार्यकर्त्यांची दांडी मेळावा शहर व जिल्हा असा संयुक्त होता, पण राजेश लाटकर, शमा मुल्ला वगळता राष्ट्रवादीचा एकही पदाधिकारी उपस्थित नव्हता. केवळ व्यासपीठा मागील डिजिटलवर पदाधिकारी; पण व्यासपीठावर मात्र कोणीच नाहीत, अशी अवस्था झाल्याची चर्चा होती.