शहरं
Join us  
Trending Stories
1
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
2
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
3
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
4
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
5
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
6
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
7
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
8
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
9
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
10
युद्ध संपलं, तरी नागरी संरक्षण दल मुंबईत अलर्ट मोडवर; सोसायट्यांमध्ये मॉक-ड्रिल
11
मुंबईत महिनाभर फटाके, रॉकेट उडविण्यास पोलिसांची मनाई; ११ मे ते ९ जूनपर्यंत आदेश लागू
12
किल्ले राजकोटवर शिवसृष्टी साकारू: CM; मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे लोकार्पण
13
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
14
मुंबई, ठाण्यात खरी लढत भाजप-शिंदेसेनेत होणार? उद्धवसेनेची स्पेस कोण घेणार?
15
गोखले पूल अद्वितीय नमुना, मुंबईच्या विकासाचा वेग चौपट होणार: शेलार; आणखी २ पूल लवकरच सेवेत
16
सायकल ट्रॅक उखडण्यासाठी बीकेसीत २५ कोटींचा खर्च; कंत्राटदार नेमणुकीची प्रक्रिया सुरू
17
चॅटजीपीटीने एक कप कॉफीत मोडला संसार; तुमचं भविष्य तुमच्या कपाच्या तळाशी असू शकतं
18
अद्याप दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणाचा प्रस्ताव नाही, पण…; प्रफुल्ल पटेलांचे सूचक विधान
19
मान्सून निकोबार बेटांवर दाखल; आपल्याकडे केव्हापर्यंत पोहोचेल? गेल्या १७ वर्षांत...
20
एनआयएची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी बलबीर सिंगच्या मुसक्या आवळल्या

कोरोनाचे नियम तोडले, ४० लाख मोजले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 04:25 IST

कोल्हापूर : महानगरपालिका प्रशासनाने कोरोना संसर्ग रोखण्यासाठी शहरवासीयांना एक नियमावली घालून दिली आहे; पण नियम पाळतील तर मग कोल्हापूरकर ...

कोल्हापूर : महानगरपालिका प्रशासनाने कोरोना संसर्ग रोखण्यासाठी शहरवासीयांना एक नियमावली घालून दिली आहे; पण नियम पाळतील तर मग कोल्हापूरकर कसले..? गेल्या अडीच महिन्यांत अशा नियम तोडणाऱ्या ३० हजार २२१ नागरिकांनी कोरोनाचे नियम पाळले नाहीत म्हणून महापालिका प्रशासनाने दंड करून त्यांच्याकडून ४० लाख ५६ हजार २२२१ रुपये वसूल केले. सारे जग ओरडून सांगत असतानाही लोक तोंडावर मास्क लावत नाहीत याचेही प्रत्यंतर या कारवाईतून आले आहे. कारण मास्क लावला नाही म्हणून सर्वाधिक २७ हजार ३९५ लोकांना दंड झाला आहे.

महानगरपालिका प्रशासन कोरोना संसर्गाशी गेल्या वर्षभरापासून लढत आहे. हा संसर्ग रोखण्यास प्रशासन, औषधोपचार यासह कोल्हापूरकरांचे मोठे सहकार्य अपेक्षित आहे. म्हणून नागरिकांना समाजावून सांगितले, जनजागृती केली. तरीही खबरदारी घेतली जात नाही म्हटल्यावर नियम कडक केले आणि त्याची अंमलबजावणी सुरू केली.

सार्वजनिक ठिकाणी फिरताना नागरिकांनी महानगरपालिकेने केलेले नियम पाळावेत, असे सांगितल्यानंतर सुद्धा काही नागरिक अत्यंत बेफिकीर वागत असल्याचे दिसून येत आहे. या नियमांचे पालन होते की नाही, पालन करत नसतील तर संबंधित नागरिकांवर कारवाई करण्यासाठी पाच पथके तयार केली. फेब्रुवारीपासून त्याची कडक अंमलबजावणी सुरू आहे.

फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिलच्या २६ तारखेपर्यंत महानगरपालिकेच्या पाच पथकांनी तब्बल ३० हजार २२१ नागरिकांना दंडाचा दणका दिला. नियम तोडले म्हणून त्यांना जागेवर दंडाच्या पावत्या हातात दिल्या. त्यांच्याकडून ४० लाख ५६ हजार २२१ इतका दंड वसूल केला. दंडाची रक्कम आणि केसेस यांचे आकडे म्हणजे कोरोनासारख्या महामारीच्या काळात नागरिक किती बेफिकीर वागतात याचे उदाहरण आहे. नुसते बेफिकीर नाहीत तर स्वत:च्या कुटुंबाला देखील अडचणीत आणत आहेत. कोरोनाचा संसर्ग, मृत्यूचे प्रमाण वाढत असताना तरी नागरिकांनी नियम पाळणे आवश्यक आहे.

कारवाईचा प्रकार केसेस दंडाची रक्कम

- विनामास्क - २७, ३९५ : २७, ३९,५००

- सोशल डिस्टन्स १५१४ : १२, ७६,५००

- विना हॅन्डग्लोज - ३२ : ८०००

- रात्री ९ नंतर व्यवसाय- २ : २०००

- सार्वजनिक ठिकाणी थुंकणे- १२७८ : १२७८०