शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

शैक्षणिक वर्षावर यंदाही कोरोनाचे सावट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:19 IST

कोल्हापूर : जिल्ह्यात सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. जुलैमध्ये कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे प्राथमिक, ...

कोल्हापूर : जिल्ह्यात सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. जुलैमध्ये कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शैक्षणिक वर्षावर कोरोनाचे सावट असणार आहे. त्यावर विद्यार्थ्यांना यावर्षीही ऑनलाईन शिक्षण देण्याची तयारी शिक्षण विभाग, शिवाजी विद्यापीठाकडून सुरू झाली आहे.

प्राथमिक आणि माध्यमिक शाळांनी त्यांच्या विद्यार्थ्यांचे निकाल मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लावून निकालपत्रक, प्रगतीपत्रक हे सोशल मीडियावरून विद्यार्थ्यांना पाठविण्यात आले आहे. शिवाजी विद्यापीठाने ऑनलाईन निकाल जाहीर केले आहेत. दरवर्षी पहिली ते दहावीचे शैक्षणिक वर्ष दि. १४ जूनपासून, तर पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे द्वितीय, तृतीय वर्ष जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये, तर प्रथम वर्षाचे जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात सुरू होते. यावर्षीही शाळांचे शैक्षणिक वर्ष दि. १४ जूनपासून सुरू होणार असल्याचे शिक्षण विभागाने यापूर्वी जाहीर केले आहे. शैक्षणिक वर्ष सुरू होईल, मात्र कोरोनामुळे शाळांमध्ये प्रत्यक्षात वर्ग भरणार नाहीत. कोरोनाची तिसरी लाट जुलैमध्ये येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यावर विद्यार्थ्यांची सुरक्षितता म्हणून त्यांचे ऑनलाईन वर्ग सुरू करण्याची तयारी जिल्ह्यातील प्राथमिक, माध्यमिक शिक्षण विभागाकडून सुरू आहेत. विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याबाबत राज्य शासनाच्या निर्देशांची प्रतीक्षा शाळांना लागली आहे. बारावीचा निकाल लागल्यानंतर पदवी प्रथम वर्षाची प्रवेश प्रक्रिया सुरू होते. मात्र, अद्याप ही परीक्षा झालेली नाही. त्यामुळे पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे शैक्षणिक वर्ष, पहिले सत्र सुरू करण्याबाबत विद्यापीठाकडून अधिविभागप्रमुख, प्राचार्यांसमवेत ऑनलाईन चर्चा सुरू आहे.

प्रतिक्रिया

कोरोनाचा संसर्गाची पुढील शक्यता लक्षात घेऊन पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देणे. शिष्यवृत्ती, जवाहर नवोदय विद्यालयाच्या परीक्षाही ऑनलाईन घेण्याची तयारी सुरू आहे. त्याबाबत शिक्षकांना आवश्यक ते प्रशिक्षण दिले जाणार आहे.

- किरण लोहार, माध्यमिक शिक्षणाधिकारी.

कोरोनामुळे पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे शिक्षण सध्या ऑनलाईन पद्धतीने सुरू आहे. ते यापुढेही सुरू ठेवावे लागणार आहे. नवे शैक्षणिक वर्ष, पहिल्या सत्राची सुरुवात करण्याबाबत प्राध्यापक, विभागप्रमुख, प्राचार्य, आदी घटकांशी सध्या ऑनलाईन चर्चा करण्यात येत आहे. त्यानंतर याबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल.

- डॉ. पी. एस. पाटील, प्र-कुलगुरू, शिवाजी विद्यापीठ.