शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारताकडे केवळ २ पर्याय आहेत..."; शाहांच्या विधानानंतर पाकिस्तानचा थयथयाट, थेट युद्धाची धमकी
2
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
3
Shiv Sena UBT: मराठवाड्यात उद्धव ठाकरेंना मोठा झटका, मोठ्या नेत्याने सोडली साथ!
4
महागाईचा काळ... बँक FD चे कमी व्याजदर! 'या' ५ सरकारी योजना तुमचं नशीब बदलतील, वाचा संपूर्ण माहिती
5
रॅलीमध्ये कारखाली चिरडून एकाचा मृत्यू; जगन मोहन रेड्डींविरोधात गुन्हा दाखल
6
परीक्षेत कमी गुण मिळाले, जाब विचारताच उलट बोलली, वडिलांकडून मुलीला बेदम मारहाण, तडफडून मृत्यू, सांगलीतील धक्कादायक घटना 
7
Video: चालत्या ट्रेनमध्ये मारहाण अन् चोरीचा प्रयत्न; अभिनेत्रीसोबत घडली धक्कादायक घटना
8
इराण जे सांगतोय ते भारत आणि चीन होऊच देणार नाहीत, दोघंही मोठे व्यापारी; अमेरिकेचं गणित समजून घ्या?
9
इराणवर हल्ला करण्यासाठी अमेरिकेने भारतीय हवाई क्षेत्राचा वापर केला? सरकारने स्पष्टीकरण दिले
10
Post Office ची सुपरहिट स्कीम; महिन्याला ₹३००० ची गुंतवणूक, ₹२.१४ लाखांचा रिटर्न निश्चित
11
"ते बोलण्यात व्यस्त, आम्ही कामात मग्न" उद्धव ठाकरेंना टोमणा, शहरात लावले पोस्टर!
12
Stock Market Today: इराण-इस्रायल युद्धाची भीती; ५३४ अंकांनी घसरुन शेअर बाजाराची सुरुवाती, IT-रियल्टीमध्ये मोठी विक्री
13
फिल्म सिटीमध्ये भीषण आग, 'अनुपमा' मालिकेचा सेट जळून खाक
14
केंद्र सरकार सीमा व्यवस्थापन प्राधिकरण स्थापन करणार; महाराष्ट्रातील खासदाराने केली होती मागणी
15
इस्त्रायल-इराण युद्धाचा भारताला फटका बसणार! फक्त १६ दिवस पुरेल एवढाच LPG गॅसचा साठा
16
Maharashtra Rain: लहरी पावसाने शेतकऱ्यांना रखडविले, केवळ २२ लाख हेक्टरवर पेरण्या पूर्ण  
17
ई-बाइक टॅक्सी सेवा नको! राज्य परिवहन विभागास नागरिकांच्या सूचना
18
Todays Horoscope: 'या' राशींच्या लोकांचं नशीब फळफळणार! कसा असेल तुमचा आजचा दिवस? जाणून घ्या
19
...तर नाराजी घ्यायची ताकद ठेवावी लागते; शरद पवारांनी मांडली स्पष्ट भूमिका
20
धारावीत उभारणार मल्टी ट्रान्सपोर्ट हब; एमएमआरडीए लवकरच तयार करणार आराखडा

आजऱ्यातील भाताच्या देशी वाणांचे संवर्धन गरजेचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:26 IST

सदाशिव मोरे। आजरा : आजरा तालुक्यातून लोप पावत चाललेल्या घनसाळ, काळाजिरगा, चंपाकाळी, कोतमीर साळ, हावळा या भाताच्या देशी वाणांच्या ...

सदाशिव मोरे।

आजरा : आजरा तालुक्यातून लोप पावत चाललेल्या घनसाळ, काळाजिरगा, चंपाकाळी, कोतमीर साळ, हावळा या भाताच्या देशी वाणांच्या संवर्धनाची गरज आहे. उत्पादित होणाऱ्या देशी भातांमध्ये भेसळही होत असल्यामुळे ग्राहक अन्य भाताकडे वळू लागला आहे. भाताचे गुणवत्तापूर्ण उत्पादन झाल्यास चांगला दर मिळेल. आजऱ्याच्या तांदळाला चांगला स्वाद, चव आहे; पण त्याच्या संवर्धनाची सध्या गरज निर्माण झाली आहे. तालुक्यात गेल्या १० वर्षांपासून भाताच्या संवर्धनासाठी आजरा तालुका शेतकरी विकास मंडळ, कृषी विभाग व जि. प.च्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत. आजऱ्याच्या घनसाळला जी. आय. मानांकन मिळाले. घनसाळबरोबर आजऱ्याचा काळाजिरगा, चंपाकाळी, कोतमीर साळ हे तांदूळही चांगल्या पद्धतीचे उत्पादित होते. चिरमुरे व पोहेसाठी लागणारा हावळा भात तालुक्यातील उत्तूर परिसरात उत्पादित होतो. चिरमुऱ्याची चव तर जगात भारी अशीच आहे. मुंबई, बंगलोरपाठोपाठ आजऱ्याचा चिरमुरा आता परदेशातही जात आहे. घनसाळबरोबर अन्य जातीच्या भातांचे संवर्धन करण्याची गरज आहे. घनसाळला चांगला दर मिळाला म्हणून त्यामध्ये भेसळ करून विकणाऱ्यांवर कारवाईची गरज आहे. सध्या सेंद्रीय पद्धतीने भात उत्पादनाकडे शेतकऱ्यांचा कल वाढला असला तरी त्यालाही प्रोत्साहन दिल्याशिवाय उत्पादनात वाढ होणार नाही. सध्या घनसाळची उत्पादकता वाढवून तो परदेशात पाठविला जाणार आहे. त्याबरोबर अन्य भाताच्या जातींचे संवर्धन झाल्यास चांगला दर मिळेल.

देशी वाणाच्या संवर्धनासाठी अनुदानाची गरज

सध्या वाढलेले खतांचे दर, मजुरीचे दर, जनावरांऐवजी यांत्रिकीकरणाचा होणारा वापर यामुळे शेती करणे परवडणारे नाही. त्यामुळे अनेक तरुण शेतीऐवजी रोजगारासाठी शहराकडे आकर्षित होतात. भाताचे देशी वाण टिकवायचे असेल, त्याचे संवर्धन करायचे असेल तर उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना अनुदान देण्याची गरज आहे.

आजऱ्याच्या चिरमुऱ्याला सर्वत्र मागणी

तालुक्यातील उत्तूर परिसरात पिकला जाणारा हावळ भात चिरमुऱ्यासाठी उपयुक्त आहे; पण सुगीच्यावेळी अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची धांदल उडते. उत्पन्नापेक्षा खर्च जादा होतो; पण चिरमुऱ्याला असणारी चव व स्वाद चांगला असल्याने गोव्याला जाणारे पर्यटक आजऱ्यात थांबून या चिरमुऱ्याचा आस्वाद घेतात.