शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

ठेकेदाराला जबाबदार धरणार

By admin | Updated: December 24, 2016 00:55 IST

‘थेट पाईपलाईन’बाबत इशारा : स्थायी सभेत स्पष्टीकरण

कोल्हापूर : शहरासाठी राबविण्यात येणाऱ्या थेट पाईपलाईन योजनेच्या कामाबाबत गेल्या काही दिवसांपासून नगरसेवक अनेक प्रकारच्या तक्रारी करीत आहेत. थर्ड पार्टी आॅडिट झाल्याखेरीज ठेकेदारास काम करू देऊ नये, अशीही मागणी केली होती. अखेर शुक्रवारी स्थायी समितीच्या सभेत खुलासा करताना प्रशासनाने थर्ड पार्टी आॅडिट झाल्यानंतरही पाईपलाईनच्या कामात त्रुटी आढळल्यास ठेकेदार आणि सल्लागार (कन्सल्टंट) यांना जबाबदार धरण्यात येईल, असा इशारा दिला. सभेच्या अध्यक्षस्थानी सभापती मुरलीधर जाधव होेते. शुक्रवारी झालेल्या स्थायी समितीच्या सभेत सत्यजित कदम, सूरमंजिरी लाटकर, मेहजबीन सुभेदार यांनी थेट पाईपलाईन योजनेच्या कामाचा विषय उपस्थित करून प्रशासनाचे लक्ष वेधले. योजनेच्या कामाचे थर्ड पार्टी आॅडिट करण्यात येत आहे. ते झाल्यानंतर जर कामात त्रुटी आढळल्या तर त्याची जबाबदारी कोणाची? असा प्रश्न सभेत विचारण्यात आला. योजनेच्या कामावर लक्ष ठेवण्यासाठी जबाबदार अधिकारी का नेमला जात नाही, अशीही विचारणा यावेळी करण्यात आली. योजनेचे काम चांगल्या प्रकारे करून घ्या, अशी सूचना सभेत करण्यात आली. आतापर्यंतच्या कामाचे आॅडिट पूर्ण झाल्यावरच पुढील निधी उपलब्ध होणार आहे. सध्या सुरू असलेल्या कामाचे व्हिडीओ चित्रीकरण करण्यात येत आहे. योजनेच्या कामावर नियंत्रण ठेवण्याकरिता कार्यकारी अभियंता दर्जाचा अधिकारी तसेच दोन उपजल अभियंता मिळण्याबाबत शासनाशी पत्रव्यवहार करण्यात आला आहे, असेही प्रशासनातर्फे स्पष्ट करण्यात आले. कसबा बावडा परिसरातील झूम प्रकल्पावरील कचऱ्याच्या ढिगाला वारंवार आग लागत आहे. त्यामुळे नागरिकांना श्वसनाचा त्रास होत आहे. यावर उपाययोजना करण्यात यावी, अशी सूचना सभेत करण्यात आली. त्यावेळी झूम प्रकल्पावर ७७ टक्के विघटन न होणारा कचरा (इनर्ट मटेरियल) आहे. ३१ मेपूर्वी हा सर्व कचरा हलविण्याचे नियोजन आहे. २ आॅक्टोबर २०१७ पर्यंत कचऱ्याच्या निर्गतीचा प्रश्न निकाली निघालेला असेल, असे मुख्य आरोग्य निरीक्षक डॉ. विजय पाटील यांनी सांगितले. तावडे हॉटेलचं काय झालं? स्थायीच्या सभेत गेल्या वर्षभरापासून तावडे हॉटेल परिसरातील विनापरवाना बांधकामांचा विषय गाजतो आहे. प्रत्येक सभेत दोन नगरसेविका ‘तावडे हॉटेलचं काय झालं?’ असा प्रश्न न विसरता विचारतात. सध्या हा विषय न्यायप्रविष्ट असून सरकारला तावडे हॉटेल परिसराची जागा कोणाची आहे, हे निश्चित करून न्यायालयात अ‍ॅफिडेव्हिट घाला, असा आदेश दिला आहे. राज्य सरकारने त्याकरिता वेळ मागून घेतली आहे. इतकी सगळी बाजू स्पष्ट असताना तोच-तोच प्रश्न विचारण्यामागे काही हेतू दडला आहे का, अशी शंका येण्यासारखी परिस्थिती मात्र त्यामुळे तयार झाली आहे.