शहरं
Join us  
Trending Stories
1
अरवलीच्या व्याख्येचा वाद तज्ज्ञ समितीकडे; आपल्याच निर्देशांना सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती; आता २१ जानेवारीला सुनावणी 
2
नवी मुंबई, मिरा-भाईंदर, उल्हासनगरात युती तुटली; मुंबई, ठाण्यात युतीचे जमले; केडीएमसी, पनवेल, वसई-विरारमध्ये युतीचे संकेत 
3
भांडुपमध्ये बेस्ट इलेक्ट्रिक बसने घेतला चौघांचा बळी; दहा जखमी
4
चांदीची किंमत का वाढतेय? कुठे-कुठे होतोय वापर? बनली जागतिक तंत्रज्ञान क्रांतीचा कणा
5
अपेक्षित गॅस गेला कुठे? सरकारने मागितली २.७९ लाख कोटींची भरपाई
6
Nashik: नाशिकमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेसेना एकत्र लढणार; भाजपचं काय?
7
TMC: ठाण्यात महायुतीचं जागावाटप फायनल; शिंदेसेना ८७ तर भाजप ४० जागा लढणार!
8
शिवीगाळ, दमदाटी, धक्काबुक्की...;  एबी फॉर्मवरून काँग्रेस कार्यालयात कार्यकर्त्यांमध्ये राडा!
9
Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये शिंदेसेनेची महायुतीकडं पाठ, स्वबळावर लढणार, गणित कुठं बिघडलं?
10
 Mira Bhayandar: भाजपच्या 'त्या' निर्णयामुळे आमदारपुत्र तकशील मेहतांची उमेदवारी धोक्यात!
11
Municipal Election: भाजपचा मोठा निर्णय; मंत्री, खासदार आणि आमदारांच्या नातेवाईकांना महापालिकेचं तिकीट नाही!
12
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
13
तीन कोटींचा विमा आणि सरकारी नोकरीसाठी मुलाने रचला भयंकर कट, वडिलांना सर्पदंश करवला, त्यानंतर...
14
संभाजीनगरात 'हायव्होल्टेज' ड्रामा; जंजाळांच्या डोळ्यात अश्रू, शिरसाटांच्या घराबाहेर कार्यकर्ते जमा
15
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
16
BMC Elections: किशोरी पेडणेकर यांना अखेर एबी फॉर्म मिळाला; उमेदवारी मिळताच ठाकरेंची रणरागिनी गरजली!
17
जेवणावळीत ऐनवेळी भात संपला, संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी मिळेल त्यावर ताव मारला, व्हिडीओ व्हायरल  
18
पॉलिटिकल 'स्टेटस' ठेवाल तर सरकारी नोकरी गमावून बसाल ! कर्मचाऱ्यांसाठी काय नियम ?
19
वर्षानुवर्षे द्वेष मनात विषासारखा पेरला जातो..; एंजेल चकमाच्या मृत्यूवर राहुल-अखिलेश संतापले
20
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus Kolhapur updates- कोरोना चाचणी अहवाल सक्तीचा निर्णय २४ तासांच्या आत मागे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 13:00 IST

CoronaVirus Kolhapur updates- अन्य जिल्ह्यातून कोल्हापूरात येणाऱ्या किंवा जिल्ह्यांतर्गत एका गावातून दुसऱ्या गावात जाणाऱ्या नागरिकांना आरटीपीसीआर किंवा ॲन्टीजेन चाचणी बंधनकारक करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने २४ तासांच्या आत मागे घेतला. जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी बुधवारी सकाळी नागरिकांना त्रास होण्याची शक्यता असल्याने हा निर्णय घेतल्याचे जाहीर केले. त्यामुळे नागरिकांना कोणत्याही बंधनाशिवाय कोल्हापुरात प्रवेश करता येणार आहे. मात्र या नागरिकांची स्वॅब तपासणी व सात दिवस गृह किंवा संस्थात्मक अलगीकरण सक्तीचे आहे.

ठळक मुद्दे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांचा आदेश सात दिवसांचे अलगीकरण मात्र सक्तीचे

कोल्हापूर : अन्य जिल्ह्यातून कोल्हापूरात येणाऱ्या किंवा जिल्ह्यांतर्गत एका गावातून दुसऱ्या गावात जाणाऱ्या नागरिकांना आरटीपीसीआर किंवा ॲन्टीजेन चाचणी बंधनकारक करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने २४ तासांच्या आत मागे घेतला. जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी बुधवारी सकाळी नागरिकांना त्रास होण्याची शक्यता असल्याने हा निर्णय घेतल्याचे जाहीर केले. त्यामुळे नागरिकांना कोणत्याही बंधनाशिवाय कोल्हापुरात प्रवेश करता येणार आहे. मात्र या नागरिकांची स्वॅब तपासणी व सात दिवस गृह किंवा संस्थात्मक अलगीकरण सक्तीचे आहे.कोल्हापूर जिल्ह्यात सध्या कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून त्यात सर्वाधीक प्रमाण अन्य जिल्ह्यातून येणाऱ्या नागरिकांचे आहे. यावर पर्याय काढत मंगळवारी रात्री जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी अन्य जिल्ह्यातून कोल्हापुरात येणाऱ्या नागरिकांना तसेच जिल्ह्यांतर्गत एका गावातून दुसऱ्या गावात राहण्यासाठी जाणाऱ्या नागरिकांना ४८ तासांच्या आत आरटीपीसीआर किंवा ॲन्टीजेन चाचणी निगेटिव्ह असल्याचे प्रमाणपत्र बंधनकारक केल्याचा आदेश काढला होता.

ही चाचणी केलेल्या तसेच न करता परस्पर घरी गेलेल्या नागरिकांचे सात दिवस गृह किंवा संस्थात्मक विलगीकरण सक्तीचे केले होते. या सगळ्यावर ग्राम समिती व प्रभाग समितीचे नियंत्रण असेल असे आदेशात नमूद होते.मात्र बुधवारी सकाळी साडे अकराच्या दरम्यान कोरोना चाचणी निगेटिव्ह अहवाल सक्तीचा आदेश मागे घेण्यात आला. या आदेशामुळे नागरिकांना अधिक त्रास होण्याची शक्यता असल्याने तो मागे घेतल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटले आहे. त्यामुळे अन्य जिल्ह्यातील नागरिकांना कोल्हापुरात विनासायास प्रवेश करता येणार आहे. मात्र राज्य शासनाच्या सध्याच्या नियमानुसार अन्य जिल्ह्यातून येणाऱ्या नागरिकांची स्वॅब तपासणी व सात दिवसांचे अलगीकरण हा नियम कायम ठेवला आहे.गावांमध्ये तंट्याचे कारणचाचणी प्रमाणपत्र व परगावहून येणाऱ्या नागरिकांना प्रवेश द्यायचा की नाही, त्यांचे संस्थात्मक किंवा गृह विलगीकरण करायचे  याचे सर्वाधिकार ग्राम व प्रभाग समित्यांना देण्यात आले होते. त्यामुळे हे वादाचे कारण ठरले असते. शिवाय एक- दोन दिवसांसाठी किंवा काही तासांसाठी कोल्हापुरात येणाऱ्या नागरिकांसाठी हा निर्णय त्रासाचा ठरला असता.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याcollectorजिल्हाधिकारीkolhapurकोल्हापूर