शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

नियमानुसार गाठींचे वजन, उंची व लोड भरण्यावर एकमत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:39 IST

इचलकरंजी : ट्रान्स्पोर्ट असोसिएशन, ट्रक मोटारमालक संघटना व व्यापारी यांनी समन्वयातून मार्ग काढावा. नियमानुसार गाठीचे वजन ५० किलो असावे. ...

इचलकरंजी : ट्रान्स्पोर्ट असोसिएशन, ट्रक मोटारमालक संघटना व व्यापारी यांनी समन्वयातून मार्ग काढावा. नियमानुसार गाठीचे वजन ५० किलो असावे. लहान रस्त्यावर वाहतुकीला अडथळा होईल, अशी वाहने लावू नयेत. यामध्ये कोणत्याहीप्रकारचा वाद होणार नाही, याची काळजी घेऊन निर्णय घ्यावा, असे सोमवारी प्रांत कार्यालयात झालेल्या बैठकीत ठरविण्यात आले.

आमदार प्रकाश आवाडे व प्रांताधिकारी डॉ. विकास खरात यांच्यासोबत झालेल्या बैठकीत नियमबाह्य कापड व सुताच्या गाठी अधिक उंचीने वाहनात भरल्या जात आहेत. त्यामुळे धोकादायक वाहतूक तसेच उंचीमुळे विद्युत तारा तुटणे, असे प्रकार घडत आहेत. यासंदर्भात मार्ग काढण्यासाठी चर्चा करण्यात आली. यावेळी लहान रस्त्यावर दिवसभर माल भरणे-उतरण्यासाठी मोठे ट्रक लावले जातात. परिणामी वाहतुकीची कोंडी होते. अन्य व्यावसायिकांना त्रास होतो. मुख्य मार्गावर तसेच गर्दीच्या ठिकाणी येणाऱ्या मोठ्या वाहनांमुळे अपघाताचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे शहराबाहेर लहान वाहनात माल भरून तो शहरामध्ये पुरवावा. तसेच तयार झालेला मालही लहान वाहनातून शहराच्या बाहेर नेऊन ट्रकमध्ये भरावा. नियमबाह्य माल भरू नये, अशी विविध मते उपस्थितांनी मांडली. अखेर आरटीओ नियमानुसारच गाठीचे वजन, नियमानुसार उंची व माल भरावा, यावर संमती दर्शविण्यात आली. बैठकीस प्रभारी मुख्याधिकारी शरद पाटील, वाहतूक नियंत्रण शाखेचे नंदकुमार मोरे, माथाडी निरीक्षक शामराव पुरीबुवा, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रसाद गागरे, टेम्पो मालक असोसिएशन, ट्रान्स्पोर्ट असोसिएशन, व्यापारी असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते.