शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
2
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
3
१ रुपया द्या आणि एसी घ्या, नव्या GST दरांवर सुरू केलं बुकिंग; ग्राहकांना खेचण्यासाठी कंपन्यांमध्ये स्पर्धा
4
'स्पोर्टिंग क्लब'च्या निवडणुकीत शिंदेसेनेला शह देण्यासाठी झाली भाजपा-मनसे-उद्धवसेनेची युती
5
TVS Success Story: इंग्रजांसमोर हार मानली नाही, बँकेची नोकरी सोडून सायकल रिपेरिंगचं काम सुरू केलं; आज आहे ₹१,६६,२०० कोटींची कंपनी
6
Crime: ट्यूशनसाठी गेली, नंतर तुकड्या-तुकड्यांमध्ये मिळाला मुलीचा मृतदेह; आईवडिलांचा आक्रोश, शिक्षकानेच...
7
पितृपक्ष २०२५: स्वतःचे आणि कुटुंबाचे पिंडदान केल्यावरच नागा साधू बनता येते; सविस्तर वाचा
8
आईकडे संपत्ती नसली, तरीही मुलांच्या संगोपनाचा तिला हक्क; जम्मू-काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालयाचा निर्णय
9
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
10
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
11
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
12
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
13
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
14
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
15
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
16
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
17
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
18
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
19
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
20
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच

कोथिंबिरीची पेंढी २० रुपयांवर; लिंबूचे दर घसरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2018 01:06 IST

कोल्हापूर : आठ दिवसांच्या उन्हाचा परिणाम भाजीपाल्याच्या दरांवर झाला. रविवार आठवडी बाजारात कोथिंबिरीची पेंढी १० रुपयांवरून २० रुपयांवर गेली होती. कोबी, कारली, गवार, शेपू, पोकळा यांच्या दरांत वाढ झाली आहे.दुसरीकडे, साखर ३० रुपये प्रतिकिलोवरून ३६ रुपये, तर बेदाण्यांच्या दरात तब्बल शंभर रुपयांची वाढ झाली. बेदाणा ३५० रुपयांच्या घरात गेला आहे. ...

कोल्हापूर : आठ दिवसांच्या उन्हाचा परिणाम भाजीपाल्याच्या दरांवर झाला. रविवार आठवडी बाजारात कोथिंबिरीची पेंढी १० रुपयांवरून २० रुपयांवर गेली होती. कोबी, कारली, गवार, शेपू, पोकळा यांच्या दरांत वाढ झाली आहे.दुसरीकडे, साखर ३० रुपये प्रतिकिलोवरून ३६ रुपये, तर बेदाण्यांच्या दरात तब्बल शंभर रुपयांची वाढ झाली. बेदाणा ३५० रुपयांच्या घरात गेला आहे. आंब्यांना मागणी कमी होती; पण दर स्थिर होते. लिंबू १० रुपयांना १० होते. दरम्यान, रविवारी झालेल्या पावसामुळे ग्राहकांची बाजारात दैना उडाली.शहरातील लक्ष्मीपुरी आठवडी बाजारासह कपिलतीर्थ मार्केट, राजारामपुरीतील नार्वेकर मार्केट, कसबा बावड्यासह अन्यत्र ग्राहकांची गर्दी होती. दुपारी अचानक आलेल्या पावसामुळे ग्राहकांची काही काळ तारांबळ उडाली. त्यानंतर पावसाची उघडीप झाल्यावर मात्र ग्राहकांची गर्दी होऊ लागली.मेथीच्या पेंढीचा दर २० रुपये झाल्याने ग्राहकांनी तिच्याकडे पाठ फिरविल्याचे दिसत होते. कोबी १० रुपये, वांगी, ढबू मिरची, वरणा, दोडका, पोकळा २० रुपये, गवार, कारली ३० रुपये; तर शेपू पेंढी १० रुपये पावकिलो असा दर होता.याचबरोबर भेंडी व गाजराच्या दरांत किंचितशी उतरण झाली आहे. भेंडी २० रुपये, तर गाजर २५ रुपये प्रतिकिलो होते. दोडका पाच रुपयांनी उतरला. तो २५ रुपये झाला होता. कोथिंबिरीची पेंढी २० रुपये होती.तसेच पेरू, सफरचंद यांच्या दरांत घसरण झाली आहे. घाऊक बाजारात पेरूचा २५० रुपयांना डाग, तर किरकोळ बाजारात सफरचंद ८० रुपये प्रतिकिलो होते. तोतापुरी, मद्रास हापूस व मद्रास पायरी आंब्यांच्या दरात वाढ झाली आहे. कांदा, बटाटा व लसूण यांचे दर स्थिर होते.असे आहेत दर (प्रतिकिलो)तांदूळ : ४४ ते ६४ रुपयांपर्यंतजाडा तांदूळ : २४ ते ४० रुपयेतूरडाळ : ६४ व ६८ रुपयेसाखर : ३६ रुपयेहरभराडाळ : ५२ व ६० रुपयेसरकी : ९० रुपयेशाबू : ५० ते ५५ रुपयेवरी : ७२ व ८० रुपयेकाजू : ९०० रुपयेशेंगतेल : १२० रुपयेबदाम ७५० ते ८०० रुपये.सुके खोबरे उतरलेगेल्या दोन महिन्यांपासून सुके खोबऱ्याचा प्रतिकिलो दर हा २२० ते २३० रुपयांच्या घरात होता. चटणी व मसाला करण्यासाठी सुके खोबरे वापरले जाते; पण आता मागणी कमी झाल्यामुळे सुक्या खोबºयाचा दर २०० रुपये होता. २० रुपयांची घसरण झाली आहे.