शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

दुसरा डोस घेतल्यानंतरही ५५६ जणांना कोरोना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:33 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : कोरोना प्रतिबंधक लसीचा केवळ पहिला डोस घेऊन भागणार नसल्याचे जिल्ह्यातील आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : कोरोना प्रतिबंधक लसीचा केवळ पहिला डोस घेऊन भागणार नसल्याचे जिल्ह्यातील आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. पहिला डोस घेतल्यानंतर कोरोना झालेल्यांपैकी १४३ जणांचा मृत्यू झाला आहे, तर दुसरा डोस घेतल्यानंतरही ५५६ जणांना पुन्हा कोरोना झाला. परंतु मृत्यू त्यांना टाळता आला आहे. त्यामुळेच दुसरा डोस घेणाऱ्यांनी न चुकता हा डोस घेण्याची गरज आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात १६ जानेवारी २०२१ पासून कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला सुरुवात झाली. परंतु सुरुवातीच्या काळामध्ये अनेकांनी लस घेण्यासाठी नकार दिला. सोशल मीडियावरून याबाबत अनेक चुकीचे संदेश प्रसारित होत होते. त्याचाही धसका अनेकांनी घेतला. सीपीआरसारख्या जिल्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनीदेखील दुसरा डोस घेतल्यानंतर कोणावर काय परिणाम होतोय ते पाहून आपण लस घेऊ या, असा पवित्रा घेतला होता. त्यामुळे साहजिकच सर्वसामान्य नागरिकांच्या मनामध्ये शंका होती. परंतु वैद्यकीय क्षेत्रातून आणि प्रशासनाकडून वारंवार लसीचे महत्त्व विशद केले जात होते. १ जानेवारी २१ ते १३ जून २१ पर्यंतचा आढावा घेता लसीचा पहिला डोस घेतल्यानंतरही ३ हजार ४३७ जणांना कोरोनाची लागण झाली. त्यापैकी १७५५ जण पुन्हा रुग्णालयात दाखल झाले. तर त्यांच्यापैकी १४३ जणांचा मृत्यू झाला. दुसरा डोस घेतल्यानंतर ५५६ जणांना कोरोनाची लागण झाली. त्यापैकी ३२० जण पुन्हा रुग्णालयात दाखल झाले. तर त्यांच्यापैकी एकाचाही मृत्यू झालेला नाही. हे सर्वांत महत्त्वाचे आहे.

चौकट

१ जानेवारी १३ जून २१ पर्यंतची स्थिती

लसीकरण झालेले लाभार्थी- १२ लाख ७ हजार ४८

आतापर्यंतचे बाधित रुग्ण- ८२ हजार ६११

लसीकरणानंतर बाधित झालेले- ३ हजार ९९३

पहिला डोस घेतल्यानंतर बाधित- ३ हजार ४३७

पहिला डोस घेतल्यानंतरही मृत्यू- १४३

दुसरा डोस घेतल्यानंतर बाधित- ५५६

दुसरा डोस घेतल्यानंतर मृत्यू- ००

कोट

कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला किंवा दुसरा डोस घेतल्यानंतर कोरोनाची पुन्हा लागण होत नाही, असा कुठेही दावा करण्यात आलेला नाही. पुन्हा कोरोना होऊ शकतो; परंतु त्याची तीव्रता या लसीकरणामुळे कमी होते, हे मात्र ठामपणे सांगितले जात होते. पहिल्या डोसबरोबरच दुसरा डोस महत्त्वाचा असल्याने गेल्या दोन महिन्यांत अधिकाधिक दुसरा डोस देण्यासाठी शासनाने प्राधान्य दिले आहे. कोरोनाच्या दुसऱ्या डोसनंतर न झालेले मृत्यूच या डोसचे महत्त्व स्पष्ट करतात.

-डाॅ. उषादेवी कुंभार, प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी