शहरं
Join us  
Trending Stories
1
आता वेळ नाही, भारतात आल्यावर योग्य उत्तर देईन; शशी थरुर यांचा काँग्रेसला घरचा आहेर
2
Onion Price Hike : महाराष्ट्रात कांद्याचे भाव गगनाला भिडणार? नेमकं करण तरी काय?
3
"पाकिस्तानने आधीच सिंधु पाणी कराराचे उल्लंघन केलेय", पाकच्या कांगाव्याला भारताकडून सडेतोड उत्तर!
4
अजित पवार यांना मोठा झटका, 7 आमदारांनी राम-राम ठोकला; या पक्षाचा झेंडा खांद्यावर घेतला
5
नातेवाईक बाहेर करत राहिले विरोध, पोलिसांनी ठाण्यात लावून दिलं लग्न, पोलीसच बनले वऱ्हाडी आणि...  
6
टाटा-रिलायन्सला सरकारी कंपनी ठरली सरस! आठवड्यात कमावला ५९,२३३ कोटी रुपयांचा नफा
7
३० कोटींची लॉटरी जिंकून पैसे गर्लफ्रेंडला दिले, दुसऱ्यासोबत फुर्र होऊन तिने बॉयफ्रेंडलाच कंगाल केले! 
8
भारताची नवीन 'रेड लाईन', पाकिस्तानात 300 KM घुसून हल्ले, CDS चौहान यांची मोठी माहिती
9
ईशान्य भारतात पावसाचा कहर, भूस्खलनासह विविध कारणांनी ३२ जणांचा मृत्यू  
10
पुढील आठवड्यात शेअर बाजारात 'लिस्टिंगचा धमाका'! १० कंपन्या करणार दणक्यात पदार्पण, गुंतवणूकदारांची चांदी?
11
रोज ६,५०० तरुणांची तंबाखूसेवनाला सुरुवात, दरवर्षी १८ लाख जण गमावतात आपला जीव
12
"संविधानामुळेच आपला देश संकटकाळातही एकसंध"; सरन्यायाधीश भूषण गवई यांचे विधान
13
कॉलेजचं प्रेम आयुष्यात परतलं, आधीच विवाहित असलेल्या जवानानं पत्नीला संपवलं
14
चालकाला डुलकी लागली, कार थेट दुभाजक ओलांडून ट्रॅकला जाऊन धडकली; एकाचा मृत्यू, धुळे-सोलापूर महामार्गावरील घटना
15
आनंदाची बातमी...! LPG सिलिंडरची किंमत पुन्हा कमी झाली; 1 जूनपासून ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवा दर
16
फक्त SIP च नाही, आता 'STP' नेही वाढवा म्युच्युअल फंडातला परतावा! जाणून घ्या ही खास योजना!
17
पाकिस्तानमधील जीवितहानीबद्दल शोक करणारे वक्तव्य कोलंबियाने घेतले मागे- शशी थरूर
18
IPL 2025 : पुन्हा 'रोजंदारी'वर मिळालं काम! पण यावेळी MI नं दिला CSK पेक्षा दुप्पट पगार
19
शरीर संबंधास नकार मिळताच पती संतापला, पत्नीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला! मुंबईतील धक्कादायक घटना 
20
प्रेमाच्या मैदानात रिंकू सिंहचा महिला खासदाराने उडवला त्रिफळा, ८ जूनला होणार साखरपुडा

कोल्हापूर जिल्ह्यातील ७१ गावांत दूषित पाणी

By admin | Updated: February 5, 2016 00:51 IST

जिल्हा पाणीपुरवठा व स्वच्छता अभियान विभाग बेफिकीर

भीमगोंडा देसाई / कोल्हापूर जिल्ह्यातील तब्बल ७१ गावांतील पिण्याच्या पाण्याचे स्रोत दूषित आहेत. शुद्ध पाणी देण्याची व स्वच्छता राखण्याची जबाबदारी असलेला जिल्हा परिषदेमधील जिल्हा पाणीपुरवठा व स्वच्छता अभियान विभाग बेफिकीर असल्यामुळे अनेक महिन्यांपासून या गावांतील ग्रामस्थांना दूषित पाणी प्यावे लागत आहे. या विभागातील अधिकारी कागदी घोडे नाचविणे, माहिती दडविणे यावर अधिक लक्ष केंद्रित करीत असल्याने शुद्ध पाणी देण्याकडे दुर्लक्ष होत आहे. याउलट आरोग्य विभाग पाणी उकळून, गाळून, शुद्ध करून प्या, असे आवाहन करीत जागृती करीत आहे. मान्सूनपूर्व आणि नंतर असे वर्षातून दोन वेळा प्रत्येक गावातील जलस्रोतांमधील पाण्याचे नमुने पाणी व स्वच्छता विभागाच्या प्रशासनाकडून घेतले जातात. ते प्रयोगशाळेत तपासल्यानंतरच्या अहवालानंतर गावानिहाय शुद्ध पाणी मिळते किंवा नाही, याचा अहवाल तयार केला जातो. यंदा मान्सूननंतर केलेल्या तपासणीत जिल्ह्यातील तब्बल ७१ गावांत दूषित पाण्याचे स्रोेत असल्याचे स्पष्ट झाले. करवीर तालुक्यातील शिंगणापूर गावातील पाण्याचा एकही स्रोत पिण्यास लायक नसल्याचे समोर आले. पाणी तपासणीचा हा अहवाल आरोग्य विभागाकडे देण्यात आला आहे. आरोग्य विभागाच्या प्रशासनाने शुद्ध पाणी असलेल्या ग्रामपंचायतींना हिरवे, दूषित पाणी असलेल्या ग्रामपंचायतींना पिवळे, पिण्यास अयोग्य पाणी असलेल्या ग्रामपंचायतींना लाल कार्ड दिले आहे. केवळ पाण्याच्या स्रोतांची तपासणी करून आरोग्य विभागाकडे अहवाल दिल्यानंतर आपले काम झाले अशा भूमिकेत पाणी व स्वच्छता विभागाचे अधिकारी अजूनही आहेत. म्हणूनच ग्रामस्थांना महिनोन्महिने दूषित पाणी प्यावे लागत आहे. सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने पाणीटंचाई निर्माण होत आहे. सध्या पाण्याची टंचाई भासत आहे. त्यामुळे संबंधित ग्रामपंचायतींच्या पदाधिकाऱ्यांनी पाणी व स्वच्छता, ग्रामीण पाणीपुरवठा विभागांचे अधिकारी यांच्याशी पाठपुरावा करून शुद्ध पाणी देण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज ठळक झाली आहे.