शहरं
Join us  
Trending Stories
1
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
2
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
3
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
4
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
5
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
6
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
7
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
8
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
9
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
10
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
11
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
12
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
13
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
14
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
15
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
16
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
17
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
18
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
19
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
20
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!

यंदाही हरिनाम सप्ताह सोहळ्यावर कोरोनाचे सावट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 04:29 IST

सावरवाडी : गतवर्षी मार्च महिन्यात कोरोनामुळे हरिनाम सप्ताह सोहळे बंद झाले. कोरोनाच्या रुग्णांची संख्या पुन्हा यावर्षी वाढू लागल्याने माघवारी ...

सावरवाडी : गतवर्षी मार्च महिन्यात कोरोनामुळे हरिनाम सप्ताह सोहळे बंद झाले. कोरोनाच्या रुग्णांची संख्या पुन्हा यावर्षी वाढू लागल्याने माघवारी संपल्यानंतर सुरू होणारे ग्रामीण भागातील हरिनाम सप्ताह सोहळ्यावर पुन्हा कोरोनाचे सावट स्पष्ट होऊ लागले. हरिनाम सप्ताह सोहळ्यांना ग्रामीण भागात परवानगी मिळणार का नाही याबाबत वारकरीवर्गात द्विधा मनस्थिती निर्माण झाली आहे.

ग्रामीण भागात माघवारी संपल्यानंतर सर्वत्र हरिनाम सप्ताह सोहळ्यांना प्रारंभ होतो. भजन, प्रवचन, हरिकीर्तन, सायुदायिक ज्ञानेश्वरी पारायण, हरी पाठ, आदी धार्मिक कार्यक्रमांना गावागावांत गर्दी असते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक अंतर, चा फज्जा उडालेला असतो. ग्रामदैवतांच्या मंदिर परिसरात गर्दी होत असते. कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता, प्रशासनाकडून धार्मिक कार्यक्रमांना आता मर्यादा येण्याची दाट शक्यता आहे. शिवाय अनेक कार्यक्रम रद्द करावे लागणार आहेत.

हरिनाम सप्ताह कमिटीकडून हरिनाम सप्ताह सोहळ्यातील अनेक कार्यक्रमांना कात्री लावण्यात येत आहे. गेल्या वर्षभरात आषाढ, कार्तिक, माघ या तीन वाऱ्या तीर्थक्षेत्र पंढरपूर मंदिर बंद होते. त्यामुळे वारकऱ्यांना चंद्रभागा दर्शन घेऊन मायगावी परतावे लागले .

यंदाही ग्रामीण भागात सुरू होणारे हरिनाम सप्ताह सोहळ्यावर बंधने येण्याची शक्यता नाकारता येणार नाहीत.