शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
2
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
3
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
4
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
5
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
6
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
7
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
8
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
9
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
10
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
11
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
12
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
13
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
14
...म्हणून मराठी माणूस मुंबईत राहू शकत नाही !
15
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
16
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
17
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
18
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
19
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
20
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका

हागणदारीमुक्तीसाठी नगरसेवकांनी सक्रिय व्हावे

By admin | Updated: April 12, 2017 00:17 IST

उपसचिव सुधाकर बोबडे यांचे आवाहन : हागणदारीमुक्त न झालेले इचलकरंजी हे जिल्ह्यातील एकमेव शहर

इचलकरंजी : जिल्ह्यात फक्त इचलकरंजी हे एकच शहर हागणदारीमुक्त झालेले नाही. स्वच्छता व हागणदारीमुक्तीसारख्या अभियानासाठी लोकप्रतिनिधींचाही सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. म्हणून शहराच्या हागणदारीमुक्तीसाठी नगरसेवकांनी सक्रिय होणे गरजेचे आहे, असे आवाहन स्वच्छ महाराष्ट्र नागरी अभियानाचे उपसचिव सुधाकर बोबडे यांनी केले.इचलकरंजीसारखे शहर अद्यापही हागणदारीमुक्त झालेले नाही. म्हणून शासनाने उपसचिव बोबडे यांना प्रत्यक्ष शहरास भेट देण्यासाठी पाठविले होते. त्यांच्या प्रमुख उपस्थितीत पालिकेच्या सभागृहात घेण्यात आलेल्या विशेष बैठकीमध्ये बोबडे बोलत होते. ते म्हणाले, राज्यात असलेल्या २७ शहरांपैकी १५ शहरे हागणदारीमुक्त झाली आहेत. उर्वरित शहरे हागणदारीमुक्त करण्यासाठी राजकीय हेवेदावे बाजूला ठेवून लोकप्रतिनिधी व प्रशासन यांनी समन्वयाने काम केले पाहिजे.पालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. सुनीलदत्त संगेवार यांनी हागणदारीमुक्तीसाठी गेले सहा महिने केलेल्या प्रयत्नांचा आढावा घेतला. मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ म्हणाले, मे २०१७ पर्यंत हागणदारीमुक्त शहर झाले नाही, तर नगरपालिकेचे शासकीय अनुदान बंद होण्याची शक्यता आहे.बैठकीला संध्या बनसोडे, सुजाता कोरे, तसेच अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. (प्रतिनिधी) गांभीर्यच नसल्यामुळे लोकप्रतिनिधी अनुपस्थितहागणदारीमुक्तीसारख्या विषयावर बोलविलेल्या बैठकीस शासनाचे उपसचिव उपस्थित राहणार असून, मंगळवारच्या या बैठकीसाठी नगरपालिकेकडील पदाधिकारी व नगरसेवकांनी उपस्थित राहावे, अशी निमंत्रणे देण्यात आली होती. तरीसुद्धा नगरसेविका संध्या बनसोडे व सुजाता कोरे वगळता आणि बैठकीचे गांभीर्य न ओळखता अगदी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, आरोग्य समितीच्या सभापती यांच्यासह नगरपालिकेतील पदाधिकारी किंवा नगरसेवक यांनी बैठकीकडे पाठ फिरवली, याचीच जोरदार चर्चा मंगळवारी दिवसभर नगरपालिकेत होती. शौचालय न बांधणाऱ्यांवर कारवाई करास्वच्छ भारत अभियानांतर्गत वैयक्तिक शौचालये बांधण्यासाठी सरकारने घोषित केलेले अनुदान घेऊनसुद्धा शहरातील सुमारे ५०० लाभार्थ्यांनी शौचालये बांधली नाहीत. हा मुद्दासुद्धा बैठकीत उपस्थित झाला. त्याबाबत बोलताना उपसचिव बोबडे यांनी संबंधितांना शौचालये बांधण्यासाठी प्रबोधन करून उद्युक्त करावे, अशी सूचना दिली आणि अखेरचा उपाय म्हणून त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, असाही इशारा दिला.