शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

जुलैअखेर कोल्हापुरातील कोरोना स्थिती नियंत्रणात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:19 IST

कोल्हापूर : जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्हिटी दर आणि मृत्यूदर कमी झाला आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्हा चौथ्या स्तरातून तिसऱ्या स्तरात येण्याच्या ...

कोल्हापूर : जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्हिटी दर आणि मृत्यूदर कमी झाला आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्हा चौथ्या स्तरातून तिसऱ्या स्तरात येण्याच्या स्थितीत आहे. जुलैअखेरीस जिल्ह्यातील कोरोना स्थिती नियंत्रणात असेल, असा विश्वास आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी शुक्रवारी येथे व्यक्त केला. लसीकरणामध्येही जिल्हा अव्वल ठरल्याबद्दलही त्यांनी प्रशासनाचे अभिनंदन केले.

टोपे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी आताच व्हीसीव्दारे संपर्क झाला. त्यांनी ट्रॅकिंग, ट्रेसिंग, ट्रीटमेंट आणि टीकाकरण म्हणजे लसीकरण असे चार महत्त्वाचे घटक सांगितले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मी १४ जूनला जी बैठक घेतली होती, त्यानंतर स्थितीमध्ये चांगली सुधारणा झाली आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात जरी रूग्णसंख्या वाढत असली तरीही परिस्थिती जुलैअखेर नियंत्रणात येऊ शकते. एक हजार डॉक्टरांची भरती करण्यात आली आहे. दोन महिन्यात आणखी एक हजार डॉक्टर्सच्या जागा भरणार आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या मुकाबल्यासाठी पावसाळी अधिवशेनामध्ये २०५ कोटी रूपयांचा निधी राज्य आपत्कालिन निधीतून मंजूर केला आहे. १५ वर्षांपूर्वीच्या एक हजार रूग्णवाहिका वापरातून काढण्यात आल्या आहेत. आतापर्यंत ५०० नवीन रूग्णवाहिका देण्यात आल्या असून, उर्वरित ५०० रूग्णवाहिकांसाठी ७८ कोटी रूपये मंजूर केले आहेत. तिसऱ्या लाटेआधी सुविधा तयार करण्यासाठी अधिवेशनामध्ये १,२२२ कोटी रूपयांची मंजुरी दिली आहे.

१४ जूनची स्थिती १६ जुलैची स्थिती

दैनंदिन चाचण्या : २६ हजार ६८ हजार

पॉझिटिव्हिटी रेट : १५.६ ९.६० टक्के

मृत्यूदर : ३.४ १.३ टक्क्यांवर

गृह अलगीकरणाचे प्रमाण : ४८ टक्के २८ टक्क्यांवर

चौकट

पुण्याला स्वॅब तपासण्यास परवानगी

कोल्हापूरमध्ये चाचण्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढविण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईतील कंपनीकडे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात येतात. तरीही अहवाल येण्यास उशिर होत असल्याने पुण्यातील दोन संस्थांमधून स्वॅब तपासून घेण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्याला खास परवानगी देण्यात आल्याचे टोपे यांनी सांगितले.

चौकट

तिसरी लाट विचारात घेऊन

कोरोनाची तिसरी लाट डोळ्यासमोर असताना कोरोना रूग्णांच्या ज्या-ज्या म्हणून आरोग्य चाचण्या आवश्यक आहेत, त्या-त्या करण्याविषयी सूचना देण्यात आल्याचेही टोपे यांनी सांगितले.

चौकट

उद्योजकांचा कोल्हापूर पॅटर्न

कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक उद्योजकांनी स्वखर्चाने लस विकत घेऊन आपल्या कामगारांना दिली. कोल्हापूरचा हा पॅटर्न महाराष्ट्राने राबविण्याची गरज असल्याचे आरोग्यमंत्री टोपे यांनी सांगितले.