शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
2
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
3
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
4
पाकिस्तानला आणखी एक धक्का; सिंधू कराराबाबत जागतिक बँकेने घेतली भारताची बाजू...
5
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
6
"राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आले तर आक्षेप नाही; काँग्रेसची भूमिका भारत जोडोची’’, हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया
7
भारताने केलेला ड्रोन हल्ला का रोखला नाही? पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांचं संसदेत अजब उत्तर, म्हणाले...  
8
Jalgaon Accident: भरधाव टिप्परची दुचाकीला धडक; आजी- आजोबांच्या डोळ्यांदेखत दोन नातवंडांचा मृत्यू
9
अक्षय केळकरनं १० वर्षांच्या रिलेशनशिपनंतर 'रमा'सोबत थाटला संसार, पहिला फोटो आला समोर
10
भारत-पाक संघर्षादरम्यान 'या' ड्रोन उत्पादक कंपनीच्या शेअर्सला अपर सर्कीट; तुमच्याकडे आहे का?
11
“भविष्यात STच्या नव्या बसेस हायब्रीड इंधनावर, डिझेलच्या पर्यायांचा विचार आवश्यक”: सरनाईक
12
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
13
Mumbai: पिझ्झा देण्याच्या बहाण्याने घरी नेले आणि...; आठ वर्षाच्या चिमुकलीसोबत शेजाऱ्याचे संतापजनक कृत्य
14
भारत-पाक संघर्षाचा बाजारावर दबाव! आठवड्यात ३ टक्के घसरण; फक्त 'या' सेक्टरमध्ये तेजी
15
भारत-पाक तणावादरम्यान एअरटेलच्या अध्यक्षांचा मोठा निर्णय, चिनी कंपनीतील हिस्सा खरेदी करणार
16
IPL 2025: आयपीएल रद्द होणार की, उर्वरित सामनेही खेळवले जाणार? बीसीसीआयनं घेतला 'हा' निर्णय
17
India Pakistan: एटीएम २-३ दिवस बंद राहणार? व्हायरल मेसेजबद्दल सरकारने केला खुलासा
18
महामृत्युंजय मंत्र कधी व कोणासाठी म्हणावा? त्यामुळे नेमका कसा लाभ होतो? जाणून घ्या!
19
Operation Sindoor Live Updates: राज्यांना आपत्कालीन अधिकारांचा वापर करण्याची परवानगी, गृह मंत्रालयाचा निर्णय
20
हा दिग्गज १०८ अब्ज डॉलर्सची संपत्ती दान करणार; ठरणार आजवरचं सर्वात मोठं परोपकारी कार्य

विनय कोरे-बाबासाहेब पाटील यांच्यात वाद

By admin | Updated: August 13, 2016 00:54 IST

जिल्हा बँकेत बैठक : ‘दत्त-आसुर्ले’ची व्याजमाफी

कोल्हापूर : आसुर्ले-पोर्ले (ता. पन्हाळा) येथील दत्त साखर कारखान्याच्या अवसायन काळातील व्याजमाफीवरून जिल्हा बॅँकेचे ज्येष्ठ संचालक विनय कोरे व बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर यांच्यात जिल्हा बॅँकेच्या शुक्रवारी झालेल्या औद्योगिक समितीच्या बैठकीत वादंग झाले. ‘दत्त’चे अवसायन काळातील व्याज जिल्हा बॅँकेने घेतले नसल्याने बॅँकेचा सुमारे ६० कोटींचा तोटा झाल्याचे निदर्शनास आणून देत यासंबंधीची याचिका मागे घेतल्याबद्दल कोरे यांनी नाराजी व्यक्त केली होती. अवसायन काळातील व्याज घेऊ नये, असा सहकार कायदा सांगत असला तरी याबाबत न्यायालय काय निर्णय घ्यायचे ते घेऊ दे; याचिका मागे घेऊ नका, असा कोरे यांचा आग्रह होता; पण व्याजमाफीबाबत प्रशासक काळात ना हरकत दाखला दिला आहे. त्यात सहकार कायद्यानुसार याचिका मागे घेतल्याचे बॅँकेचे अध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ यांचे म्हणणे आहे. बॅँकेने व्याज माफ न करता ते कारखान्याच्या संचालक मंडळाकडून वसूल करून घ्यावे, असा कोरे यांचा आग्रह आहे. हे प्रकरण गेले पंधरा दिवस बॅँकेत गाजत आहे. त्यात शुक्रवारी बॅँकेत औद्योगिक विभागाची बैठक होती. कोरे हे पन्हाळ्यातील चार-पाच संस्थांच्या कर्जांबाबत बॅँकेत आले होते. तिथे बाबासाहेब पाटील -आसुर्लेकर हेही उपस्थित होते. यावेळी कोरे व पाटील यांच्यात जोरदार वादावादी झाल्याचे समजते. अखेर अध्यक्ष मुश्रीफ यांनी मध्यस्थी करीत वादावर पडदा टाकल्याचे समजते. दोन सत्ताधारी संचालकांमधील वादाची चर्चा शुक्रवारी दिवसभर बॅँकेच्या वर्तुळात सुरू होती. (प्रतिनिधी)विधानसभा निवडणुकीच्या राजकारणाची किनार!विधानसभा निवडणुकीत पन्हाळा-शाहूवाडीतून विनय कोरे यांचा निसटता पराभव झाला होता. त्यावेळी राष्ट्रवादीतर्फे बाबासाहेब पाटील हेही रिंगणात होते. त्याचा राग कोरे यांच्या मनात आहे. गेल्या आठवड्यात पन्हाळा तालुक्यातील एका संस्थेला कर्ज देण्यास पाटील यांनी थेट विरोध केल्याने दोघांमधील वितुष्ट वाढत गेले. याबाबत बाबासाहेब पाटील यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी असा वाद आमच्यात झाला नसल्याचे सागिंतले.