शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
3
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
4
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
5
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
6
प्रीती झिंटा भाजपमध्ये प्रवेश करणार? अभिनेत्रीने केला खुलासा, म्हणाली- "मला देशाबद्दल प्रेम आहे त्यामुळे..."
7
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
8
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
9
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
10
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
11
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
12
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
13
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
14
आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडं षटक, ६ चेंडूत दिल्या ३७ धावा, गोलंदाजाचं नाव ऐकून चकीत व्हाल
15
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
16
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
17
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
18
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
19
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
20
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण

corona in belgaon : बेळगावात आणखी दोघे रुग्ण झाले बरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2020 16:30 IST

बेळगावात दोन कोरोना बाधित रुग्णांचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्यामुळे त्या दोघांना मंगळवारी डिस्चार्ज देण्यात आला.या दोन कोरोना बाधित रुग्णांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्यामुळे त्यांना जिल्हा रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.यापैकी एक रुग्ण रायबाग कुडची येथील तर दुसरा रुग्ण हिरेबागेवाडी येथील आहे.

ठळक मुद्देबेळगावात आणखी दोघे रुग्ण झाले बरेएक रुग्ण रायबाग कुडची तर दुसरा रुग्ण हिरेबागेवाडी येथील

बेळगाव : बेळगावात दोन कोरोना बाधित रुग्णांचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्यामुळे त्या दोघांना मंगळवारी डिस्चार्ज देण्यात आला.या दोन कोरोना बाधित रुग्णांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्यामुळे त्यांना जिल्हा रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.यापैकी एक रुग्ण रायबाग कुडची येथील तर दुसरा रुग्ण हिरेबागेवाडी येथील आहे.हिरेबागेवाडी येथील 20 वर्षीय युवक(पी-128) दिल्ली मरकजला जाऊन आल्यावर त्याला कोरोनाची बाधा झाली होती या शिवाय कुडची येथील 40 वर्षीय इसमाला (पी-148) देखील दिल्लीला जाऊन आल्यावर लागण झाली होती आता दोघेही कोरोनामुक्त झाले  आहेत.

हिरेबागेवाडीचा युवक 1 एप्रिल रोजी तर रायबाग कुडची इसम 2 एप्रिल रोजी क्वांरंटाइन झाले होते अनुक्रमे 3 व 4 एप्रिल रोजी पोजिटिव्ह झाले होते 21 एप्रिल रोजी ते निगेटिव्ह झाले आहेत. बेळगाव जिल्ह्यातील 42 रुग्णांपैकी तीन रुग्ण बरे झाले आहेत त्यामुळे बऱ्या झालेल्या रुग्णांचा देखील आकडा वाढत आहे.कर्नाटक राज्यातील कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येमध्ये काल सायंकाळपासून आणखी सात जणांची भर पडल्यामुळे राज्यातील करुणा बाधित यांची एकूण संख्या 415 झाली आहे. यापैकी 114 जणांना आत्तापर्यंत डिस्चार्ज देण्यात आला आहे.राज्यातील कोरोना बाधितांची संख्या काल सोमवारी 408 वर पोचली होती. त्यामध्ये सोमवारी सायंकाळी 5 वाजल्यापासून आज मंगळवार दि. 21 एप्रिल दुपारी 12 वाजेपर्यंत नव्याने 7 रुग्णांची भर पडली आहे. या सात रुग्णांमध्ये विजयपुरा आणि कलबुर्गी येथील प्रत्येकी तिघा जणांसह मंगळूर येथील एकाचा समावेश आहे.

विशेष म्हणजे या सातपैकी चार महिला आहेत. विजयपुरा येथील दोन महिला (वय 18 व 30) आणि एक युवक(18) पी - 306 क्रमांकाच्या रुग्णाच्या संपर्कात आल्यामुळे कोरोना बाधित झाले आहेत. राज्यातील 415 कोरोना बाधित रुग्णांपैकी 17 जणांचा मृत्यू झाला असून 114 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.दरम्यान, बेळगाव जिल्ह्यात गेल्या आठवड्याभरात रोज रुग्ण सापडत असल्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. तथापि शनिवारी एक रुग्ण कोरोना मुक्त झाल्यामुळे आणि गेले सलग तीन दिवस नव्याने एकही रुग्ण सापडला नसल्यामुळे प्रशासनाला दिलासा मिळाला आहे.

जिल्ह्यात केवळ 17 दिवसात 42 जणांना कोरोना विषाणुची बाधा झाल्यामुळे जिल्हा प्रशासनाने कडक उपाय योजना राबवून सीलडाऊन केले आहे. आरोग्य खात्याच्या माहितीनुसार रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या 42 रुग्णांची तब्येत चांगली आहे.

त्यापैकी कांही जणांना डिस्चार्ज देण्यात येणार आहे. त्यासाठी आवश्यक त्या तपासण्या आणि खबरदारी घेण्यात येणार आहे. कोणत्याही परिस्थितीत या रोगाचा प्रसार होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासन दक्ष असल्याचे सांगण्यात येत आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याbelgaonबेळगावkolhapurकोल्हापूर