शहरं
Join us  
Trending Stories
1
'1971 आणि 2025 ची परिस्थिती वेगळी', युद्धविराम अन् इंदिरा गांधींबाबत शशी थरुर स्पष्टच बोलले
2
भारतानं पाकिस्तानात घुसून मारलं, लष्कराचा दरारा रावळपिंडीपर्यंत पोहोचला; ऑपरेशन सिंदूरवर राजनाथ सिंह स्पष्टच बोलले 
3
Yogi Adityanath : "पाकिस्तानला विचारा 'ब्रह्मोस' क्षेपणास्त्राची ताकद काय आहे?"; योगी आदित्यनाथ कडाडले
4
"मी मोठी झाल्यावर सैन्यात भरती होईन आणि बदला घेईन"; शहीद जवानाच्या लेकीचा निर्धार
5
भारत-पाकिस्तान संघर्षाचा BCCI ला मोठा फटका; आठवड्यात ४२० कोटी रुपये पाण्यात जाणार?
6
Ceasefire Violation: भारतासोबत शस्त्रसंधीची चर्चा करणारे पाकिस्तानी लष्कराचे डीजीएमओ कोण आहेत?
7
Bhagwant Mann : "देशाच्या हितासाठी पंजाब रक्त..."; भगवंत मान यांची राजस्थानला अतिरिक्त पाणी देण्याची मोठी घोषणा
8
युद्धविराम पंतप्रधान मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक, तिन्ही लष्करप्रमुखांसह अजित डोवाल, राजनाथ सिंहांची उपस्थिती
9
लक्ष्य साध्य झाले पण 'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरुच; हवाई दलाने दिली मोठी अपडेट...
10
मेळघाटातील ‘त्या’ आरएफओंची राज्य महिला आयोगाकडे धाव, ‘त्या’ अधिकाऱ्याला अभय
11
फक्त एक मिस्ड कॉल किंवा SMS द्वारे PF बॅलन्स तपासा; कुठेही लॉगइन करण्याची गरज नाही
12
'युद्धविरामचे पालन करू, पण काश्मीर अन् सिंधू करार...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे मोठे विधान
13
फक्त ४० रुपयांमध्ये पोटभर जेवण! 'या' बॉलिवूड कलाकाराने उघडलंय हॉटेल, चाहत्यांकडून कौतुक
14
मुलगा देशसेवेसाठी दिलाय;काही झालं तर मन घट्ट केलंय! कर्नल नितीन काळदाते यांच्या आईची कृतार्थ भावना
15
पैशांसाठी कुणावरही अवलंबून राहू नये असं वाटतं? मग आजपासून 'या' १० टीप्स फोलो करा
16
IPL Re-Start : फायनल ठरलेल्या दिवशीच खेळवण्याचा प्लॅन; पण ते कसं शक्य होईल?
17
पाकिस्तानकडून युद्धविरामचे उल्लंघन; भारतीय क्रिकेटपटूंनी पाकची केली कुत्र्याची तुलना, म्हणाले...
18
"बुद्धिमत्तापूर्ण आणि संतुलित"; पी चिदंबरम यांनी पंतप्रधान मोदींच्या युद्ध धोरणाचं केलं भरभरुन कौतुक
19
पुन्हा समोर आला पाकिस्तानचा दुटप्पी चेहरा; युद्धविरामानंतर रात्री काय-काय घडलं? जाणून घ्या
20
भीषण! भरधाव कारने घराबाहेर बसलेल्या महिलेसह ४ मुलांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video

केंद्राच्या पॅकेजबाबत सहकारमंत्र्यांनी स्पष्टता द्यावी : हसन मुश्रीफ

By admin | Updated: June 13, 2015 00:13 IST

राज्य बॅँकेकडून मिळालेल्या माहितीनुसार कारखान्यांनी स्वत:च्या ताकदीवर बॅँकांकडून कर्ज उपलब्ध करून घ्यायचे आहे.

कोल्हापूर : केंद्र सरकारने साखर कारखान्यांना सहा कोटींचे पॅकेज जाहीर केले; पण त्याबरोबर सहाशे कोटी व्याजाची तरतूदही केल्याने कारखान्यांना बॅँकांकडून कर्ज घ्यावे लागणार आहे. सध्या कारखान्यांची अवस्था पाहिली तर ते अशक्य असल्याने सहकारमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी पॅकेजबाबत स्पष्टता द्यावी, अशी मागणी करीत दोन हजार कोटी पॅकेजचे आश्वासन राज्य सरकारला पाळावेच लागेल, असेही राष्ट्रवादी कॉँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ यांनी पत्रकार परिषदेत सरकारला सुनावले. ते म्हणाले, केंद्राने पॅकेजची घोषणा करून कारखानदारांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला खरा; पण याबाबतची स्पष्टता सरकारच्या पातळीवर केली जात नाही. राज्य बॅँकेकडून मिळालेल्या माहितीनुसार कारखान्यांनी स्वत:च्या ताकदीवर बॅँकांकडून कर्ज उपलब्ध करून घ्यायचे आहे. त्याचे व्याज केंद्र सरकार देणार आहे. यासाठीच केंद्राने पॅकेजच्या घोषणा करताना सहाशे कोटी व्याजाची तरतूद केली आहे; पण सर्वच कारखाने आर्थिक अरिष्टात आहेत. त्यामुळे बॅँका तारणाशिवाय कर्ज देणार नाहीत. साखरेवरील कर्जाची मर्यादा संपल्याने राज्य सहकारी बॅँक वाढीव कर्ज देणार नाही, असे त्रांगडे तयार होणार असल्याने केंद्र सरकार कशा पद्धतीने कारखान्यांना पॅकेज देणार, याबाबत सहकारमंत्र्यांनी स्पष्टता द्यावी. त्यातच केंद्राने पॅकेज दिल्याने राज्य सरकार आता देणार नाही, असे सहकारमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी जाहीर केले आहे; पण त्यांना तसे करता येणार नाही.