शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
8
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
9
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
10
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
11
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
12
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
13
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
14
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
15
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
16
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
17
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
18
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
19
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
20
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!

आपुलकीने एकमेकांना जोडा

By admin | Updated: March 2, 2016 00:59 IST

भैयूजी महाराज : प्रवचन व दर्शन सोहळा, साधकांची गर्दी

कोल्हापूर : प्रेम नसल्याने ईर्षा निर्माण होते. ईर्ष्येतून द्वेष, द्वेषामधून तिस्कार, तिरस्कारातून अपमान आणि अपमानातून अपेक्षा वाढून अखेरीस दु:ख वाटणीला येते. मग यातून कुटुंब, समाज आणि राष्ट्र उद्ध्वस्त होते. ते टाळण्यासाठी एकमेकांना जोडण्याचे काम करणे महत्त्वाचे आहे. ते प्रेम आणि आपुलकीच्या माध्यमातून करा, असे आवाहन राष्ट्रसंत भैयूजी महाराज यांनी मंगळवारी येथे केले.येथील सूर्योदय परिवारातर्फे धैर्यप्रसाद मंगल कार्यालयात आयोजित केलेल्या प्रवचन व दर्शन सोहळ्यात ते बोलत होते. राष्ट्रसंत भैयूजी महाराज म्हणाले, जीवनात प्रत्येकाची एकसारखी परिस्थिती राहत नाही. चढ-उतार, यश-अपयश, अपमान-सन्मान, पाप-पुण्य हे सुख-दु:खाचे प्रकार आहेत. काळ, वेळेप्रमाणे प्रत्येक परिस्थिती बदलते. जीवनात चांगली-वाईट परिस्थिती येते-जाते. कशीही परिस्थिती आपल्यासमोर आली तरी संयमाने वर्तन केले पाहिजे. संयम सोडला तर तुम्ही संपला. संयम असणारे लोक जीवनात यशस्वी होतात. जीवनाचा आनंद लुटतात. प्रेम नाही तेथे कलह आहे. कुटुंबात प्रेम वाढवा. कुटुंब एकत्र राहिल्यास समाज तयार होईल. समाजातून एकसंघ राष्ट्र घडते. कुटुंब, समाज आणि राष्ट्र वाचविण्यासाठी प्रेम महत्त्वाचे आहे. आपण भौतिक सुख मिळविले असून, माधुर्याचे सुख मिळविलेले नाही. सुख, संपत्तीबाबतच्या भीतीपाठोपाठ आता अज्ञात भय निर्माण झाले आहे. या भयाचे कारण समजत नसल्याने माणूस तणावाखाली राहतो. तणावापासून दूर जायचे असल्यास, सुखात जगायचे असल्यास प्रेम महत्त्वाचे आहे. यावेळी संजीवनीदेवी गायकवाड, धैर्यशील नलवडे, माणिक पाटील-चुयेकर, प्रसाद कांबळे, संजय बटकडली, संग्रामसिंह नलवडे, पी. डी. पवार, गौरी इंगळे आदी उपस्थित होते. बापूसाहेब भोसले यांनी प्रास्ताविक केले. अनंत पाटील यांनी आभार मानले. प्रवचनानंतर भैयूजी महाराज यांच्या दर्शनासाठी कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर जिल्ह्णांतील साधकांनी गर्दी केली होती. (प्रतिनिधी)