शहरं
Join us  
Trending Stories
1
"वेगळे राजकारण करून पॅनलला गालबोट लावण्याचा प्रयत्न केल्यास माझ्या दारात येऊ नका",अजित पवार यांचा इशारा
2
SRH vs DC : पॅट कमिन्सचा विकेट्सचा खास पॅटर्न! स्पेल बघून काव्या मारनही झाली शॉक
3
Shivalik Sharma: मुंबई इंडियन्सच्या खेळाडूला अटक, लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप
4
रेल्वे स्थानकाच्या पायऱ्यांवर पाकिस्तानी ध्वज चिकटवला; पाहताच महिलेने घातला गोंधळ, व्हिडीओ व्हायरल
5
SRH vs DC : "डिअर क्रिकेट प्लीज प्लीज ..." दुसऱ्यांदा पदरी भोपळा पडल्यावर करूण नायर झाला ट्रोल
6
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
7
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
8
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
9
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
10
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
11
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
12
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
13
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
14
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला
15
"जातीनिहाय जनगणनेमुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास
16
फायद्याची गोष्ट! 'या' ३ गोष्टी फ्रिजमध्ये ठेवण्याची अजिबात करू नका चूक; कॅन्सरचा वाढेल धोका
17
सावधान! WhatsApp वर आला 'प्रोफाईल फोटो' स्‍कॅम; तुमच्या अकाऊंटमधून 'असे' जातील पैसे
18
शक्तीपीठ महामार्गाला विरोध करणाऱ्यांना त्याच भाषेत उत्तर, नारायण राणे यांचा इशारा
19
भारताशी पंगा घेणाऱ्या पाकिस्तानला मोठा झटका! 'या' मोठ्या एअरलाईन्स वापरणार नाहीत पाकचा एअरस्पेस
20
१ कोटी दे, नाहीतर ठार मारून टाकू; गोलंदाज मोहम्मद शमीला जीवे मारण्याच्या धमकीचा ई-मेल

पूरक्षेत्रातील बांधकामेच महापुरास कारणीभूत : अजित पवार : अलमट्टी धरणाचा महापुराशी संबंध नसल्याचा निर्वाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:25 IST

कोल्हापूर : नदीपात्रात झालेली बांधकामे हे एक महापुराचे महत्त्वाचे कारण असल्याचा निष्कर्ष राज्य शासनाने नेमलेल्या वडनेरे समितीने काढला आहे. ...

कोल्हापूर : नदीपात्रात झालेली बांधकामे हे एक महापुराचे महत्त्वाचे कारण असल्याचा निष्कर्ष राज्य शासनाने नेमलेल्या वडनेरे समितीने काढला आहे. त्यामुळे अशा बांधकामांवर आता कारवाई केली जाईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी येथे पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

कोल्हापुरातील पंचगंगा नदीला आलेल्या महापुराशी अलमट्टीच्या धरणाचा काही संबंध नसल्याचा अहवाल तज्ज्ञ समितीने यापूर्वीच दिला असल्याचा निर्वाळाही त्यांनी यावेळी दिला. नदी-नाल्यांचे मूळ प्रवाह खंडित करणारी अतिक्रमणे काढून टाकण्याबाबत कठोर निर्णय घेतले जातील. अशी अतिक्रमणे काढून टाकण्यात जे अधिकारी हयगय करतील, त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री पवार यांनी यावेळी दिले.

महापुरास ग्लोबल वॉर्मिंग कारणीभूत आहे. त्यामुळेच चीन-जर्मनीतही हजार वर्षांत झाला नाही इतका पाऊस झाला हे खरे असले तरी पूरक्षेत्रातील बांधकामेही तितकीच जबाबदार असल्याचे मत त्यांनी नोंदविले. उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, पूर रोखण्यासाठी भिंत बांधण्याबाबतचा निर्णय झाला नसून तो एक पर्याय आहे. मदतीच्या पॅकेजबाबतही कुणी काही घोषणा केल्या तरी आज, बुधवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीतच त्याबाबत निर्णय होईल. मागील तीन महापुरांचा अभ्यास करून किती पातळीपर्यंत पाणी आले होते व तेवढे पाणी आल्यास काय उपाययोजना कराव्या लागतील, असा पूरग्रस्त प्रत्येक तालुक्याचा आराखडा करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यामुळे स्थलांतरापासून जीवितहानी टाळता येणे शक्य होईल.

---

राधानगरी धरणाला दरवाजे करण्याबाबत..

राधानगरी धरणाचे सात स्वयंचलित दरवाजे पूर्ण धरण भरल्यानंतरच उघडले जातात. त्यावेळी पावसाचाही जोर असतो. त्यामुळे पूरस्थिती बिकट होते. धरणाचे नियमित पाणी सोडण्याचे पाच दरवाजे आहेत; परंतु त्यांतील दोन खासगी तत्त्वावरील वीजनिर्मितीसाठी दिले आहेत. राहिलेल्या तीन दरवाजांतून पावसाळ्यातून पाणी सोडणे शक्य नसते; कारण पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने उघडलेले दरवाजे पुन्हा बसविता येत नाहीत. त्यामुळे धरणांतील पाणी धरण भरण्यापूर्वी सोडायचे असेल तर दरवाजे करण्याबाबत चर्चा झाली. स्वयंचलित दरवाजे व एकूणच शाहूकालीन या धरणाबाबत लोकभावना तीव्र आहेत; परंतु लोकांचा जीवही महत्त्वाचा असल्याने तज्ज्ञांचे मत विचारात घेऊन धरणाच्या दरवाजांबाबत निर्णय घेऊ, असे उपमुख्यमंत्री पवार यांनी स्पष्ट केले.

शाहूवाडीत २० ठिकाणी डोंगर घसरले

शाहूवाडी तालुक्यात २० ठिकाणी डोंगर-दरड घसरून पिके व घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यामुळे पिकांची नुकसान भरपाई देताना जमीन खागलून जे नुकसान झाले त्याचाही विचार करावा लागेल, असेही उपमुख्यमंत्री पवार यांनी स्पष्ट केले.

सबमर्सिबल पंपसाठी निधी

कोल्हापूर शहरात पाणी योजनेचे पंप पुरात अडकल्याने लोकांची पिण्यासाठी तारांबळ उडाली. त्यामुळे उपसा केंद्राच्या ठिकाणी सबमर्सिबल पंप बसवता येतील का हे तपासून घ्या, त्यासाठी आवश्यक तो निधी देऊ, असे आश्वासन उपमुख्यमंत्री पवार यांनी दिले.