शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
3
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
4
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
5
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
6
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
7
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
8
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
9
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
10
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
11
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
12
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
13
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
14
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
15
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
16
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
17
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
18
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
19
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
20
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...

CoronaVirus Lockdown : हमे गाव जाना है, परमिशन दो, यड्रावमध्ये परप्रांतीय कामगार आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2020 18:42 IST

यड्राव येथील पार्वती औद्योगिक वसाहत परिसरातील परप्रांतीय कामगार आपआपल्या प्रांतात जाण्यास उतावीळ आहेत . याकरिता शासनाकडून लवकर परवानगी मिळत नसल्याने ते अस्वस्थ व संतप्त झाल्याने यादकामगारांनी इचलकरंजी जयसिंगपूर मार्गावर दहाच्या सुमारास रस्ता रोको केला "हमे गाव जाना है ""परमिशन दो" या घोषणांनी परिसर दुमदुमला सहाय्यक कामगार आयुक्त अनिल गुरव यांनी कामगारांची समजूत काढल्याने वातावरण शांत झाले .

ठळक मुद्देहमे गाव जाना है, परमिशन दो, यड्रावमध्ये परप्रांतीय कामगार आक्रमक कामगार आयुक्तांच्या समजुतीनंतर वातावरण शांत

यड्राव: येथील पार्वती औद्योगिक वसाहत परिसरातील परप्रांतीय कामगार आपआपल्या प्रांतात जाण्यास उतावीळ आहेत . याकरिता शासनाकडून लवकर परवानगी मिळत नसल्याने ते अस्वस्थ व संतप्त झाल्याने यादकामगारांनी इचलकरंजी जयसिंगपूर मार्गावर दहाच्या सुमारास रस्ता रोको केला "हमे गाव जाना है ""परमिशन दो" या घोषणांनी परिसर दुमदुमला सहाय्यक कामगार आयुक्त अनिल गुरव यांनी कामगारांची समजूत काढल्याने वातावरण शांत झाले .पार्वती औद्योगिक वसाहतीमध्ये उत्तर प्रदेश,बिहार, मध्यप्रदेश, झारखंड ,पश्चिम बंगाल ,आंध्र यासह विविध प्रांतातील कामगारांची संख्या जास्त आहे .देशभरात लॉक डाऊनसुरू झाल्याने या ठिकाणी कामगारांना काम नाही तसेच घरच्या लोकांच्या आठवणीने ते व्याकूळ झाले आहेत.अशा परिस्थितीत काही कामगार आपापल्या जबाबदारीवर चालत तसेच सायकलने सांगली जिल्ह्यात जात असताना त्यांना प्रवेश नाकारला यामुळे त्यांना परत इकडे यावे लागले शासनाकडून ज्या त्या राज्यात कामगारांना पाठवण्याची ऑनलाइन प्रक्रिया सुरू आहे त्यामुळे प्रक्रिया पूर्ण होऊन वाहतूक व्यवस्था झाल्याशिवाय कामगारांना पाठविण्याची व्यवस्था होत नाही .अशी परिस्थिती असताना कामगारांकडे शासन लक्ष देत नसल्याची भावना व घरच्या ओढीची व्याकुळता यामुळे आज सकाळी दहाच्या सुमारास इचलकरंजी जयसिंगपूर रोड वरील गजानन मंदिर या ठिकाणी सर्व कामगार एकत्र आले त्यांनी रस्ता रोको केला.यामुळे वाहतूक ठप्प झाली होती.

"हमे गाव जाना है ,हमे परमिशन दो"हमारी रेल कब छोडेंगे"अशा घोषणा दिल्या यावेळी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रकाश निकम व सहाय्यक कामगार आयुक्त अनिल गुरव यांनी तुम्हाला तुमच्या गावाकडे जाणे करता व्यवस्था शासन करीत आहे.आपल्या नोंदी प्रमाणे आपल्याला रेल्वे निश्चित झाल्यावर आपणास मोबाईल वर मेसेज येईल त्याप्रमाणे आपण त्या त्या ठिकाणी जायचे आहे.

आपण इतके दिवस संयम राखला आणखी दोन-तीन दिवस संयम राखावा आपली सोय करणे देईल अशी समजूत घातल्यानंतर कामगार शांत झाले.  या ठिकाणी आमदार प्रकाश आवाडे डीवायएसपी गणेश बिरादार, जि प सदस्य राजवर्धन नाईक निंबाळकर, प्रसाद खोबरे,खोतवाडीचे सरपंच संजय चोपडे , गजानन नलगे यांच्यासह मान्यवरांनी भेटी दिल्या

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूर