शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
8
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
9
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
10
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
11
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
12
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
13
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
14
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
15
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
16
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
17
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
18
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
19
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
20
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!

आजरा कारखान्यासाठी आतापासूनच जोडण्या

By admin | Updated: January 22, 2016 00:52 IST

तीन पॅनेलची शक्यता : अशोकअण्णांची फिल्डिंग; विरोधक निवांतच

ज्योतीप्रसाद सावंत -- आजरा साखर कारखान्याची निवडणूक मे २0१७ च्या दरम्यान होत असली, तरी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा बँकेचे संचालक व आजरा साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष अशोक चराटी यांनी सुरुवातीपासूनच सावध पण नेटकी फिल्ंिडग लावण्यास सुरुवात केली आहे. निवडणुकीला सामोरे जायचे त्याकरिता आतापासूनच कामाला लागा, असा संदेशही त्यांनी कार्यकर्त्यांना दिला आहे. एकीकडे अशोकअण्णांनी नेटकी फिल्डिंग लावल्यानंतरही विरोधक मात्र निवांतच दिसत आहेत.निवडणुकीत ज्या घडामोडी होतील त्या होतील, परंतु सद्य:स्थितीला अशोकअण्णा हे सत्तेचे प्रबळ दावेदार दिसत आहेत. कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जा निर्माण करण्यात प्रत्येक निवडणुकीत अशोकअण्णा उजवे ठरले आहेत. अंतर्गत दगाबाजीने तालुका संघाच्या निवडणुकीत सत्तेपासून दूर जावे लागले असले, तरी झालेल्या चुकांची पुनरावृत्ती होणार नाही याची कारखाना निवडणुकीत व्यवस्थित काळजी घेतली जात आहे.स्वबळावर लढण्याची तयारी ठेवणारे चराटी जे सोबत येतील त्यांना घेऊन पुढचे पाऊल टाकतील, हे स्पष्ट आहे. दुसरीकडे विरोधक मात्र अंतर्गत खेळ्या करून आपल्याच पदरात जास्तीत जास्त कशा जागा पडतील याकरिता प्रयत्नशील दिसत आहेत. मुळात कारखाना निवडणुकीत तीन पॅनेल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे इच्छुकांपुढे तीन पर्याय राहणार आहेत. एकाने डावलल्यास दुसरा मार्ग खुला राहणार आहे; परंतु त्यातल्या त्यात प्रबळ पर्याय म्हणजे अशोकअण्णांची आघाडी व त्यांच्या विरोधातील मुख्य आघाडी असाच आहे. सुरुवातीलाच ‘गोकुळ’चे रवींद्र आपटे यांच्यासह काही संचालक व संघटनांनी त्यांच्या पाठीशी राहणार असल्याचे जाहीर केले आहे.विरोधी मंडळी एकत्र येणारआमदार प्रकाश आबिटकर, रवींद्र आपटे गट, स्वाभिमानी शेतकरी संघटना यांच्यासह प्रमुख मंडळींची रसद अशोकअण्णांना राहणार आहे. अशोकअण्णांची सुरू असलेली तयारी, अशोकअण्णांच्या विरोधातील मंडळींच्या एकत्र येण्यात असणाऱ्या राजकीय अडचणी, यांवर लक्ष ठेवून असणारे काही प्रमुख नेते प्रसंग पडल्यास तिसऱ्या आघाडीच्या माध्यमातून निवडणुकीला सामोरे जाता येईल का, याची चाचपणी करू लागले आहेत. एकंदर कारखाना निवडणूक घडामोडींमध्ये कार्यकर्त्यांची मोट बांधण्यात अशोकअण्णा आघाडीवर दिसत आहेत.