शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रज्ञासिंह, पुरोहितसह सातही जणांची मुक्तता; मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याचा १७ वर्षांनी निकाल
2
गॅस सिलिंडर ३४.५० रुपयांनी स्वस्त झाला; १ ऑगस्टपासून हे महत्वाचे चार बदल, पाचवा...
3
आजचे राशीभविष्य १ ऑगस्ट २०२५ : भटकंती कराल, अचानक धनलाभ होईल! असा जाईल आजचा दिवस
4
न्या. लाहोटी म्हणाले, “मालेगाव स्फोटाचा निकाल पीडितांच्या कुटुंबीयांसाठी वेदनादायक”
5
५ न्यायाधीश, २ तपास यंत्रणा, १७ वर्षे प्रतीक्षा; मालेगाव खटल्यातील सर्व आरोपींची सुटका
6
अलमट्टी धरणाची उंची वाढवू नये, कर्नाटक सरकारला निर्देश द्यावे; CM फडणवीसांचे केंद्राला पत्र
7
माणिकराव कोकाटेंना रमीचा डाव भोवला, ‘कृषी’ गेले, आता ‘खेळ’मंत्री; दत्ता भरणे नवे कृषिमंत्री
8
आबा नाही म्हणाले अन् मामांना मिळाले ‘कृषी’; कोकाटेंचा निर्णय का झाला, पडद्यामागे काय घडले?
9
भारतीय अर्थव्यवस्था सध्या मृतावस्थेत, ट्रम्प खरे बोलले! विरोधी पक्षनेते राहुल गांधींची टीका
10
खड्डेमुक्त रस्ते हा घटनेतील मूलभूत हक्क; जबाबदारी राज्य सरकार टाळू शकत नाही: सुप्रीम कोर्ट
11
EVM फेरफार अशक्य, तपासणीत पुन्हा एकदा सिद्ध, राज्यातील मतदारसंघांमध्ये तपासणी; आयोगाचा दावा
12
एक दिवस पाकिस्तान भारताला तेल विकू शकेल: डोनाल्ड ट्रम्प; अमेरिका-पाकचा व्यापार करार
13
ट्रम्प टॅरिफ: सर्वसामान्य अमेरिकनांच्या खिशाला फटका, अर्थव्यवस्थेला झटका, ५ लाख जॉब जाणार
14
मिठी नदी घोटाळ्याप्रकरणी EDचे मुंबईत ८ ठिकाणी छापे; बनावट सामंजस्य करार,  कंपन्यांवर कारवाई
15
मान्सूनच्या दुसऱ्या टप्प्यात अधिक पाऊस पडणार; भारतीय हवामानशास्त्र विभागाचा अंदाज
16
प्रांजल खेवलकरच्या लॅपटॉपमध्ये अनेक महिलांचे पार्टी अन् त्यानंतरचे आक्षेपार्ह व्हिडिओ!
17
IND vs ENG 5th Test Day 1 Stumps: नायर-वॉशिंग्टन जोडी जमली अन् टीम इंडियावरील मोठं संकट टळलं!
18
माल चाहिए क्या? xxx वाला? विचारल्यानंतर खेवलकर म्हणाले होते, 'ठेवून घ्या'! चॅटिंग आलं समोर
19
Karun Nair Fifty : 'त्रिशतकवीर' करुण नायरच्या भात्यातून ३१४६ दिवसांनी आली 'फिफ्टी'!
20
Nashik Crime: भयंकर! पत्नीला गुंगीचे औषध पाजून नग्नावस्थेत बनवले व्हिडिओ, दोन वर्ष डान्स बारमध्ये नाचायला लावले

कॉँग्रेसला साथ द्या, देशाची दिशा बदलेल !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2018 01:12 IST

निपाणी : कर्नाटकाने अनेकवेळा देशाला नवी दिशा देण्याचा निर्णय घेतला आहे. सामान्य माणूस, शेतकरी, शेतमजूर यांच्यासाठी कल्याणकारी योजना आखून त्यांची उत्तम पद्धतीने अंमलबजावणी करण्यात मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे सरकार आघाडीवर आहे. पुन्हा त्यांनाच मुख्यमंत्री करण्यासाठी कॉँग्रेसला साथ द्या. देशाची राजकीय दिशाच बदलेल, असे आवाहन राष्टÑवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले.निपाणीचे ...

निपाणी : कर्नाटकाने अनेकवेळा देशाला नवी दिशा देण्याचा निर्णय घेतला आहे. सामान्य माणूस, शेतकरी, शेतमजूर यांच्यासाठी कल्याणकारी योजना आखून त्यांची उत्तम पद्धतीने अंमलबजावणी करण्यात मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे सरकार आघाडीवर आहे. पुन्हा त्यांनाच मुख्यमंत्री करण्यासाठी कॉँग्रेसला साथ द्या. देशाची राजकीय दिशाच बदलेल, असे आवाहन राष्टÑवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले.निपाणीचे माजी आमदार, सहकाररत्न प्रा. सुभाष जोशी यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त समर्थ व्यायाम शाळेच्या पटांगणावर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कर्नाटकचे उद्योगमंत्री आर. व्ही. देशपांडे होते.पवार पुढे म्हणाले की, कर्नाटकात सध्या विधानसभेच्या निवडणुका चालू आहेत. त्या पार्श्वभूमीवर हा समारंभ होत आहे. भाजपचे सरकार लोकहिताचे आणि शेतकऱ्यांच्या कल्याणाचे निर्णय घेत नाही. त्यांना सत्तेवरून खाली खेचले पाहिजे. त्यासाठी कर्नाटकातील मतदारांनी दिशा द्यावी. तसा निर्णय घ्यावा. येत्या बारा तारखेला घेऊन भाजपचे बारा वाजवा, हा ‘बारा’मतीकर म्हणून माझे आवाहन आहे. प्रा. जोशी यांच्या कार्याचा गौरव करून ते म्हणाले, सामान्य कुटुंबातील एका शिक्षकाने समाजकल्याण, राजकारण, सहकार आदी क्षेत्रात भव्यदिव्य काम केले आहे. प्रा. जोशी आणि त्यांच्या पत्नी सुनीताताई यांचा सत्कार शरद पवार यांच्याहस्ते शाल, श्रीफळ, पुष्पहार आणि चांदीची तलवार देऊन करण्यात आला.सत्काराला उत्तर देताना प्रा. सुभाष जोशी म्हणाले, सध्याची पिढी सोशर मिडियावर जगत असल्यामुळे त्यांच्यातील संवादच खुंटला आहे. समाजाप्रती असणारी संवेदनशीलता बोथट झाली आहे. आमच्या पिढीने भाई वैद्य, नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे यांच्यासोबत चळवळीतून केलेली समाजाची जडणघडण सध्याच्या काळात दिसत नाही.माजी आमदार काकासाहेब पाटील म्हणाले, प्रा. सुभाष जोशी यांच्या गेली पन्नास वर्षांचा संघर्षमय प्रवास येथील कष्टकºयांना ताकद देऊन गेला आहे. असे हे कष्टकºयांचे नेतृत्व आज माझ्या उमेदवारीवर सूचक म्हणून असल्यामुळे सर्वसामान्यांची ताकद माझ्या पाठीशी उभी आहे.यावेळी उद्योगमंत्री आर. व्ही. देशपांडे, खासदार प्रकाश हुक्केरी, आमदार सतीश जारकीहोळी, माजी मंत्री वीरकुमार पाटील, खासदार धनंजय महाडिक, आमदार हसन मुश्रीफ, आमदार जयंत पाटील, निपाणीचे नगराध्यक्ष विलास गाडीवड्डर, मोहन बुडके, पप्पू पाटील आदींची भाषणे झाली. यावेळी माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे, निवेदिता माने, आमदार संध्याताई कुपेकर, गणेश हुक्केरी, के. पी. पाटील, रावसाहेब पाटील, आमदार मकरंद पाटील, प्रा. संजय मंडलिक, ‘लोकमत’चे संपादक वसंत भोसले, लक्ष्मणराव चिंगळे, गणपतराव पाटील, आदी उपस्थित होते. आभार सुनील पाटील यांनी मानले.एक गुंठा जमीन नसणारे एकमेव अध्यक्षसाखर कारखानदारीचा मी अतिशय जवळून अभ्यास केला आहे. एक गुंठाही जमीन नसणारे प्रा. सुभाष जोशी हे देशातील एकमेव साखर कारखान्याचा अध्यक्ष असल्याचे शरद पवार यांनी यावेळी सांगितले.लाव्हाळा उखडून टाकामागील निवडणुकीत ज्या सुभाष जोशींनी लाव्हाळ्याचे गवत आणले तेच पीक आता त्यांनी उखडून टाकावे, असा टोला वीरकुमार पाटील यांनी विद्यमान आमदारांचे नाव न घेता लगावला.