शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

१७०० रुपये उचलीला विरोध

By admin | Updated: December 15, 2015 00:27 IST

‘स्वाभिमानी’ आक्रमक : ‘दत्त’, ‘जवाहर’च्या शेती कार्यालयांना टाळे; कुरुंदवाडमध्ये खुर्च्यांची तोडफोड

जयसिंगपूर / कुरुंदवाड : साखर कारखान्यांकडून उसाची पहिली उचल १७०० रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येत असल्याची कुणकुण लागताच स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने जयसिंगपूर व कुरुंदवाड येथील कारखान्यांच्या शेती कार्यालयाला टाळे ठोकण्यात आले. कुरुंदवाडमध्ये जवाहर कारखान्याच्या कार्यालयात ‘स्वाभिमानी’च्या संतप्त कार्यकर्त्यांनी खुर्च्यांची मोडतोड केल्याने काही काळ तणाव निर्माण झाला. दरम्यान, आज, मंगळवारी दुपारी बारा वाजेपर्यंत फॉर्मुल्याप्रमाणे कारखानदारांनी दर जाहीर करावा, अन्यथा उद्या, बुधवारपासून ऊस वाहतूक रोखण्याचा इशारा यावेळी ‘स्वाभिमानी’ने दिला. ‘एफआरपी’च्या रकमेवरून आंदोलनाची पहिली ठिणगी पडली असून साखर कारखानदार कोणता निर्णय घेतात याकडे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.एफआरपीबाबत मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत ८० :२० टक्केचा फॉर्म्युला स्वाभिमानी संघटनेने मान्य केला आहे. ८० टक्क्यांप्रमाणे येथील कारखान्यांची पहिली उचल २००२ रुपये होते. मात्र, जवाहर व दत्त साखर कारखान्यांकडून पहिली उचल १७०० रुपये सेवा सोसायटीची छाननी करून जमा करण्याच्या हालचाली सुरू केल्याची कुणकुण स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना सोमवारी दुपारी चारच्या सुमारास लागली. त्यामुळे संतप्त कार्यकर्त्यांनी जयसिंगपूर येथील जवाहर कारखान्याच्या शेती विभागीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांना बाहेर काढून कार्यालयास टाळे ठोकले. त्यानंतर कार्यकर्त्यांनी शरद कारखान्याच्या विभागीय कार्यालयाकडे फॉर्म्युल्याप्रमाणे दर देण्याची मागणी केली. १३ व्या गल्लीतील दत्त कारखान्याच्या विभागीय कार्यालयाला टाळे ठोकण्यात आले. उदगाव येथे ऊस वाहतूक करणारी वाहने काही काळ अडवून आंदोलन केले. आंदोलनात अण्णासो चौगुले, जि. प.चे सदस्य सावकर मादनाईक, अदिनाथ हेमगिरे, सागर शंभूशेट्टे, सागर चिप्परगे, विठ्ठल मोरे, मिलिंद साखरपे, मारुती चौगुले, राजगोंडा पाटील, रामगोंडा पाटील, सागर मादनाईक, दिग्विजय सूर्यवंशी, अशोक आनंदा यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले.कुरुंदवाड येथे स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी @‘जवाहर’च्या विभागीय कार्यालयातील प्लास्टिक खुर्ची बाहेर आणून मोडतोड केली. कार्यालयाला टाळे ठोकून मोर्चा दत्त साखर कारखाना कार्यालयाकडे वळला. येथील सर्व कर्मचाऱ्यांना बाहेर काढत असताना कुरुंदवाड पोलीस येथे दाखल झाले. त्यांनी आंदोलन शांततेत करण्याचे आवाहन केले. बंडू पाटील, विश्वास बालीघाटे, बाळासो मगदूम, अबू महात, सुरेश भबिरे, दत्ता गुरव, नंदू पाटील यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते.‘स्वाभिमानी’चा सहसंचालक कार्यालयात ठिय्याकोल्हापूर : जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी प्रतिटन १७०० रुपयेप्रमाणे पहिली उचल शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केल्याविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयात सोमवारी गोंधळ घातला. यावेळी संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी करत तब्बल दोन तास कार्यालयात ठिय्या मारला. ‘शाहू’, ‘मंडलिक’ व ‘घोरपडे’ या कागल तालुक्यातील कारखान्यांवर कारवाईचे लेखी पत्र घेतल्यानंतरच कार्यकर्त्यांनी कार्यालय सोडले. राज्य सरकार व स्वाभिमानी शेतकरी संघटना यांच्यामध्ये झालेल्या समझोत्यानुसार ८० टक्के पहिली उचल देणे बंधनकारक होते. परंतु, दत्त-शिरोळ, जवाहर-हुपरी या कारखान्यांनी १७०० रुपयांप्रमाणे बिले देण्याची तयारी सुरू केली आहे. हे समजताच ‘स्वाभिमानी’च्या कार्यकर्त्यांनी सोमवारी सायंकाळी पाच वाजता प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालय गाठले. यावेळी या कारखान्यांनी १७०० रुपये उचल कशी दिली? असा जाब विचारत गोंधळ घालण्यास सुरुवात केली. यानंतर साखर उपसंचालक दिग्विजय राठोड यांनी ‘दत्त’ व ‘जवाहर’ कारखाना प्रशासनाशी बोलणे केले. यावर, विकास संस्थांच्या कर्जासाठी ही छाननी सुरू केली आहे. हा ऊस दर नसल्याचे कारखाना प्रशासनाने खुलासा केला. परंतु, ‘स्वाभिमानी’शी झालेल्या समझोत्यानुसार ८० टक्के उचल होते का? अशी विचारणा करत ही छाननी थांबविण्याची मागणी जिल्हाध्यक्ष भगवान काटे यांनी केली. तसेच, शाहू-कागल, मंडलिक-हमीदवाडा, संताजी घोरपडे-सेनापती कापशी या कारखान्यांनी १७०० रुपये प्रमाणे बॅँकेत पैसे जमा केल्याचे स्वस्तिक पाटील यांनी निदर्शनास आणून दिले. त्यांनी दिलेली उचल परत घेण्याचे आदेश द्यावेत; अन्यथा कार्यालय सोडणार नाही, यावर कार्यकर्ते ठाम राहिले. त्यामुळे कारवाईचे लेखी पत्र दिल्यानंतरच कार्यकर्त्यांनी कार्यालय सोडले. यावेळी लेखापरीक्षक धनंजय पाटील, प्रकाश परीट, महेश पाटील, सचिन शिंदे, अजित दानोळे, प्रीतम पाटील, आशिष समगे, शहाजी गावडे, अमोल पाटील आदी उपस्थित होते.