शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
3
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
6
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
7
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
8
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
9
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
10
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
11
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
12
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
13
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
14
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
15
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
16
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
17
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
18
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
19
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
20
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर

जनता बेघर राहावी हे समरजित घाटगेंचे षड्यंत्र

By admin | Updated: July 1, 2017 01:06 IST

जनता बेघर राहावी हे समरजित घाटगेंचे षड्यंत्र

लोकमत न्यूज नेटवर्ककागल : कागलमध्ये एका घरात चार-चार कुटुंबे राहतात. धाडसाने १००२ घरांची घरकुल योजना शहरात राबविली. ही आमदार मुश्रीफ यांनी चूक केली काय? आठ लाखांचे घर पन्नास हजारांत जर मिळत असेल तर समरजित घाटगे तुमच्या पोटात का दुखतंय? कागलची जनता गरीब, बेघर राहावी, हे समरजित घाटगेंचे षड्यंत्र आहे, अशी टीका जिल्हा बँकेचे संचालक प्रताप ऊर्फ भैया माने यांनी केली. घरकुल योजनेबद्दल भाजप, मित्र पक्षांनी गुरुवारी काढलेल्या मोर्चाचा निषेध म्हणून शुक्रवारी काँग्रेस पक्ष - मित्र आघाडी यांच्यावतीने निषेध मोर्चा काढण्यात आला. नगरपालिकेजवळ या मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. तेव्हा भैया माने बोलत होते. भैया माने म्हणाले की, तुम्ही ‘म्हाडा’चे अध्यक्ष आहात. आम्ही जागा देतो. तुम्ही घरकुलाच्या किमतीत घर बांधून दाखवा; पण गोरगरिबाची चेष्टा थांबवा. शाहूंचे वारसदार म्हणता आणि जातीयवादी बोलता? शाहू दूध संघातील भ्रष्टाचाराबद्दल उत्तर द्या. कागलच्या युवकांची, गरिबांची बदनामी थांबवा अन्यथा राजा विरुद्ध प्रजा हा नवा संघर्ष सुरू होईल. घरकुलाच्या कोणत्याही चौकशीला आम्ही तयार आहोत. यावेळी माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर, रमेश माळी उपनगराध्यक्ष नितीन दिंडे, अजित कांबळे, पक्षप्रतोद प्रवीण काळबर, चंद्रकांत गवळी, आदींची भाषणे झाली. ज्येष्ठ नगरसेवक चंद्रकांत गवळी, संताजी घोरपडे साखर कारखान्याचे अध्यक्ष नवीद मुश्रीफ, माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर, अशोक जकाते, नगरसेवक - नगरसेविका कार्यकर्ते मोठ्या संख्येने हजर होते. मोर्चात घरकुल लाभार्थींची मोठी गर्दी होती. शहर अध्यक्ष संजय चितारी यांनी आभार मानले. ...तर राजीनामा : प्रवीण काळबरसमरजित घाटगेंनी निपाणी-संकेश्वरमधील मुस्लिमांना घरे दिली आणि कागलच्या गरीब मुसलमानांना वंचित ठेवले, असा धादांत खोटा आरोप केला आहे. १००२ लोकांच्या यादीत निपाणी, संकेश्वर, मिरज येथील एक जरी नाव असेल तर सिद्ध करा, नगरसेवकपदाचा राजीनामा देतो. शाहूंच्या विचारांचे वारस असणाऱ्या मुश्रीफसाहेबांची राजकारणासाठी बदनामी करू नका, असे पक्षप्रतोद काळबर यांनी सांगितले. सिंह, गिधाडे, गाढव आणि अस्वल, शेळी गुरुवारी घाटगे यांनी सिंहाची मिरवणूक गिधाडे, गाढव काढू शकत नाहीत, अशी टीका केली होती. प्रकाश गाडेकर यांनी, तुम्ही सिंह नाही शेळी आहात. वाघाच्या जबड्यात हात घालू नका असे सांगितले. शाहू दूध संघाचा तोटा शाहू साखर कारखान्यातून भरून काढून मोठा भ्रष्टाचार केला जात आहे, असा आरोपही करण्यात आला.