शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

वेगळ्या विचारधारेने संविधान धोक्यात: श्रीपाल सबनीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2018 00:07 IST

कुरुंदवाड : महात्मा फुले यांनी बहुजनांच्या घरात शिक्षणाची पेरलेली बिजे आता फळाला येत आहेत. दशरथ काळे यांच्यासारख्या सर्वसामान्य बहुजन कुटुंबातील कार्यकर्त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना ‘मानद डॉक्टरेट’ मिळाली, हे त्याचेच द्योतक आहे. संविधान धोक्यात आणणारी विचारधारा आज वेगळ्या मार्गाने प्रवेश करत आहे. याचा विचार गांभीर्याने करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन ...

कुरुंदवाड : महात्मा फुले यांनी बहुजनांच्या घरात शिक्षणाची पेरलेली बिजे आता फळाला येत आहेत. दशरथ काळे यांच्यासारख्या सर्वसामान्य बहुजन कुटुंबातील कार्यकर्त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना ‘मानद डॉक्टरेट’ मिळाली, हे त्याचेच द्योतक आहे. संविधान धोक्यात आणणारी विचारधारा आज वेगळ्या मार्गाने प्रवेश करत आहे. याचा विचार गांभीर्याने करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्षडॉ. श्रीपाल सबनीस यांनी करीत भाजप सरकारवर कडाडून टीका केली.डॉ. दशरथ काळे यांना आॅस्ट्रेलिया विद्यापीठाची ‘डॉक्टरेट’ ही मानद पदवी मिळाल्याबद्दल इचलकरंजी येथील घोरपडे नाट्यगृहात आयोजित नागरी सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे होते.यावेळी खासदार राजू शेट्टी, उपनगराध्यक्ष सरिता आवळे, माजी आमदार राजीव आवळे, दादासो लाड, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष विठ्ठलराव नाईक-निंबाळकर, दादासो पाटील, किरण आलासे, रामचंद्र डांगे, पंचगंगा साखर कारखान्याचे अध्यक्ष पी. एम. पाटील, सावकार मादनाईक, प्रा. महेश थोरवे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. स्वागत विद्याधर कुलकर्णी यानी, तर प्रास्ताविक आप्पा पाटील यांनी केले. सूत्रसंचालन शशिकांत मुद्दापुरे, तर बाबासाहेब नदाफ यांनी आभार मानले.डॉ. काळे यांना अनोखी भेटकार्यक्रमासाठी माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील प्रमुख पाहुणे होते. मात्र, तांत्रिक अडचणींमुळे कार्यक्रमास वेळेत येणे शक्य नसल्याने डॉ. पाटील यांनी दशरथ काळे यांच्या चैतन्य शिक्षण समूहाला कार्यक्रमाआधीच भेट देऊन त्यांच्या कार्याचा गौरव करत डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाची ‘मानद डॉक्टरेट’ही काळे यांना जाहीर करून अनोखी भेट दिली....तर निषेधाची पहिलीसभा माझीच असेलसाहित्यिक डॉ. सबनीस यांनी सुमारे एक तासाच्या व्याख्यानात भाजप सरकारवर कडाडून टीका केली तर दुसरीकडे खासदार शेट्टी यांची शेतकऱ्यांसाठी असलेली तळमळ व प्रामाणिक प्रयत्न यांचा गौरव करत असताना त्यांना शेट्टीसाहेब तुम्ही आमदार, खासदार व्हा. मात्र, मंत्री बनू नका. मंत्री झाल्याने तुमच्याच सहकाºयाची काय अवस्था झाली आहे, अशा कानपिचक्या देत जेव्हा मंत्री व्हाल तेव्हा तुमच्या निषेधाची सर्वांत पहिली सभा माझी असेल, असा इशारा देताच सभागृहाबरोबर खा. शेट्टी यांनीही त्यांच्या वक्तव्याला टाळ्या वाजवून प्रतिसाद दिला.