शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

सहकारी संस्थांच्या निवडणुका घेण्याबाबत मतमतांतरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 04:19 IST

राजाराम लोंढे , लोकमत न्यूज नेटवर्क काेल्हापूर : राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका घेण्याबाबत राज्य मंत्रिमंडळातच मतमतांतरे आहेत. शासनाने दिलेली ...

राजाराम लोंढे , लोकमत न्यूज नेटवर्क

काेल्हापूर : राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका घेण्याबाबत राज्य मंत्रिमंडळातच मतमतांतरे आहेत. शासनाने दिलेली मुदतवाढ डिसेंबरअखेर संपत असल्याने निवडणूक घेण्याबाबत संबंधित विभागाने प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर ठेवला आहे. मात्र, राजकीय सोयीसाठी काही ज्येष्ठ नेत्यांचा जानेवारीपासून निवडणूक घेण्यास विरोध असल्याने आणखी मुदतवाढ मिळण्याची शक्यता असल्याची चर्चा आहे.

राज्यात सत्तांतर झाल्यानंतर महाविकास आघाडी सरकारने महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना आणली. ही योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी सहकारी संस्थांच्या निवडणुका लांबणीवर टाकण्याचा निर्णय सरकारने घेतला. तोपर्यंत कोरोनाचे संकट आल्याने निवडणुका पुढे गेल्या. सप्टेंबरपर्यंतची मुदत संपल्याने सरकार डिसेंबर २०२० अखेर निवडणुकीसाठी मुदतवाढ दिली. येत्या सात दिवसांत मुदत संपत असल्याने सहकार निवडणूक प्राधिकरणाने निवडणुकीची तयारी केली आहे. निवडणुकीबाबतचा प्रस्ताव आठ-दहा दिवसांपूर्वीच सरकारकडे पाठविला आहे. मात्र निवडणुका घ्याव्यात की नको, यावर मंत्रिमंडळातच दोन प्रभाव आहेत.

संस्थांच्या संचालक मंडळाची मुदत संपून वर्ष उलटले आहे. आणखी मुदतवाढ दिली तर सभासदांमध्ये असंतोष तयार होऊ शकतो. यासाठी १ जानेवारीपासून निवडणुका घ्याव्यात, असे काही मंत्र्यांचे म्हणणे आहे. तर, काही नेत्यांना राजकीय सोयीसाठी निवडणुका नको आहेत. मराठवाड्यातील एका ज्येष्ठ मंत्र्याने निवडणूक लांबणीवर टाकण्याचा आग्रह धरल्याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे निवडणुकीचा चेंडू आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कोर्टात पोहोचला आहे. सहकार कायद्यानुसार एक वर्षापेक्षा अधिक काळ संस्थांची निवडणूक लांबणीवर टाकता येत नाही. ही मुदत १७ मार्च २०२१ रोजी संपत असल्याने किमान दोन महिने तरी निवडणुका लांबणीवर टाकण्याच्या हालचाली सरकारच्या पातळीवर आहेत.

...मग संस्थांनी घोडे मारले काय

कोरोनाचे कारण पुढे करत सरकार सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलत आहे. दुसरीकडे ‘पदवीधर’, ‘शिक्षक’, महापालिका, ग्रामपंचायतीच्या निवडणुका घेत आहे. मग सहकारी संस्थांनीच काय घोडे मारले? अशी विचारणा होत आहे.