शहरं
Join us  
Trending Stories
1
बारावीचा आज निकाल; या संकेतस्थळांवर पाहता येणार..., कुठे आणि कसा पहावा...
2
कानपूरमध्ये ६ मजली इमारतीला भीषण आग; एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
3
जातीनिहाय जनगणनेची फार वर्षे वाट पाहिली, अखेर निर्णय झाला!
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: या व्यक्तींची लग्न जुळू शकतात; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
5
तंदूरी रोटी बनली मृत्यूचं कारण! लग्न समारंभात भिडले २ युवक; हाणामारीत दोघांचा जीव गेला
6
संपादकीय: ...शिक्षा शेतकरी भावाला! घोटाळा सरकारनेच मान्य केला हे बरे झाले...
7
छोटा दत्तू आला! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेता झाला बाबा, लग्नानंतर २ वर्षांनी दिली गुडन्यूज
8
भारताने रोखले चिनाबचे पाणी, लवकरच झेलमचेही थांबवणार
9
राज्यातील २,९९७ प्रकल्पांत ३३ टक्के पाणी शिल्लक; पातळी आणखी खालावणार
10
कर्नाळा येथे खाजगी प्रवासी बस उलटली; दोन प्रवाशांचा मृत्यू 
11
‘भारताबरोबर युद्ध झाले तर मी इंग्लंडला पळून जाईन’; पाकिस्तानी खासदार शेर मारवत यांचे अजब विधान 
12
‘जर्मन हँगर’ मंडपात राज्य मंत्रिमंडळाची बैठक
13
निवडणूक आयोगाचे ४० मोबाइल ॲप्स एकाच प्लॅटफॉर्मवर; नाव शोधणे, तक्रार करणे सोयीचे
14
बँक, विमा, म्युच्युअल फंड असाे की शेअर बाजार; एकाच ठिकाणी होणार ‘केवायसी’ 
15
२७,८३७ विद्यार्थी आज देणार एमएचटी सीईटीची फेरपरीक्षा 
16
पाऊस पडायला अजून दीड महिना, अन् मे महिन्याच्या प्रारंभीच मुंबईचा पाणीसाठा २३ टक्क्यांवर
17
नीट यूजी परीक्षेत ‘फिजिक्स’चा पेपर अवघड; यंदा कट ऑफ घसरणार
18
जे. जे. सुपर स्पेशालिटी रुग्णालयाबाबत आणखी ‘तारीख पे तारीख’ नको ! 
19
एक्स्प्रेस वे, सर्व्हिस रोडच्या खड्ड्यांसाठी ७८ कोटी ! डागडुजीसाठीचा एकूण खर्च १५७ कोटींच्या घरात
20
एटीएम कार्ड वापरणे झाले महाग, कारण...

नियमानुसार गाठींचे वजन, उंची व लोड भरण्यावर एकमत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:39 IST

इचलकरंजी : ट्रान्स्पोर्ट असोसिएशन, ट्रक मोटारमालक संघटना व व्यापारी यांनी समन्वयातून मार्ग काढावा. नियमानुसार गाठीचे वजन ५० किलो असावे. ...

इचलकरंजी : ट्रान्स्पोर्ट असोसिएशन, ट्रक मोटारमालक संघटना व व्यापारी यांनी समन्वयातून मार्ग काढावा. नियमानुसार गाठीचे वजन ५० किलो असावे. लहान रस्त्यावर वाहतुकीला अडथळा होईल, अशी वाहने लावू नयेत. यामध्ये कोणत्याहीप्रकारचा वाद होणार नाही, याची काळजी घेऊन निर्णय घ्यावा, असे सोमवारी प्रांत कार्यालयात झालेल्या बैठकीत ठरविण्यात आले.

आमदार प्रकाश आवाडे व प्रांताधिकारी डॉ. विकास खरात यांच्यासोबत झालेल्या बैठकीत नियमबाह्य कापड व सुताच्या गाठी अधिक उंचीने वाहनात भरल्या जात आहेत. त्यामुळे धोकादायक वाहतूक तसेच उंचीमुळे विद्युत तारा तुटणे, असे प्रकार घडत आहेत. यासंदर्भात मार्ग काढण्यासाठी चर्चा करण्यात आली. यावेळी लहान रस्त्यावर दिवसभर माल भरणे-उतरण्यासाठी मोठे ट्रक लावले जातात. परिणामी वाहतुकीची कोंडी होते. अन्य व्यावसायिकांना त्रास होतो. मुख्य मार्गावर तसेच गर्दीच्या ठिकाणी येणाऱ्या मोठ्या वाहनांमुळे अपघाताचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे शहराबाहेर लहान वाहनात माल भरून तो शहरामध्ये पुरवावा. तसेच तयार झालेला मालही लहान वाहनातून शहराच्या बाहेर नेऊन ट्रकमध्ये भरावा. नियमबाह्य माल भरू नये, अशी विविध मते उपस्थितांनी मांडली. अखेर आरटीओ नियमानुसारच गाठीचे वजन, नियमानुसार उंची व माल भरावा, यावर संमती दर्शविण्यात आली. बैठकीस प्रभारी मुख्याधिकारी शरद पाटील, वाहतूक नियंत्रण शाखेचे नंदकुमार मोरे, माथाडी निरीक्षक शामराव पुरीबुवा, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रसाद गागरे, टेम्पो मालक असोसिएशन, ट्रान्स्पोर्ट असोसिएशन, व्यापारी असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते.