शहरं
Join us  
Trending Stories
1
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
2
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
3
Waves Summit 2025: "सॉरी, माझी हार्टबीट खूप...", पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर बोलताना कार्तिक आर्यन झाला नर्व्हस
4
Waves 2025: सिनेसृष्टीतील या ५ दिग्गज सेलिब्रिटींच्या स्मरणार्थ टपाल तिकीटं, पंतप्रधान मोदींनी केलं अनावरण
5
IPL 2025: Mumbai Indians मध्ये आला नवा 'भिडू', कोण आहे Raghu Sharma? किती मिळाले पैसे?
6
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा
7
जेट विमानातून एक महिन्यापूर्वी पडलेला बॉम्ब केला निकामी, अन्यथा घडला असता मोठा अनर्थ 
8
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
9
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
10
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   
11
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
12
किती ती चिडचिड! तुमच्या रागावर आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
13
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
14
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
15
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
16
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसंदर्भात ICC ची मोठी घोषणा; सलामीच्या लढतीसह फायनलची तारीख ठरली!
17
छाया कदम यांनी 'ती' गोष्ट अभिमानाने सांगितली अन् अडचणी वाढल्या; अभिनेत्रीची होणार चौकशी
18
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
19
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
20
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा

हागणदारीमुक्तीसाठी नगरसेवकांनी सक्रिय व्हावे

By admin | Updated: April 12, 2017 00:17 IST

उपसचिव सुधाकर बोबडे यांचे आवाहन : हागणदारीमुक्त न झालेले इचलकरंजी हे जिल्ह्यातील एकमेव शहर

इचलकरंजी : जिल्ह्यात फक्त इचलकरंजी हे एकच शहर हागणदारीमुक्त झालेले नाही. स्वच्छता व हागणदारीमुक्तीसारख्या अभियानासाठी लोकप्रतिनिधींचाही सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. म्हणून शहराच्या हागणदारीमुक्तीसाठी नगरसेवकांनी सक्रिय होणे गरजेचे आहे, असे आवाहन स्वच्छ महाराष्ट्र नागरी अभियानाचे उपसचिव सुधाकर बोबडे यांनी केले.इचलकरंजीसारखे शहर अद्यापही हागणदारीमुक्त झालेले नाही. म्हणून शासनाने उपसचिव बोबडे यांना प्रत्यक्ष शहरास भेट देण्यासाठी पाठविले होते. त्यांच्या प्रमुख उपस्थितीत पालिकेच्या सभागृहात घेण्यात आलेल्या विशेष बैठकीमध्ये बोबडे बोलत होते. ते म्हणाले, राज्यात असलेल्या २७ शहरांपैकी १५ शहरे हागणदारीमुक्त झाली आहेत. उर्वरित शहरे हागणदारीमुक्त करण्यासाठी राजकीय हेवेदावे बाजूला ठेवून लोकप्रतिनिधी व प्रशासन यांनी समन्वयाने काम केले पाहिजे.पालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. सुनीलदत्त संगेवार यांनी हागणदारीमुक्तीसाठी गेले सहा महिने केलेल्या प्रयत्नांचा आढावा घेतला. मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ म्हणाले, मे २०१७ पर्यंत हागणदारीमुक्त शहर झाले नाही, तर नगरपालिकेचे शासकीय अनुदान बंद होण्याची शक्यता आहे.बैठकीला संध्या बनसोडे, सुजाता कोरे, तसेच अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. (प्रतिनिधी) गांभीर्यच नसल्यामुळे लोकप्रतिनिधी अनुपस्थितहागणदारीमुक्तीसारख्या विषयावर बोलविलेल्या बैठकीस शासनाचे उपसचिव उपस्थित राहणार असून, मंगळवारच्या या बैठकीसाठी नगरपालिकेकडील पदाधिकारी व नगरसेवकांनी उपस्थित राहावे, अशी निमंत्रणे देण्यात आली होती. तरीसुद्धा नगरसेविका संध्या बनसोडे व सुजाता कोरे वगळता आणि बैठकीचे गांभीर्य न ओळखता अगदी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, आरोग्य समितीच्या सभापती यांच्यासह नगरपालिकेतील पदाधिकारी किंवा नगरसेवक यांनी बैठकीकडे पाठ फिरवली, याचीच जोरदार चर्चा मंगळवारी दिवसभर नगरपालिकेत होती. शौचालय न बांधणाऱ्यांवर कारवाई करास्वच्छ भारत अभियानांतर्गत वैयक्तिक शौचालये बांधण्यासाठी सरकारने घोषित केलेले अनुदान घेऊनसुद्धा शहरातील सुमारे ५०० लाभार्थ्यांनी शौचालये बांधली नाहीत. हा मुद्दासुद्धा बैठकीत उपस्थित झाला. त्याबाबत बोलताना उपसचिव बोबडे यांनी संबंधितांना शौचालये बांधण्यासाठी प्रबोधन करून उद्युक्त करावे, अशी सूचना दिली आणि अखेरचा उपाय म्हणून त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, असाही इशारा दिला.