शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

जुलैअखेर कोल्हापुरातील कोरोना स्थिती नियंत्रणात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:19 IST

कोल्हापूर : जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्हिटी दर आणि मृत्यूदर कमी झाला आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्हा चौथ्या स्तरातून तिसऱ्या स्तरात येण्याच्या ...

कोल्हापूर : जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्हिटी दर आणि मृत्यूदर कमी झाला आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्हा चौथ्या स्तरातून तिसऱ्या स्तरात येण्याच्या स्थितीत आहे. जुलैअखेरीस जिल्ह्यातील कोरोना स्थिती नियंत्रणात असेल, असा विश्वास आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी शुक्रवारी येथे व्यक्त केला. लसीकरणामध्येही जिल्हा अव्वल ठरल्याबद्दलही त्यांनी प्रशासनाचे अभिनंदन केले.

टोपे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी आताच व्हीसीव्दारे संपर्क झाला. त्यांनी ट्रॅकिंग, ट्रेसिंग, ट्रीटमेंट आणि टीकाकरण म्हणजे लसीकरण असे चार महत्त्वाचे घटक सांगितले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मी १४ जूनला जी बैठक घेतली होती, त्यानंतर स्थितीमध्ये चांगली सुधारणा झाली आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात जरी रूग्णसंख्या वाढत असली तरीही परिस्थिती जुलैअखेर नियंत्रणात येऊ शकते. एक हजार डॉक्टरांची भरती करण्यात आली आहे. दोन महिन्यात आणखी एक हजार डॉक्टर्सच्या जागा भरणार आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या मुकाबल्यासाठी पावसाळी अधिवशेनामध्ये २०५ कोटी रूपयांचा निधी राज्य आपत्कालिन निधीतून मंजूर केला आहे. १५ वर्षांपूर्वीच्या एक हजार रूग्णवाहिका वापरातून काढण्यात आल्या आहेत. आतापर्यंत ५०० नवीन रूग्णवाहिका देण्यात आल्या असून, उर्वरित ५०० रूग्णवाहिकांसाठी ७८ कोटी रूपये मंजूर केले आहेत. तिसऱ्या लाटेआधी सुविधा तयार करण्यासाठी अधिवेशनामध्ये १,२२२ कोटी रूपयांची मंजुरी दिली आहे.

१४ जूनची स्थिती १६ जुलैची स्थिती

दैनंदिन चाचण्या : २६ हजार ६८ हजार

पॉझिटिव्हिटी रेट : १५.६ ९.६० टक्के

मृत्यूदर : ३.४ १.३ टक्क्यांवर

गृह अलगीकरणाचे प्रमाण : ४८ टक्के २८ टक्क्यांवर

चौकट

पुण्याला स्वॅब तपासण्यास परवानगी

कोल्हापूरमध्ये चाचण्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढविण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईतील कंपनीकडे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात येतात. तरीही अहवाल येण्यास उशिर होत असल्याने पुण्यातील दोन संस्थांमधून स्वॅब तपासून घेण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्याला खास परवानगी देण्यात आल्याचे टोपे यांनी सांगितले.

चौकट

तिसरी लाट विचारात घेऊन

कोरोनाची तिसरी लाट डोळ्यासमोर असताना कोरोना रूग्णांच्या ज्या-ज्या म्हणून आरोग्य चाचण्या आवश्यक आहेत, त्या-त्या करण्याविषयी सूचना देण्यात आल्याचेही टोपे यांनी सांगितले.

चौकट

उद्योजकांचा कोल्हापूर पॅटर्न

कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक उद्योजकांनी स्वखर्चाने लस विकत घेऊन आपल्या कामगारांना दिली. कोल्हापूरचा हा पॅटर्न महाराष्ट्राने राबविण्याची गरज असल्याचे आरोग्यमंत्री टोपे यांनी सांगितले.