शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
2
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
3
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
4
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
5
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
6
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
7
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
8
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?
9
Sonam Raghuvanshi : "... तर तिला फाशी द्या!", सोनम रघुवंशीचा भाऊ काय म्हणाला?
10
युक्रेनसाठी सर्वात भयावह रात्र! रशियाने केला सर्वात मोठा ड्रोन हल्ला, अनेक शहरे उद्ध्वस्त
11
99 टक्क्यांहूनही अधिकने घसरून थेट 60 पैशांवर आला होता हा पॉवर शेअर, आता 2857 टक्क्यांची तुफान तेजी!
12
लॉस एंजेलिसमध्ये भडकला हिंसाचार, पत्रकाराला अचानक लागली गोळी; अंगावर शहारा आणणारं दृष्य कॅमेऱ्यात कैद
13
"पतीला मारले, मग माझं अपहरण करून..." सोनमच्या कहाणीनं राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट
14
Mumbai Local Accident: स्वप्नातंल घर घ्यायला बाहेर पडला अन्...; रेल्वे अपघातात आयटी इंजिनिअरचा दुर्दैवी अंत!
15
कमाल झाली! थ्रो मारला स्ट्राइक एन्डला अन् रन आउटची विकेट मिळाली नॉन स्ट्राइक एन्डला (VIDEO)
16
Sonam Raghuvanshi : राजाच्या चेहऱ्यावर हसू अन् सोनमच्या डोक्यात हत्येचं प्लॅनिंग? लग्नातला 'तो' Video तुफान व्हायरल
17
प्रियकर राज शिलाँगला गेलाच नाही! राजाच्या हत्येची सुपारी अन् सोनमसोबत गुपचूप फोनाफोनी...   
18
लेफ्टनंट जनरल राजीव घई यांना मिळाली आणखी एक जबाबदारी; तिन्ही दलांवर असणार लक्ष
19
राजा रघुवंशीचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला समोर, शरीरावर कुठे-कुठे आढळल्या जखमा? 

रस्त्यांच्या मूल्यांकनावर मतैक्य व्हावे

By admin | Updated: August 22, 2015 01:06 IST

कृती समितीची अपेक्षा : टोल रद्द होईपर्यंत वसुली नकोे; एन. डी. पाटील

कोल्हापूर : आयआरबीने शहरात केलेल्या रस्त्यांचे मूल्यांकन पूर्ण झाले आहे. मूल्यांकनाच्या बाबतीत कोणतीही कसूर राहिलेली नाही. आयआरबी, नोबेल कंपनी आणि सर्वपक्षीय कृती समिती यांनी केलेल्या मूल्यांकनाबाबत मतैक्य व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त करत राज्य सरकारने आता लवकरात लवकर टोल रद्द करण्याचा निर्णय घ्यावा, असे आवाहन ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केले तर टोल रद्द होईपर्यंत आता वसुली केली जाऊ नये, असे आवाहनही यावेळी करण्यात आले. राज्य सरकारने नियुक्त केलेल्या मूल्यांकन समिती, नोबेल कंपनी आणि सर्वपक्षीय कृती समितीने केलेले मूल्यांकन आयआरबी कंपनीने अमान्य केले होते. त्यामुळे ‘आयआरबी’च्या म्हणण्याप्रमाणे टेंडरमधील दराप्रमाणे मूल्यांकन करण्याची सूचना राज्य सरकारने केली होती. त्यानुसार कृती समितीने हे मूल्यांकन करून त्याचा अहवाल गुरुवारीच सादर केला. त्याचे मूल्यांकन २५९ कोटी ७४ कोटी केले असून न केलेली कामे आणि चुकीच्या कामांचे मूल्य १२० कोटी ३९ लाख रुपये वजा जाता आयआरबीला फक्त १३९ कोटी ३५ लाख रुपये आणि त्यावरील व्याजाची रक्कम द्यावी लागणार आहे. नोबेल कंपनीच्या सर्वेक्षणावर आधारित डीएसआरप्रमाणे रस्त्यांचे मूल्यांकन २३९ कोटी ६२ लाख रुपये इतके झाले होते. त्यातील अपूर्ण कामे, चुकीची कामे याची किंमत वजाजाता १५८ कोटी २६ लाख रुपये द्यावे लागतील, असे पूर्वीच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे आता १५८ कोटी २६ लाख आणि १३९ कोटी ३५ लाख अशा दोन रकमांवर मूल्यांकन येऊन थांबले आहे. आर्किटेक्ट असोसिशएनचे राजेंद्र सावंत यांनी या मूल्यांकनाबाबतची सविस्तर माहिती शुक्रवारी पत्रकार व कृती समितीच्या सदस्यांना दिली. ‘आयआरबी’ने केलेले सर्व दावे या मूल्यांकनाच्या माध्यमातून खोडून काढले असून अनेक बाबी आयआरबीला मान्य करणे भाग पडले असल्याचे सावंत यांनी सांगितले. जागेवरील मापे, डांबराचे नमुने,कॉँक्रीटचा दर्जा याबाबतचे सर्व दावे आपण चुकीचे ठरविल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी रामभाऊ चव्हाण, दिलीप पवार, बाबूराव कदम, पंडितराव सडोलीकर, बाबा पार्टे, बाबा इंदूलकर, दिलीप देसाई, लाला गायकवाड, गणी आजरेकर, भगवान काटे, चंद्रकांत यादव, दीपा पाटील, वैशाली महाडिक, बाबा महाडिक, जयकुमार शिंदे, किसन कल्याणकर आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)