शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यातील जिल्हा परिषदांमधील अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या सविस्तर
2
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
3
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
4
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
5
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
6
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
7
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
8
"भविष्यात मुख्यमंत्री होण्याची माझ्याकडे ऑफर", असं कोण म्हणालं? वाचा
9
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
10
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान
11
क्रूरतेचा कळस! गुजरातमधून विमानानं आला, गर्लफ्रेंडवर अत्याचार केला अन् ५१ वेळा स्क्रूड्रायव्हर खुपसला; कोर्टाने सुनावली शिक्षा
12
एकेकाळी ५००० रुपये होता पगार, आता त्यांची कंपनी आणतेय ३८२० कोटींचा IPO; कोण आहे ही व्यक्ती?
13
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
14
UPSC ची तयारी करणाऱ्या युवकानं उचललं धक्कादायक पाऊल; स्वत:चा प्रायव्हेट पार्ट कापला, कारण...
15
विजयादशमी २०२५: दसरा कधी आहे? देशभरात होतो साजरा; पाहा, महाराष्ट्रातील वैशिष्ट्य-मान्यता
16
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
17
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
18
छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये २ नक्षलवादी ठार; गेल्या २४ तासांत दुसरी मोठी कारवाई
19
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
20
"सरकारने ओबीसींचा विश्वासघात केला, आतातरी तो अन्यायकारी शासन निर्णय रद्द करा’’, काँग्रेसची मागणी 

देश कोणाची जहागीरदारी नाही

By admin | Updated: August 8, 2016 00:09 IST

अब्दुल गफार मलिक : शिक्षण, आरक्षण, संरक्षणाची मुस्लिम समाजाला गरज

कोल्हापूर : विविध जातिधर्मांतील माणसांचा हा देश आहे. ती कोणा एकाची जहागीरदारी नाही, हे मुस्लिममुक्त भारत करायला निघालेल्यांनी लक्षात ठेवावे, असा इशारा देत शिक्षण, आरक्षण, संरक्षणाची मुस्लिम समाजाला गरज असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी कॉँग्रेस अल्पसंख्याक सेलचे प्रदेशाध्यक्ष अब्दुल गफार मलिक यांनी केले. राष्ट्रवादी कॉँग्रेस अल्पसंख्याक सेलच्या वतीने रविवारी आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. मलिक म्हणाले, मुस्लिममुक्त भारत करण्याची भाषा साध्वी करीत आहेत; पण या देशात १७ टक्क्यांहून अधिक मुस्लिम समाज आहे. समाजात विनाकारण तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न कोणी करू नये. ज्यांना शिवाजी महाराज कळले नाहीत, त्यांना ‘जय शिवाजी, जय भवानी’ची घोषणा देण्याचा अधिकार नाही. त्यांनी खरा इतिहास जाणून घेण्याचा प्रयत्न करावा. शरद पवार यांनी खऱ्या अर्थाने शाहू-फुले-आंबेडकर यांच्या विचारांचे राजकारण व समाजकारण केले असून, सर्वधर्मीय लोकांसाठी त्यांनी उभ्या केलेल्या कामांचा डोंगर दुर्दैवाने महाराष्ट्रात तळागाळापर्यंत पोहोचू शकला नाही. अल्पसंख्याक सेलच्या कार्यकर्त्यांनी आगामी काळात पवार यांचे विचार पोहोचवत असतानाच बहुजन समाजाला ताकद देण्यासाठी काम करावे, असे आवाहनही मलिक यांनी केले. राष्ट्रवादी कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, शहराध्यक्ष राजेश लाटकर यांनी मनोगत व्यक्त केले. अल्पसंख्याक सेलचे जिल्हाध्यक्ष मुनीर शेख यांनी स्वागत केले. मुस्ताक सौदागर यांनी सूत्रसंचालन केले. उपमहापौर शमा मुल्ला, जिल्हा सरचिटणीस अनिल साळोखे, जिल्हा बॅँकेचे संचालक बाबासाहेब पाटील, ‘गोकुळ’चे माजी संचालक फिरोजखान पाटील, आदी उपस्थित होते. जिल्हा कार्यकारिणी व तालुकाध्यक्ष नियुक्तीची पत्रे यावेळी देण्यात आली. ेंधर्मयुद्ध नव्हे सत्तायुद्ध शिवाजी महाराज व अफझलखान यांच्यामध्ये झालेल्या युद्धाला धर्मयुद्धाचे स्वरूप देण्यात आले. हे धर्मयुद्ध नव्हे तर सत्तायुद्ध होते; पण दुर्दैवाने त्याचा चुकीचा प्रचार केल्याची टीकाही मलिक यांनी केली. शहरातील कार्यकर्त्यांची दांडी मेळावा शहर व जिल्हा असा संयुक्त होता, पण राजेश लाटकर, शमा मुल्ला वगळता राष्ट्रवादीचा एकही पदाधिकारी उपस्थित नव्हता. केवळ व्यासपीठा मागील डिजिटलवर पदाधिकारी; पण व्यासपीठावर मात्र कोणीच नाहीत, अशी अवस्था झाल्याची चर्चा होती.