शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
3
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
4
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
5
क्रिकेटच्या देवाकडून जेमी-हरमनप्रीतला शाब्बासकी! ऐतिहासिक विजय युवी, एबी आणि गंभीरलाही भावला
6
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
7
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
8
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
9
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
10
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
11
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
12
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
13
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
14
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
15
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
16
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
17
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
18
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
19
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
20
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा

‘गोकुळ’ची निवडणूक प्रक्रिया सुरू ठेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 04:27 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाची (गोकुळ) निवडणूक मतदान केंद्रांची संख्या दुप्पट करून निवडणूक ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाची (गोकुळ) निवडणूक मतदान केंद्रांची संख्या दुप्पट करून निवडणूक प्रक्रिया सुरूच ठेवण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी दिला. न्यायमूर्ती उदय ललित व न्यायमूर्ती ऋषिकेश रॉय यांच्या खंडपीठासमाेर सुनावणी पूर्ण झाली. उच्च न्यायालयापाठोपाठ सर्वोच्च न्यायालयातही सत्तारूढ गटाला झटका बसला आहे.

काेल्हापूर जिल्ह्यात काेरोनाचे रुग्ण वाढत असल्याने ‘गोकुळ’ची निवडणूक प्रक्रिया स्थगित करावी, यासाठी सत्तारूढ गटाने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. उच्च न्यायालयाने ती फेटाळून लावल्यानंतर रवींद्र पाटील (कसबा तारळे) व आनंदा चौगुले (शिरगाव) यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर सुनावणी होऊन यामध्ये राज्य सरकारला म्हणणे मांडण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार मंगळवारी सरकारने न्यायालयात म्हणणे सादर केले.

पंढरपूर विधानसभा निवडणुकीनंतर तिथे कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढल्याचे मत सत्तारूढ गटाच्या वकिलांनी मांडले. त्याचबरोबर कोल्हापुरात कोरोनाचे रुग्ण वाढत असून ‘गोकुळ’च्या दोन ठरावधारकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून ४० मतदार काेरोनाबाधित असल्याचे सत्तारूढ गटाच्यावतीने न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.

त्यावर राज्यात गेल्या आठवड्यापेक्षा ४० टक्क्याने रुग्णांची संख्या कमी झाली आहे. त्यातच ‘गोकुळ’चे ३६५० मतदार असून ३५ केंद्रांवर मतदान घेतले जाणार आहे. पंढरपूर विधानसभा व कृष्णा साखर कारखान्याची निवडणूक सुरू आहे. मतदानासाठी पाच दिवस राहिले असून मार्गदर्शक नियमावलीनुसार निवडणूक प्रक्रिया सुरू असल्याचे म्हणणे राज्य सरकारच्यावतीने न्यायालयात मांडण्यात आले.

यावर, मतदान केंद्रांची संख्या दुप्पट करून ‘गोकुळ’ची निवडणूक प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले. त्यामुळे गेला दीड महिना निवडणुकीबाबत अस्पष्टतेच्या तयार झालेल्या वातावरणाला पूर्णविराम मिळाला.

उच्च न्यायालयापाठोपाठ सर्वोच्च न्यायालयानेही निवडणूक सुरू ठेवण्याचे आदेश दिल्याने हा सत्तारूढ गटाला झटका मानला जात आहे.