शहरं
Join us  
Trending Stories
1
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
2
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
3
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
4
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
5
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
6
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
7
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
8
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
9
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
10
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
11
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
12
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
13
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
14
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
15
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
16
"भेटायला येतो असा मी मित्रासारखा हट्ट केला होता पण...", प्रियाच्या आठवणीत अभिजीत भावुक
17
Video - पैशांचा पाऊस! चालत्या ट्रेनमधून उडवल्या ५०० च्या नोटा; गोळा करण्यासाठी लोकांची झुंबड
18
बच्चू कडूंना कधीच सोडणार नाही म्हणणारे माजी आमदार सोडून गेले; काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश
19
सारख्या नावाचे दिवस गेले... सेम चेहराही शोधावा लागणार; यापुढे EVM वर उमेदवाराचा रंगीत फोटो छापणार...
20
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”

कोरोना लसीकरण आठवड्यातून फक्त चारच दिवस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 04:21 IST

कोल्हापूर: कोराेना प्रतिबंधासाठी दिल्या जाणाऱ्या कोवीडशिल्ड लसीकरण आता आठवड्यातून चारच दिवस देणार आहे. राज्य शासनाचेच तसे आदेश प्राप्त झाले ...

कोल्हापूर: कोराेना प्रतिबंधासाठी दिल्या जाणाऱ्या कोवीडशिल्ड लसीकरण आता आठवड्यातून चारच दिवस देणार आहे. राज्य शासनाचेच तसे आदेश प्राप्त झाले आहेत. त्यानुसार जिल्हा आरोग्य विभागाने मंगळवार व बुधवार, शुक्रवार व शनिवार असे वार निश्चित केले असून प्रत्येक केंद्रावर १०० याप्रमाणे ११ केंद्रावर लसीकरणाची मोहीम सुरू राहणार आहे.

शनिवारी देशभर कोरोनावरील लसीचा दिमाखात प्रारंभ झाला; पण कोरोना ॲप बंद पडण्याचे आणि लस घेतल्यानंतर काही जणांना रिॲक्शन येण्याच्या घटना घडल्याने रविवारी लसीकरण मोहीम थांबवण्यात आली. कोल्हापुरातही रविवारी लसीकरण बंदच राहिले. यासंदर्भात जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी लसीकरण शासन आदेशानुसारच बंद ठेवले आहे, मात्र कोल्हापुरात लस घेतलेल्यांपैकी एकालादेखील कोणताही त्रास जाणवला नाही. शनिवारी जिल्ह्यातील ५७० जणांनी लस टोचून घेतली होती. लसीकरणाानंतर आरोग्य विभागाने त्यांना संपर्क करून काही त्रास जाणवत असल्यास सांगा, अशी विचारणा केली; पण कोणताही त्रास नसल्याचे सांगण्यात आले.

दरम्यान, लसीकरणाचे काम चार टप्प्यात पुढील चार महिने सुरूच राहणार असल्याने आरोग्यची सर्व यंत्रणा लसीकरणात अडकून पडू नये म्हणून लसीकरणाचे दिवस कमी करण्यात आले आहेत. यापूर्वी पूर्ण महिनाभर पहिल्या टप्प्यातंर्गत नाेंदणी झालेल्या ३१ हजार आरोग्य कर्मचाऱ्यांपैकी रोज १,१०० याप्रमाणे लसीकरण करण्याचे नियोजन होते; पण आता आठवड्यातील चारच दिवस लसीकरणाचे असणार आहे. मंगळवार व बुधवार, शुक्रवार व शनिवार या चार दिवशी ठरलेल्या नियोजनाप्रमाणे लसीकरण होणार आहे.

चौकट ०१

लसीकरण केंद्रे

सीपीआर, सेवा रुग्णालय कसबा बावडा, आयजीएम इचलकरंजी, कागल, गडहिग्लज, शिरोळ ग्रामीण रुग्णालय, सावित्रीबाई फुले रुग्णालय, महाडिक माळ, सदर बाजार, पंचगंगा हॉस्पिटल.

चौकट ०२

नकारात्मक प्रचाराला बळी पडू नका

सीपीआरमधील हदयरोग तज्ज्ञ डॉ. अक्षय बाफना यांनी शनिवारी पहिली लस टोचून घेतली. त्यानंतर दिवसभर त्यांचे रुटीन व्यवस्थित राहिले. त्यांनी गुंतागुंतीची ॲन्जीओप्लास्टीची शस्त्रक्रियादेखील केली. लसीकरणानंतरचा दिवसही त्यांचा उत्तम गेला. काहीही त्रास जाणवला नसल्याचे त्यांनी सांगितले. नकारात्मक प्रचाराला नागरिकांनी बळी पडू नये, असे आवाहनही त्यांनी केले.