शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर जिल्ह्यातील ७१ गावांत दूषित पाणी

By admin | Updated: February 5, 2016 00:51 IST

जिल्हा पाणीपुरवठा व स्वच्छता अभियान विभाग बेफिकीर

भीमगोंडा देसाई / कोल्हापूर जिल्ह्यातील तब्बल ७१ गावांतील पिण्याच्या पाण्याचे स्रोत दूषित आहेत. शुद्ध पाणी देण्याची व स्वच्छता राखण्याची जबाबदारी असलेला जिल्हा परिषदेमधील जिल्हा पाणीपुरवठा व स्वच्छता अभियान विभाग बेफिकीर असल्यामुळे अनेक महिन्यांपासून या गावांतील ग्रामस्थांना दूषित पाणी प्यावे लागत आहे. या विभागातील अधिकारी कागदी घोडे नाचविणे, माहिती दडविणे यावर अधिक लक्ष केंद्रित करीत असल्याने शुद्ध पाणी देण्याकडे दुर्लक्ष होत आहे. याउलट आरोग्य विभाग पाणी उकळून, गाळून, शुद्ध करून प्या, असे आवाहन करीत जागृती करीत आहे. मान्सूनपूर्व आणि नंतर असे वर्षातून दोन वेळा प्रत्येक गावातील जलस्रोतांमधील पाण्याचे नमुने पाणी व स्वच्छता विभागाच्या प्रशासनाकडून घेतले जातात. ते प्रयोगशाळेत तपासल्यानंतरच्या अहवालानंतर गावानिहाय शुद्ध पाणी मिळते किंवा नाही, याचा अहवाल तयार केला जातो. यंदा मान्सूननंतर केलेल्या तपासणीत जिल्ह्यातील तब्बल ७१ गावांत दूषित पाण्याचे स्रोेत असल्याचे स्पष्ट झाले. करवीर तालुक्यातील शिंगणापूर गावातील पाण्याचा एकही स्रोत पिण्यास लायक नसल्याचे समोर आले. पाणी तपासणीचा हा अहवाल आरोग्य विभागाकडे देण्यात आला आहे. आरोग्य विभागाच्या प्रशासनाने शुद्ध पाणी असलेल्या ग्रामपंचायतींना हिरवे, दूषित पाणी असलेल्या ग्रामपंचायतींना पिवळे, पिण्यास अयोग्य पाणी असलेल्या ग्रामपंचायतींना लाल कार्ड दिले आहे. केवळ पाण्याच्या स्रोतांची तपासणी करून आरोग्य विभागाकडे अहवाल दिल्यानंतर आपले काम झाले अशा भूमिकेत पाणी व स्वच्छता विभागाचे अधिकारी अजूनही आहेत. म्हणूनच ग्रामस्थांना महिनोन्महिने दूषित पाणी प्यावे लागत आहे. सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने पाणीटंचाई निर्माण होत आहे. सध्या पाण्याची टंचाई भासत आहे. त्यामुळे संबंधित ग्रामपंचायतींच्या पदाधिकाऱ्यांनी पाणी व स्वच्छता, ग्रामीण पाणीपुरवठा विभागांचे अधिकारी यांच्याशी पाठपुरावा करून शुद्ध पाणी देण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज ठळक झाली आहे.