शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

‘गोकुळ’ची निवडणूक प्रक्रिया सुरू ठेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 04:27 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाची (गोकुळ) निवडणूक मतदान केंद्रांची संख्या दुप्पट करून निवडणूक ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाची (गोकुळ) निवडणूक मतदान केंद्रांची संख्या दुप्पट करून निवडणूक प्रक्रिया सुरूच ठेवण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी दिला. न्यायमूर्ती उदय ललित व न्यायमूर्ती ऋषिकेश रॉय यांच्या खंडपीठासमाेर सुनावणी पूर्ण झाली. उच्च न्यायालयापाठोपाठ सर्वोच्च न्यायालयातही सत्तारूढ गटाला झटका बसला आहे.

काेल्हापूर जिल्ह्यात काेरोनाचे रुग्ण वाढत असल्याने ‘गोकुळ’ची निवडणूक प्रक्रिया स्थगित करावी, यासाठी सत्तारूढ गटाने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. उच्च न्यायालयाने ती फेटाळून लावल्यानंतर रवींद्र पाटील (कसबा तारळे) व आनंदा चौगुले (शिरगाव) यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर सुनावणी होऊन यामध्ये राज्य सरकारला म्हणणे मांडण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार मंगळवारी सरकारने न्यायालयात म्हणणे सादर केले.

पंढरपूर विधानसभा निवडणुकीनंतर तिथे कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढल्याचे मत सत्तारूढ गटाच्या वकिलांनी मांडले. त्याचबरोबर कोल्हापुरात कोरोनाचे रुग्ण वाढत असून ‘गोकुळ’च्या दोन ठरावधारकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून ४० मतदार काेरोनाबाधित असल्याचे सत्तारूढ गटाच्यावतीने न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.

त्यावर राज्यात गेल्या आठवड्यापेक्षा ४० टक्क्याने रुग्णांची संख्या कमी झाली आहे. त्यातच ‘गोकुळ’चे ३६५० मतदार असून ३५ केंद्रांवर मतदान घेतले जाणार आहे. पंढरपूर विधानसभा व कृष्णा साखर कारखान्याची निवडणूक सुरू आहे. मतदानासाठी पाच दिवस राहिले असून मार्गदर्शक नियमावलीनुसार निवडणूक प्रक्रिया सुरू असल्याचे म्हणणे राज्य सरकारच्यावतीने न्यायालयात मांडण्यात आले.

यावर, मतदान केंद्रांची संख्या दुप्पट करून ‘गोकुळ’ची निवडणूक प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले. त्यामुळे गेला दीड महिना निवडणुकीबाबत अस्पष्टतेच्या तयार झालेल्या वातावरणाला पूर्णविराम मिळाला.

उच्च न्यायालयापाठोपाठ सर्वोच्च न्यायालयानेही निवडणूक सुरू ठेवण्याचे आदेश दिल्याने हा सत्तारूढ गटाला झटका मानला जात आहे.