शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

कोरोना अद्याप गेला नाही; या पाच चुका पुन्हा केल्यास तिसरी लाट अटळ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:17 IST

कोल्हापूर : जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग संथ गतीने कमी होत आहे. एकीकडे कोरोनाचे संकट गंभीर असताना तिसरी लाट येण्याचा इशारा ...

कोल्हापूर : जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग संथ गतीने कमी होत आहे. एकीकडे कोरोनाचे संकट गंभीर असताना तिसरी लाट येण्याचा इशारा देण्यात आला आहे. कोरोना विषाणू आपले स्वरूप बदलून येत असल्याचे संसर्गही झपाट्याने होत आहे. म्हणूनच कोरोना अद्याप गेलेला नाही, त्यामुळे मागे झालेल्या चुका पुन्हा केल्या तर तिसरी लाटदेखील अटळ आहे.

कोरोनापासून बचाव करण्याकरिता राज्य सरकार, आरोग्य यंत्रणा पुरेपूर प्रयत्न करत आहे. तरीही नागरिकांनी आपले काही कर्तव्य, सामाजिक जाणीव ठेवणे आवश्यक आहे. ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ याची भान ठेवले पाहिजे. कोरोना लागण झाल्यानंतर आरोग्य यंत्रणेला दोष देण्यापेक्षा तो होणारच नाही याची खबरदारी प्रत्येकानेच घेतली पाहिजे.

या चुका पुन्हा करू नका -

१. सार्वजनिक ठिकाणी गर्दी करणे टाळा - अनलॉक झाल्यानंतर सार्वजनिक ठिकाणी उदा. भाजी मंडई, व्यापारपेठ, मैदाने, उद्याने येथे गर्दी केली जाते. त्यामुळे फिजिकल डिस्टन्सचा पार फज्जा उडतो. खरेदी करताना दोन व्यक्तींमध्ये अंतर ठेवून उभे राहा. विशेषत: भाजी मंडईत वावरताना खबरदारी घ्या.

२. स्वत:चे आजारपण लपवू नका - अनेक व्यक्ती केवळ भीतीपाेटी स्वत:चे आजारपण लपवताना दिसतात. आजारी असतानाही घरीत थांबून राहतात. लवकर उपचार घेत नाहीत. सर्दी, खोकला, ताप, कणकणी, अंगदुखी यासारखी लक्षणे असतील तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

३. कोरोना चाचणी तत्काळ करून घ्या - कोरोनासदृश लक्षणे असूनही अनेक व्यक्ती या कोरोनाची चाचणी करून घेण्यास घाबरतात. परंतु असे करणे किती महागात पडते याचा अनुभव अनेकांना आला आहे. तेव्हा संकोच न करता त्वरित कोरोना चाचणी करून घेण्याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे.

४. गृह अलगीकरणाचा हट्ट सोडावा - दुसऱ्या लाटेवेळी गृह अलगीकरणात राहून कोरोना रुग्णांनी उपचार घेतले, पण ते कुटुंबांच्या दृष्टीने घातक ठरले. घरात असताना काटेकोरपणे नियमांची अंमलबजावणी होत नाही. कोरोनाबाधिताचा संपर्क काही ना काही कारणाने येतोच. त्यामुळे घराबाहेर राहून उपचार घेणे अतिशय महत्त्वाचे आहे.

५. मास्क आणि सॅनिटायझर वापर अनिवार्य - कोरोना संपला म्हणून मास्कचा वापर न करणे, घरी अथवा कार्यालयात गेल्यावर सॅनिटायझर अथवा साबणाने हात न धुणे कोरोना संसर्गाला निमंत्रण देणारे आहे. त्यामुळे संभाव्य धोका ओळखून वारंवार हात सॅनिटायझरने धुवावेत, मास्कचा नियमित वापर करावा.

- पहिला अनलॉक

(दि. ४ ऑगस्ट २०२०)

एकूण कोरोना रुग्ण - ७७१४

बरे झालेले - ३४४९

मृत्यू - २१७

- दुसरा अनलॉक

(दि. १ जून २०२१)

एकूण कोरोना रुग्ण - १ लाख १४ हजार ६६४

बरे झालेले - ९५ हजार ०७१

मृत्यू - ३७५७

१० पथकांची असेल नजर -

अनलॉकनंतर शहरात दुकाने आणि गर्दीवर लक्ष ठेवण्यासाठी महापालिकेने दहा पथके स्थापन केली असून त्यामध्ये केएमटी, महापालिकेच्या प्रत्येकी चार ते पाच कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. याशिवाय परवाना विभागाचे एक पथक कार्यरत आहे. त्यामध्ये सहा ते सात कर्मचारी आहेत. कडक निर्बंध असलेल्या काळात दुकानदारांकडून जर का नियमांचे उल्लंघन झाले तर दंडात्मक कारवाईसह दुकाने सील करण्याची कारवाई केली जात आहे.