शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
3
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
4
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
5
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
8
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
9
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
10
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
11
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
12
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
13
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
14
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
15
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
16
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
17
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
18
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
19
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
20
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना संकटात उजळाईवाडीच्या महिला बनल्या आत्मनिर्भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:30 IST

मोहन सातपुते उचगाव : कोरोना संकटात अनेकांचे रोजगार हिरावले, व्यवसाय बंद पडले. मात्र, अशा अडचणीच्या काळातही त्या घट्ट ...

मोहन सातपुते

उचगाव : कोरोना संकटात अनेकांचे रोजगार हिरावले, व्यवसाय बंद पडले. मात्र, अशा अडचणीच्या काळातही त्या घट्ट पाय रोवून उभ्या आहेत...संसाराचा गाडाही हाकतात अन् अनेकांना आत्मनिर्भरतेची वाटही दाखवतात...कारण, १५ वर्षांपूर्वी एकीचे बळ दाखवत त्यांनी रोवलेली आत्मनिर्भरतेची मुहूर्तमेढच त्यांना या संकटाच्या काळात धावून आली आहे. विविध उत्पादनांची निर्मिती करून त्यांची विक्री करत शेकडो हात आत्मनिर्भरतेचा गजर करत आहेत. उजळाईवाडी (ता.करवीर) येथील यशस्विनी महिला मंडळाच्या शेकडो महिलांनी निर्माण केलेली ही यशोगाथा अनेकासांठी प्रेरक ठरत आहे. एखादे संकट आपल्यासाठी नेहमीच संधी घेऊन येते, असे म्हणतात. याच संकटाचे संधीत रूपांतर करण्याची किमया उजळाईवाडीतील १३ महिला बचत गटांतील महिलांनी साधली आहे. या विविध तेरा बचत गटांतील महिलांना येथील यशस्विनी महिला मंडळाने एकाच धाग्यात गुंफत त्यांना आत्मनिर्भरतेची वाट दाखवल्याने या महिला कोरोनाच्या संकटातही एकीचे बळ घेत आपल्या संसाराचा गाडा मोठ्या नेटाने हाकत आहेत. उजळाईवाडी (ता.करवीर) येथील यशस्विनी महिला मंडळाच्या माध्यमातून २००६ मध्ये स्वयंसाहाय्यता समूह गटाची स्थापना करण्यात आली. एकमेकींच्या अडचणी समजून घेतानाच या महिलांनी स्वत:साठीही आपली एक वेगळी वाट शोधली. यातून या महिलांना आत्मनिर्भर होण्यासाठी विविध प्रशिक्षणे दिली गेली. त्यामुळे याच प्रशिक्षणाचा या महिलांनी लॉकडाऊन काळात लाभ उठविला. लॉकडाऊन काळात उभा देश कुलूपबंद असताना या महिलांनी मात्र, लोणची, मसाले, चटणी, पिठाचे पापड बनवत त्यांची विक्री केली. यातून या महिलांना आर्थिक लाभ तर झालाच, शिवाय घरबसल्या रोजगारही मिळाला. काही जणींनी घरच्या घरी खानावळ सुरू करून अर्थार्जनाचा मार्ग स्वीकारला. अनेक महिलांनी आपण कोणत्याच कामात कमीपणा मानायला नको ही मानसिकता ठेवत इस्त्री काम, भाजीपाला, किराणा दुकान, पिठाची गिरणीही चालविली. यातून या महिला आत्मनिर्भर बनत गेल्या. विशेष म्हणजे कोरोनाच्या काळात मास्कला सर्वाधिक मागणी होती. ही गरज ओळखून या महिलांनी मास्कची निर्मिती करत त्याचीही मोठ्या प्रमाणात विक्री केली आहे. हे मास्क सरकारी कार्यालये, खाजगी संस्था, मेडिकल्स आणि ग्रामपंचायतींकडे वितरित करत आहेत. यापूर्वी या महिलांनी रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर, नेत्रदान शिबिर, वृक्षारोपण, १६ वर्षे स्मशान भूमीला शेणी व तिरडीदान, एकत्र कुटुंब पद्धतीसाठी संवाद, स्वछता अभियान यासारखे उपक्रम राबविले आहेत.

या बचत गटातील शालन पोवार, शुभांगी पोवार, सारिका कासारकर, अनुसया भोसले, वृषाली चव्हाण, स्मिता हचनाळे, सुरेखा साळोखे, संगीता बारड, स्मिता गोंजाले ,माधुरी परीट, योगिता इंगळे, यशवंता गरड, प्रीती तावडे, सुजाता पाटील, प्रिया चौगुले, संजीवनी माने, पुष्पा बोंद्रे, वैशाली नलवडे, इंदूबाई दळवी, सविता चोगुले, मंगल शिंदे, सुनीता गाडेकर, मंगल पाटील, संध्या भोसले, प्रिया घेवडे अश्या कित्येक महिला आत्मनिर्भर होऊन घराला घरपण देत प्रशिक्षणाच्या माध्यमातून पुढे होत आज स्वयंरोजगार मिळवत आहेत.

कोट : २००६ साली उजळाईवाडी येथे आम्ही एकत्र आलो. सुरुवातीला बचत गट स्थापन केले. त्यातून स्वयंसाहाय्यता निर्माण होत गेली. बचत गट एकमेकींच्या साहाय्याने पुढे सरकत गेला. घरचे आर्थिक प्रश्न सोडवणूक करत बचत गटाची कर्जेही फेडत धाडसाने पुढे आल्या. आज त्या आत्मनिर्भर बनून इतर महिलांना सहभागी करत आधार देऊ लागल्या. लॉकडाऊन झाले तरी त्या खंबीरपणे उभ्या आहेत.

शैलजा भोसले, मराठा महासंघ, महिला जिल्हाध्यक्षा