शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
3
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
4
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
5
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
6
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
7
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
8
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
9
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
10
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
11
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
12
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
13
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
14
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
15
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
16
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
17
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
18
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
19
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
20
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
Daily Top 2Weekly Top 5

कोथिंबिरीची पेंढी २० रुपयांवर; लिंबूचे दर घसरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2018 01:06 IST

कोल्हापूर : आठ दिवसांच्या उन्हाचा परिणाम भाजीपाल्याच्या दरांवर झाला. रविवार आठवडी बाजारात कोथिंबिरीची पेंढी १० रुपयांवरून २० रुपयांवर गेली होती. कोबी, कारली, गवार, शेपू, पोकळा यांच्या दरांत वाढ झाली आहे.दुसरीकडे, साखर ३० रुपये प्रतिकिलोवरून ३६ रुपये, तर बेदाण्यांच्या दरात तब्बल शंभर रुपयांची वाढ झाली. बेदाणा ३५० रुपयांच्या घरात गेला आहे. ...

कोल्हापूर : आठ दिवसांच्या उन्हाचा परिणाम भाजीपाल्याच्या दरांवर झाला. रविवार आठवडी बाजारात कोथिंबिरीची पेंढी १० रुपयांवरून २० रुपयांवर गेली होती. कोबी, कारली, गवार, शेपू, पोकळा यांच्या दरांत वाढ झाली आहे.दुसरीकडे, साखर ३० रुपये प्रतिकिलोवरून ३६ रुपये, तर बेदाण्यांच्या दरात तब्बल शंभर रुपयांची वाढ झाली. बेदाणा ३५० रुपयांच्या घरात गेला आहे. आंब्यांना मागणी कमी होती; पण दर स्थिर होते. लिंबू १० रुपयांना १० होते. दरम्यान, रविवारी झालेल्या पावसामुळे ग्राहकांची बाजारात दैना उडाली.शहरातील लक्ष्मीपुरी आठवडी बाजारासह कपिलतीर्थ मार्केट, राजारामपुरीतील नार्वेकर मार्केट, कसबा बावड्यासह अन्यत्र ग्राहकांची गर्दी होती. दुपारी अचानक आलेल्या पावसामुळे ग्राहकांची काही काळ तारांबळ उडाली. त्यानंतर पावसाची उघडीप झाल्यावर मात्र ग्राहकांची गर्दी होऊ लागली.मेथीच्या पेंढीचा दर २० रुपये झाल्याने ग्राहकांनी तिच्याकडे पाठ फिरविल्याचे दिसत होते. कोबी १० रुपये, वांगी, ढबू मिरची, वरणा, दोडका, पोकळा २० रुपये, गवार, कारली ३० रुपये; तर शेपू पेंढी १० रुपये पावकिलो असा दर होता.याचबरोबर भेंडी व गाजराच्या दरांत किंचितशी उतरण झाली आहे. भेंडी २० रुपये, तर गाजर २५ रुपये प्रतिकिलो होते. दोडका पाच रुपयांनी उतरला. तो २५ रुपये झाला होता. कोथिंबिरीची पेंढी २० रुपये होती.तसेच पेरू, सफरचंद यांच्या दरांत घसरण झाली आहे. घाऊक बाजारात पेरूचा २५० रुपयांना डाग, तर किरकोळ बाजारात सफरचंद ८० रुपये प्रतिकिलो होते. तोतापुरी, मद्रास हापूस व मद्रास पायरी आंब्यांच्या दरात वाढ झाली आहे. कांदा, बटाटा व लसूण यांचे दर स्थिर होते.असे आहेत दर (प्रतिकिलो)तांदूळ : ४४ ते ६४ रुपयांपर्यंतजाडा तांदूळ : २४ ते ४० रुपयेतूरडाळ : ६४ व ६८ रुपयेसाखर : ३६ रुपयेहरभराडाळ : ५२ व ६० रुपयेसरकी : ९० रुपयेशाबू : ५० ते ५५ रुपयेवरी : ७२ व ८० रुपयेकाजू : ९०० रुपयेशेंगतेल : १२० रुपयेबदाम ७५० ते ८०० रुपये.सुके खोबरे उतरलेगेल्या दोन महिन्यांपासून सुके खोबऱ्याचा प्रतिकिलो दर हा २२० ते २३० रुपयांच्या घरात होता. चटणी व मसाला करण्यासाठी सुके खोबरे वापरले जाते; पण आता मागणी कमी झाल्यामुळे सुक्या खोबºयाचा दर २०० रुपये होता. २० रुपयांची घसरण झाली आहे.