शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

पंचगंगेत मृत माशांचा खच

By admin | Updated: November 11, 2015 23:38 IST

शिरोळमधील प्रकार : नदी प्रदूषित करणाऱ्या घटकांवर कारवाई करण्याची मागणी

कुरुंदवाड : पंचगंगा नदीपात्रात रसायनयुक्त सांडपाणी सोडल्याने नदीला काळेकुट्ट पाणी आले आहे. तसेच पाण्याला उग्र वास येत असून, तेरवाड बंधाऱ्यात मृत माशांचा थर पडला आहे. त्यामुळे नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त होत असून, शिरोळ तालुक्यातील अनेक गावांच्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.दरम्यान, पंचगंगा नदीकाठी मृत माशांचा थर पडल्याचे समजताच नदी प्रदूषण विरोधी मुंबई उच्च न्यायालयात न्यायालयीन लढा देणारे अ‍ॅड. धैर्यशील सुतार यांनी तेरवाड बंधाऱ्याला भेट देऊन पाहणी केली. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या दुर्लक्षामुळेच येथील नागरिकांना दूषित पाण्याला सामोरे जावे लागत असून, इचलकरंजी नगरपालिका व इचलकरंजी सीईटीपीची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी मुंबई उच्च न्यायालयात करणार असल्याचे त्यांनी सांगितले.गेल्या आठ दिवसांपासून पंचगंगा नदीतील पाणी आटल्याने शेतकरी वर्गातून चिंता व्यक्त होत असतानाच धरणातून पाणी सोडल्याने शेतकरी सुखावला होता. मात्र, पाण्याच्या प्रवाहाचा व ऐन दिवाळीमध्ये प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सुटीचा फायदा घेत इचलकरंजी शहरातील सांडपाणी व औद्योगिक कारखान्याचे रसायनयुक्त सांडपाणी प्रक्रिया न करता थेट नदीपात्रात सोडल्याने पंचगंगा नदीपात्रातील पाणी पूर्णपणे दूषित बनले आहे.धरणातील पाण्यापेक्षा सांडपाण्याचे प्रमाण जास्त झाल्याने पाणी काळेकुट्ट बनले आहे. तेरवाड बंधाऱ्यातून पाणी विसर्ग होताना फेसाळत असून, त्याचा उग्र वास येत आहे. शिवाय रसायनयुक्त पाण्यामुळे पाण्यातील आॅक्सिजनचे प्रमाण घटल्याने नदीपात्रातील मासे तडफडून मरून पडत आहेत. लहान-मोठ्या मृत माशांचा मोठा थर तेरवाड बंधाऱ्यावर येऊन साचला आहे. बुधवारी सकाळी मासेमारी करणाऱ्या बागडी समाजातील नागरिकांनी मृत मासे गोळा करण्यासाठी गर्दी केली होती. तसेच बंधाऱ्यातून पाण्याच्या विसर्गाबरोबर मासेही वाहून जात होते. दूषित पाण्यामुळे शिरोळ तालुक्यातील पंचगंगा नदीकाठच्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. औद्योगिक सांडपाणी जबाबदारपंचगंगेत कोल्हापूरपासून इचलकरंजीपर्यंतच्या औद्योगिकीकरणाचे पाणी सोडल्याने उन्हाळ्यात नदीतील मासे मरून पडत असत. यावेळी मात्र तेरवाड बंधाऱ्यातच मासे मरून पडल्याने इचलकरंजी शहरातीलच औद्योगिकीकरणाच्या सांडपाण्यामुळे मासे मेले आहेत, हे सिद्ध होत आहे. त्यामुळे नदी प्रदूषणाला इचलकरंजीतील औद्योगिक कारखानेच जबाबदार आहेत.