शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
2
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
3
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
4
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
5
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
6
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
7
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
8
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
9
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
10
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
11
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
12
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
13
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
14
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
15
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
16
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
17
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
18
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
19
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
20
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
Daily Top 2Weekly Top 5

आजऱ्यातील भाताच्या देशी वाणांचे संवर्धन गरजेचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:26 IST

सदाशिव मोरे। आजरा : आजरा तालुक्यातून लोप पावत चाललेल्या घनसाळ, काळाजिरगा, चंपाकाळी, कोतमीर साळ, हावळा या भाताच्या देशी वाणांच्या ...

सदाशिव मोरे।

आजरा : आजरा तालुक्यातून लोप पावत चाललेल्या घनसाळ, काळाजिरगा, चंपाकाळी, कोतमीर साळ, हावळा या भाताच्या देशी वाणांच्या संवर्धनाची गरज आहे. उत्पादित होणाऱ्या देशी भातांमध्ये भेसळही होत असल्यामुळे ग्राहक अन्य भाताकडे वळू लागला आहे. भाताचे गुणवत्तापूर्ण उत्पादन झाल्यास चांगला दर मिळेल. आजऱ्याच्या तांदळाला चांगला स्वाद, चव आहे; पण त्याच्या संवर्धनाची सध्या गरज निर्माण झाली आहे. तालुक्यात गेल्या १० वर्षांपासून भाताच्या संवर्धनासाठी आजरा तालुका शेतकरी विकास मंडळ, कृषी विभाग व जि. प.च्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत. आजऱ्याच्या घनसाळला जी. आय. मानांकन मिळाले. घनसाळबरोबर आजऱ्याचा काळाजिरगा, चंपाकाळी, कोतमीर साळ हे तांदूळही चांगल्या पद्धतीचे उत्पादित होते. चिरमुरे व पोहेसाठी लागणारा हावळा भात तालुक्यातील उत्तूर परिसरात उत्पादित होतो. चिरमुऱ्याची चव तर जगात भारी अशीच आहे. मुंबई, बंगलोरपाठोपाठ आजऱ्याचा चिरमुरा आता परदेशातही जात आहे. घनसाळबरोबर अन्य जातीच्या भातांचे संवर्धन करण्याची गरज आहे. घनसाळला चांगला दर मिळाला म्हणून त्यामध्ये भेसळ करून विकणाऱ्यांवर कारवाईची गरज आहे. सध्या सेंद्रीय पद्धतीने भात उत्पादनाकडे शेतकऱ्यांचा कल वाढला असला तरी त्यालाही प्रोत्साहन दिल्याशिवाय उत्पादनात वाढ होणार नाही. सध्या घनसाळची उत्पादकता वाढवून तो परदेशात पाठविला जाणार आहे. त्याबरोबर अन्य भाताच्या जातींचे संवर्धन झाल्यास चांगला दर मिळेल.

देशी वाणाच्या संवर्धनासाठी अनुदानाची गरज

सध्या वाढलेले खतांचे दर, मजुरीचे दर, जनावरांऐवजी यांत्रिकीकरणाचा होणारा वापर यामुळे शेती करणे परवडणारे नाही. त्यामुळे अनेक तरुण शेतीऐवजी रोजगारासाठी शहराकडे आकर्षित होतात. भाताचे देशी वाण टिकवायचे असेल, त्याचे संवर्धन करायचे असेल तर उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना अनुदान देण्याची गरज आहे.

आजऱ्याच्या चिरमुऱ्याला सर्वत्र मागणी

तालुक्यातील उत्तूर परिसरात पिकला जाणारा हावळ भात चिरमुऱ्यासाठी उपयुक्त आहे; पण सुगीच्यावेळी अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची धांदल उडते. उत्पन्नापेक्षा खर्च जादा होतो; पण चिरमुऱ्याला असणारी चव व स्वाद चांगला असल्याने गोव्याला जाणारे पर्यटक आजऱ्यात थांबून या चिरमुऱ्याचा आस्वाद घेतात.