शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
3
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
4
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
5
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
6
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
7
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
8
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
9
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
10
Asha Bhosle: ज्या आवाजाने जग जिंकलं, त्यांच्याच हातच्या चवीने हॉटेल साम्राज्य उभं केलं
11
शांततेचे प्रयत्न अपयशी! इराणसाठी ट्रम्प यांचा खतरनाक 'प्लॅन बी' तयार; भारताच्या तेल पुरवठ्यावरही संकट?
12
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
13
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
14
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
15
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
16
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
17
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
18
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
19
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
20
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus Lockdown : शाळा आता जूनमध्येच भरणार, वर्गांचे निर्जंतुकीकरण आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2020 11:07 IST

कोरोनाच्या पार्श्वभूमीवरील लॉकडाऊनमुळे राज्य शासनाने शाळांना सुटी दिली आहे. त्यासह इयत्ता पहिली ते नववीपर्यंतच्या परीक्षा रद्द केल्या आहेत. कोरोनाबाबतची एकूणच स्थिती पाहता आता जूनमध्ये शाळा सुरू होतील, असे चित्र दिसत आहे.

ठळक मुद्देशाळा आता जूनमध्येच भरणार, वर्गांचे निर्जंतुकीकरण आवश्यकनिकालाबाबत स्पष्टता देण्याची शिक्षकांची मागणी

कोल्हापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवरील लॉकडाऊनमुळे राज्य शासनाने शाळांना सुटी दिली आहे. त्यासह इयत्ता पहिली ते नववीपर्यंतच्या परीक्षा रद्द केल्या आहेत. कोरोनाबाबतची एकूणच स्थिती पाहता आता जूनमध्ये शाळा सुरू होतील, असे चित्र दिसत आहे.

परीक्षा रद्द झाली, तरी निकाल हा जाहीर करावाच लागणार आहे. निकाल कोणत्याही पद्धतीने तयार करावयाचा याबाबत स्पष्ट माहिती शासनाकडून लवकर मिळावी, अशी मागणी शिक्षकांतून होत आहे.विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्यादृष्टीने लॉकडाऊनमुळे दि. १५ मार्चपासून शासनाने शाळांना सुटी जाहीर करण्यात आली. त्यानंतर एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात शाळा सुरू होतील, असे शक्यता होती. मात्र, कोरोनाचे वाढते संकट लक्षात घेऊन लॉकडाऊनचा कालावधी वाढविण्यात आल्याने पहिली ते नववीपर्यंतची परीक्षा रद्द करून शाळांना सुटी देण्यात आली.

दरवर्षी निकाल जाहीर झाल्यानंतर माध्यमिक शाळांना दि. १ मे, तर प्राथमिक शाळांना दि. ८ मेपासून उन्हाळी सुटी सुरू होते. ही सुटी दि. १४ जूनपर्यंत असते. त्यानंतर दि.१५ जूनपासून राज्यातील सर्व शाळा सुरू होतात. मात्र, यावर्षीच्या कोरोना संकटामुळे शाळांचा प्रारंभ जूनमध्ये होईल. पण, त्याबाबतची तारीख बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

शाळांमध्ये विद्यार्थ्यांची होणारी गर्दी लक्षात घेता, त्यांची सुरक्षितता आणि कोरोनाची स्थिती लक्षात घेऊन शाळा सुरू करण्याबाबत शासनपातळीवर निर्णय होण्याची शक्यता आहे. सध्या विविध शाळांमध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवरील स्थलांतरीत झालेल्या नागरिकांसाठी निवारा केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. त्या शाळांसह सर्वच शाळांचा परिसर आणि वर्गांचे निर्जंतुकीकरण करणे आवश्यक ठरणार आहे.

शिक्षण विभागाने नियोजनाची माहिती द्यावीनिकाल तयार करणे. तो जाहीर करण्याची तारीख, लॉकडाऊन शिथील झाल्यानंतर सुटीचा कालावधी आणि त्यानंतर शाळा सुरू करण्याची तारीख याच्या नियोजनाची माहिती राज्याच्या शिक्षण विभागाकडून मिळावी. या मागणीचे निवेदन माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांना दिल्याचे राज्य कायम विनाअनुदानित शाळा कृती समितीचे उपाध्यक्ष खंडेराव जगदाळे यांनी सांगितले.

कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याची साखळी तुटणे आवश्यक आहे. प्रादुर्भाव कमी अथवा थांबल्यानंतरच शाळा सुरू करणे योग्य ठरणार आहे. इयत्ता पहिली ते नववीपर्यंतचा निकाल लावण्याच्या पद्धतीची माहिती शासनाने लवकरात लवकर द्यावी.- संतोष आयरे,उपाध्यक्ष, राज्यमान्य खासगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर महासंघ

विद्यार्थ्यांची सुरक्षिततेसाठी कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाचे संकट दूर झाल्यानंतरच शाळा सुरू करण्यात याव्यात. शाळा सुरू करण्यापूर्वी औषध फवारणी करून त्यांच्या परिसराचे निर्जंतुकीकरण करण्यात यावे.-राजेश वरक, अध्यक्ष, कोल्हापूर महानगर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघ

इयत्ता पहिली ते नववीपर्यंतची परीक्षा होणार नाही. या इयत्तांचा निकाल लावण्याबाबतच्या शासनाच्या २० मार्चच्या परिपत्रकानुसार कार्यवाही करावयाची आहे. त्याबाबतच्या सूचना शाळांना केल्या आहेत.- सत्यवान सोनवणे, शिक्षण उपसंचालक, कोल्हापूर विभाग 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूर