शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
2
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
3
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
4
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
5
जातगणना : मॅजिक की मंडल?
6
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
7
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट
8
हंड्रेड डेज’ : पास कोण? नापास कोण?
9
‘त्या’ बाळांच्या उपचारासाठी २४ लाख रुपये; बाळांचे वजन खूपच कमी, अतिदक्षता विभागात उपचार सुरू
10
भरपाईशिवाय जमीन ताब्यात घेण्याचे कृत्य बेकायदा; उच्च न्यायालयाची सरकारवर टीका
11
‘अमेरिकन आहात? - बिलावर १०४% सेवाशुल्क द्या!
12
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
13
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
14
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
15
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
16
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
17
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
18
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
19
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
20
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 

CoronaVirus Lockdown : मुंबई, ठाणे, पुण्यातून येण्यासाठी सहा हजार जणांची नोंदणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2020 19:10 IST

रेड झोनमध्ये असलेल्या मुंबई, ठाणे व पुणे जिल्ह्यांतून कोल्हापुरात येण्यासाठी सुमारे सहा हजार १४९ जणांनी ऑनलाईन नोंदणी केली आहे. यामुळे जिल्हा प्रशासनाची डोकेदुखी वाढणार आहे. अजून तरी जिल्हा प्रशासनाने रेड झोनमधील कोणालाही प्रवेश न देण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे या नोंदणी केलेल्यांबाबत शासनाकडून काही निर्णय घेतला जातो का, हे पाहावे लागेल. या व्यतिरिक्त परजिल्ह्यांसह परराज्यांतूनही कोल्हापुरात येणाऱ्यांचा ओघ मोठा आहे.

ठळक मुद्दे जिल्हा प्रशासनाची डोकेदुखी वाढणार परजिल्ह्यांसह राज्यातूनही येणाऱ्यांचा मोठा ओघ

प्रवीण देसाई

कोल्हापूर : रेड झोनमध्ये असलेल्या मुंबई, ठाणे व पुणे जिल्ह्यांतून कोल्हापुरात येण्यासाठी सुमारे सहा हजार १४९ जणांनी ऑनलाईन नोंदणी केली आहे. यामुळे जिल्हा प्रशासनाची डोकेदुखी वाढणार आहे. अजून तरी जिल्हा प्रशासनाने रेड झोनमधील कोणालाही प्रवेश न देण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे या नोंदणी केलेल्यांबाबत शासनाकडून काही निर्णय घेतला जातो का, हे पाहावे लागेल. या व्यतिरिक्त परजिल्ह्यांसह परराज्यांतूनही कोल्हापुरात येणाऱ्यांचा ओघ मोठा आहे.जिल्ह्यातून परराज्यांसह परजिल्ह्यांत जाण्यासाठी व परराज्यांसह परजिल्ह्यांतून कोल्हापुरात येणाऱ्यांसाठी शासनाच्या निर्देशानुसार जिल्हा प्रशासनाने लिंक तयार केली आहे. यावर येणाऱ्यांची व जाणाऱ्यांची ऑनलाईन नोंदणी केली जात आहे. यामध्ये कोल्हापुरात येण्यासाठी मुंबईहून एक हजार ९४१ जणांंनी, ठाण्याहून एक हजार ९६५ जणांनी व पुण्याहून दोन हजार २४३ जणांनी नोंदणी केली आहे.

हे तीनही जिल्हे रेड झोनमध्ये असल्याने तसेच येथून येणाऱ्यांची संख्या ही मोठी असल्याने जिल्हा प्रशासनाची डोकेदुखी वाढणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी रेड झोनमधील कोणालाही जिल्ह्यात प्रवेश देणार नसल्याचे यापूर्वीच जाहीर केले आहे. रेड झोनमधील व्यक्तींनी बाहेर जाऊ नये व त्यांना जिल्ह्यात प्रवेश देऊ नये, असे सरकारचेच निर्देश आहेत. परंतु यदाकदाचित यांना जिल्ह्यात प्रवेश देण्याचा निर्णय झाल्यास संपूर्ण जिल्ह्याचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे.जिल्ह्यात येण्यासाठी परराज्य-परजिल्ह्यांतील नोंदणीजिल्ह्यात येण्यासाठी गुजरातहून १८२, गोवा ११७, तेलंगणा १०३, दिल्ली ७४, मध्यप्रदेश ३३, उत्तरप्रदेश २९, तमिळनाडू ४५, राजस्थान २५, आंध्रप्रदेश येथील २५ जणांनी नोंदणी केली आहे. त्याचबरोबर परजिल्ह्यांतून पालघर ५२५, सांगली ३७३, सातारा २१३, रायगड ३८२, सोलापूर ८३, सिंधुदुर्ग ९०, नाशिक येथील ७४ जणांनी नोंदणी केली आहे.जिल्ह्यातून बाहेर जाण्यासाठी नोंदणीजिल्ह्यातून परराज्यांत जाण्यासाठी उत्तर प्रदेश ६०५१, बिहार ३७५६, कर्नाटक २७५८, राजस्थान १९८८, पश्चिम बंगाल ८६६, झारखंड ७८०, गोवा ३२४, तमिळनाडू येथील ८२ जणांची नोंदणी झाली आहे; तर परजिल्ह्यांत जाण्यासाठी पुणे १६०६, सांगली ११३६, सातारा ३०८, रत्नागिरी ३१२, मुंबई २५३, सिंधुदुर्ग २३५, लातूर १७९, नाशिक १३५, नंदुरबार येथील १३६ जणांनी नोंदणी केली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूर