शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान सामना रद्द; तीव्र नाराजीनंतर WCL आयोजकांनी मागितली जाहीर माफी, म्हणाले...
2
ठाकरे बंधू एकत्रच, कुणाला काय प्रॉब्लेम?, मी आणि राज एकत्र आल्यानं..."; उद्धव ठाकरे कडाडले
3
डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा बोलले पाकिस्तानची भाषा, म्हणे "पाच विमाने पाडली, हे युद्ध मीच थांबविले"
4
बालरोग विभागाच्या प्रमुखाकडून त्रास, ‘जे जे’मध्ये निवासी डॉक्टरांचे आंदोलन सुरूच! 
5
आजचे राशीभविष्य, २० जुलै २०२५: संकटात टाकणारे विचार, व्यवहार व नियोजनापासून दूर राहा
6
नोकरीचे प्रलोभन दाखवून तरुणीवर बलात्कार, आरोपीला अटक, ५ दिवसांची पोलीस कोठडी
7
नोकरी सोडताना कर्मचाऱ्याचा केलेला अपमान कंपनीला पडला महागात; कोर्टाने ठोठावला दंड
8
केमोथेरपीमुळे कॅन्सर आणखी बळावण्याची भीती?; चिनी संशोधकांचा धक्कादायक दावा
9
चीन तिबेटमध्ये बांधतोय जगातील सर्वांत मोठे धरण; भारत-चीन सीमेजवळ असणार प्रकल्प
10
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, दुपटीने लाभ; २ राजयोग करतील मालामाल, शुभ काळ!
11
लक्षात ठेवा, मी सांगतो तेच काम आणि कामाशिवाय दाम; विधिमंडळातील राड्यावर जनता नाराज
12
विधानसभा निवडणुकीत मविआच्या चुका झाल्या, उद्धव ठाकरे यांचे मत; अहंकारावरही बोट
13
शब्देविण संवादू... इमोजींची अकरा वर्षे: अबोल भावनांना मिळालेले 'रूप' आणि 'रंग'
14
त्या खासदार झाल्या, पण छळ काही थांबला नाही...; इंटर पार्लियामेंटरी युनियनचा धक्कादायक अहवाल
15
काँग्रेससोबत उत्तर भारतीयांना जोडण्यासाठी ‘मुंबई विरासत मिलन’ 
16
राज ठाकरेंना मी हिंदी शिकवली; निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचले 
17
दोन मुख्यमंत्र्यांना अटक करणाऱ्या ईडी अधिकाऱ्याने अचानक दिला राजीनामा! सेवेला १५ वर्षे शिल्लक अन् कपिल राज झाले निवृत्त
18
धक्कादायक..! छत्रपती संभाजीनगरमध्ये एकाच कुटुंबातील ३ बालकांना अचानक लुळेपणा, अशक्तपणा
19
डेस्कटॉप पुन्हा फॉर्मात! वेगवान कामगिरी आणि सोयीमुळे मागणीत वाढ
20
ताक प्या आणि मस्त राहा! पण ताकासाठी दही कसं निवडावं? हेही जाणून घ्या

उमेदवारांच्या गावात मतदानासाठी चढाओढ

By admin | Updated: April 23, 2017 17:01 IST

सकाळी उत्साह, दुपारी मतदान केंद्रांवर निरव शांतता

आॅनलाईन लोकमत

कोल्हापूर, दि. २३ : ‘भोगावती’ साखर कारखान्याच्या मतदानासाठी सकाळी उत्साह दिसत होता पण दुपारी बारानंतर सर्वच केंद्रांवर अक्षरश: निरव शांतता पसरली होती. दुपारनंतर वयोवृद्ध, आजारी व परगावाचे मतदान आणण्यासाठी कार्यकर्त्यांची धावपळ पाहायला मिळाली. सकाळी लवकर मतदान करून शेतात जाण्याची धांदल सर्वच गावांत पाहावयास मिळाली. त्यामुळे सकाळी दहापर्यंत काही अपवादवगळता बहुतांशी केंद्रांवर गर्दी दिसत होती.

पहिल्या दोन तासांत ४० टक्क्यांहून अधिक मतदान झाले होते. दुपारी बारानंतर उन्हाचा तडाखा वाढू लागला तशी मतदान केंद्रे ओस पडू लागली. दुपारी दोनपर्यंत सर्वच केंद्रांवर अक्षरश: निरव शांतता होती. दुपारच्या पुढे राहिलेल्या मतदारांचा शोध कार्यकर्त्यांनी सुरू केला होता. कोणाचे मतदान राहिले, त्याचा पाठलाग करून मतदान करण्यासाठी धडपड सुरू होती. त्यासाठी प्रत्येक आघाडीने स्वतंत्र यंत्रणा केली होती. ज्या गावात उमेदवार आहे, तिथे ही यंत्रणा अधिक गतीने काम करताना दिसत होती.

सडोली खालसा, वाशी, हसूर, राशिवडे, कौलव, घोटवडे, ठिकपुर्ली येथे मतदानात कमालीची चुरस पाहावयास मिळाली. ज्या गावात कोणत्याही आघाडीचा उमेदवार नाही, तेथील वातावरण हलके-फुलके दिसत होते. तिन्ही आघाडीचे कार्यकर्ते एकत्रित गप्पा मारत मतदारांच्या प्रतीक्षेत बसलेले दिसत होते. भोगावती येथे बिगर उत्पादक गटातील मतदान झाले. संस्था प्रतिनिधींचे मर्यादित मतदान असल्याने ही प्रक्रिया वेगाने पूर्ण झाली.

कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील, माजी आमदार संपतराव पवार, कृष्णराव किरुळकर, धैर्यशील पाटील-कौलवकर, सदाशिवराव चरापले, अरुण डोंगळे आदी नेत्यांनी करवीर व राधानगरी तालुक्यांतील मतदान केंद्रांना भेटी देऊन पाहणी केली.

एका केंद्रावर चार-पाच मतदान कक्ष!

२१ जागांसाठी ७४ उमेदवार रिंगणात होते. बिगर उत्पादक गटवगळता एका सभासदाला दहा मतपत्रिका दिल्या होत्या. त्यामुळे सहाजिकच मतदानासाठी वेळ लागणार म्हणून एका केंद्रात चार ते पाच मतदान कक्ष उभारले होते. परिणामी मतदान केंद्राबाहेर फारशा रांगा दिसत नव्हत्या.

शिरगांवमध्ये दीडपर्यंत ८२ टक्के

राधानगरी तालुक्यातील शिरगावमध्ये एका केंद्रावर दुपारी दीड वाजता २९६ पैकी २४२ मतदारांनी मतदान (८२ टक्के) झाले होते. येथे एका-एका मतासाठी तिन्ही आघाड्यांमध्ये झटापट सुरू होती. प्रत्येक गावात ५० ते १५० मतदार मृत कारखान्यासाठी ३० हजार ५१८ मतदान आहे; पण यातील सुमारे साडेतीन ते चार हजार सभासद मृत आहेत. प्रत्येक गावात जाईल त्या ठिकाणी ५० पासून १५० पर्यंत मृत सभासदांची यादीच कार्यकर्त्यांच्या हातात दिसत होती.

किसाबार्इंचे स्वालंबन!

हसूर दुमाला (ता. करवीर) येथील ऐंशी वर्षाच्या किसाबाई शंकर कांबळे एकट्याच मतदानासाठी आल्या होत्या. आजी तुमचे मतदान करतो म्हणून एक कार्यकर्ता धावला, पण त्याचा हात झटकून त्या म्हणाल्या, ‘मी काय आंधळी हाय, आजपर्यंत एकटीनेच मतदान केल्याचे’ सुनावल्यानंतर कार्यकर्ते तेथून पांगले.