शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
2
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
3
Nashik: शिंदेंचा घाव, ठाकरेंच्या शिवसेनेला पडलं भगदाड! उरले फक्त नऊ माजी नगरसेवक
4
एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
5
सोन्याचे दर घसरले, पण चांदीचा विक्रम; किंमत १ लाख १२ हजारांवर; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट रेट
6
"आता वेळ आलीय..."; लोकप्रिय अभिनेत्रीसोबत मोठा स्कॅम, स्टायलिस्ट सांगून फसवलं
7
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
8
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
9
जिवंत रुग्णाला मृत घोषित केले; डॉक्टरांकडे महापालिकेने मागितला खुलासा
10
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक
11
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
12
सोने सोडा चांदीमध्येही बंपर कमाईची संधी! पुढील ६ महिन्यांत किंमत दुप्पट होणार? कोणी केला दावा?
13
केदारनाथ यात्रेला निघालेले भाविक दरीत कोसळले; दोघांचा मृत्यू, तीन जखमी
14
...तर पाकिस्तानातील अण्वस्त्र ठिकाणे उद्ध्वस्त झाली असती; इस्त्रायलची ऑफर भारताने का नाकारली?
15
पुणे, चंद्रपूर, नंदूरबार, धाराशिव; शरद पवार गट, उद्धवसेनेला खिंडार, माजी नगरसेवक शिंदे गटात
16
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
17
Mukesh Ambani : मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
18
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
19
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
20
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर

दुसरा डोस घेतल्यानंतरही ५५६ जणांना कोरोना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:33 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : कोरोना प्रतिबंधक लसीचा केवळ पहिला डोस घेऊन भागणार नसल्याचे जिल्ह्यातील आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : कोरोना प्रतिबंधक लसीचा केवळ पहिला डोस घेऊन भागणार नसल्याचे जिल्ह्यातील आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. पहिला डोस घेतल्यानंतर कोरोना झालेल्यांपैकी १४३ जणांचा मृत्यू झाला आहे, तर दुसरा डोस घेतल्यानंतरही ५५६ जणांना पुन्हा कोरोना झाला. परंतु मृत्यू त्यांना टाळता आला आहे. त्यामुळेच दुसरा डोस घेणाऱ्यांनी न चुकता हा डोस घेण्याची गरज आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात १६ जानेवारी २०२१ पासून कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला सुरुवात झाली. परंतु सुरुवातीच्या काळामध्ये अनेकांनी लस घेण्यासाठी नकार दिला. सोशल मीडियावरून याबाबत अनेक चुकीचे संदेश प्रसारित होत होते. त्याचाही धसका अनेकांनी घेतला. सीपीआरसारख्या जिल्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनीदेखील दुसरा डोस घेतल्यानंतर कोणावर काय परिणाम होतोय ते पाहून आपण लस घेऊ या, असा पवित्रा घेतला होता. त्यामुळे साहजिकच सर्वसामान्य नागरिकांच्या मनामध्ये शंका होती. परंतु वैद्यकीय क्षेत्रातून आणि प्रशासनाकडून वारंवार लसीचे महत्त्व विशद केले जात होते. १ जानेवारी २१ ते १३ जून २१ पर्यंतचा आढावा घेता लसीचा पहिला डोस घेतल्यानंतरही ३ हजार ४३७ जणांना कोरोनाची लागण झाली. त्यापैकी १७५५ जण पुन्हा रुग्णालयात दाखल झाले. तर त्यांच्यापैकी १४३ जणांचा मृत्यू झाला. दुसरा डोस घेतल्यानंतर ५५६ जणांना कोरोनाची लागण झाली. त्यापैकी ३२० जण पुन्हा रुग्णालयात दाखल झाले. तर त्यांच्यापैकी एकाचाही मृत्यू झालेला नाही. हे सर्वांत महत्त्वाचे आहे.

चौकट

१ जानेवारी १३ जून २१ पर्यंतची स्थिती

लसीकरण झालेले लाभार्थी- १२ लाख ७ हजार ४८

आतापर्यंतचे बाधित रुग्ण- ८२ हजार ६११

लसीकरणानंतर बाधित झालेले- ३ हजार ९९३

पहिला डोस घेतल्यानंतर बाधित- ३ हजार ४३७

पहिला डोस घेतल्यानंतरही मृत्यू- १४३

दुसरा डोस घेतल्यानंतर बाधित- ५५६

दुसरा डोस घेतल्यानंतर मृत्यू- ००

कोट

कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला किंवा दुसरा डोस घेतल्यानंतर कोरोनाची पुन्हा लागण होत नाही, असा कुठेही दावा करण्यात आलेला नाही. पुन्हा कोरोना होऊ शकतो; परंतु त्याची तीव्रता या लसीकरणामुळे कमी होते, हे मात्र ठामपणे सांगितले जात होते. पहिल्या डोसबरोबरच दुसरा डोस महत्त्वाचा असल्याने गेल्या दोन महिन्यांत अधिकाधिक दुसरा डोस देण्यासाठी शासनाने प्राधान्य दिले आहे. कोरोनाच्या दुसऱ्या डोसनंतर न झालेले मृत्यूच या डोसचे महत्त्व स्पष्ट करतात.

-डाॅ. उषादेवी कुंभार, प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी