शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! कोट्यवधींचे महाघोटाळे, बोगस भरतीही; शनि शिंगणापूर मंदिर ट्रस्ट बरखास्त
2
शिंदेसेना वादात, विरोधकांना संधी; आमदारांच्या व्हायरल व्हिडिओमुळे एकनाथ शिंदेंची पंचाईत
3
होमिओपॅथीची नोंद एमएमसीमध्ये करायची की नाही?; तज्ज्ञ समिती करणार अभ्यास
4
बीकेसी ते शिळफाट्यादरम्यान बुलेट ट्रेनसाठीचा बोगदा पूर्ण; प्रकल्पाला मिळणार गती
5
अखेर ६ दिवसांनी बोया सापडला पण सर्च ऑपरेशनमध्ये आढळल्या ९२४ बेकायदा मच्छीमार बोटी
6
कुजबुज! उपमुख्यमंत्र्यांच्या कपाटात दडलं काय?; आमदारांचे PA, कार्यकर्त्यांचे लक्ष वेधले
7
कॅनडावरील टॅरिफ वाढवून केला ३५%; अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा
8
मतदार याद्यातील घोळ, घुसखोरी आणि गोंधळ; घोळ निस्तरणे निवडणूक आयोगाला शक्य होत नाही
9
...तर गो बॅक टू द थर्ड वर्ल्ड; न्यू यॉर्कमध्ये हाताने बिर्याणी खाल्ली, काय बिघडले?
10
फास्टॅग नीट न लावल्यास चालक ब्लॅकलिस्टमध्ये; तुम्हीही वाहन चालवताना करता का 'ही' चूक?
11
सेंट जॉर्जेसला लिव्हर ट्रान्सप्लांटचा परवाना; रुग्णालयातील डॉक्टरांना शस्त्रक्रियेचे प्रशिक्षण
12
Video : शिवाजीनगर येथे पीएमटी बसला आग;नागरिकांच्या तत्परतेने टळली जीवितहानी
13
Wimbledon 2025: अल्काराझनं सलग तिसऱ्यांदा गाठली फायनल! नदालनंतर अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा
14
दोन भिन्न वंशावळी न्यायालयात का सादर केल्या गेल्या? सात्यकी सावरकर यांनी याचा खुलासा करावा
15
नवऱ्याने रागाच्या भरात बायकोच्या नाकाचा घेतला चावा, झाले दोन तुकडे... नेमकं घडलं तरी काय?
16
"जनसुरक्षा विधेयका'चं नाव 'भाजप सुरक्षा विधेयक' करायला हवं"; मिसा, टाडाचा उल्लेख करत उद्धव ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल
17
"नोटांनी भरलेली बॅग मी आल्याबरोबर कपाटात..."; खळबळ उडवणाऱ्या व्हिडीओवर संजय शिरसाटांनी सोडलं मौन
18
Video: तुफान राडा ! आधी 'कॅप्टन' गिल पंचांशी भांडला, मग सिराजचाही पारा चढला, काय घडलं?
19
“नव्या कायद्याची गरज का? जनतेच्या मनातील संभ्रम...”; जनसुरक्षा विधेयकाला काँग्रेसचा विरोध
20
“आम्ही राज्यपालांना जनसुरक्षा विधेयक मंजूर करू नये ही विनंती करणार”; ठाकरे गटाचा निर्धार

आपुलकीने एकमेकांना जोडा

By admin | Updated: March 2, 2016 00:59 IST

भैयूजी महाराज : प्रवचन व दर्शन सोहळा, साधकांची गर्दी

कोल्हापूर : प्रेम नसल्याने ईर्षा निर्माण होते. ईर्ष्येतून द्वेष, द्वेषामधून तिस्कार, तिरस्कारातून अपमान आणि अपमानातून अपेक्षा वाढून अखेरीस दु:ख वाटणीला येते. मग यातून कुटुंब, समाज आणि राष्ट्र उद्ध्वस्त होते. ते टाळण्यासाठी एकमेकांना जोडण्याचे काम करणे महत्त्वाचे आहे. ते प्रेम आणि आपुलकीच्या माध्यमातून करा, असे आवाहन राष्ट्रसंत भैयूजी महाराज यांनी मंगळवारी येथे केले.येथील सूर्योदय परिवारातर्फे धैर्यप्रसाद मंगल कार्यालयात आयोजित केलेल्या प्रवचन व दर्शन सोहळ्यात ते बोलत होते. राष्ट्रसंत भैयूजी महाराज म्हणाले, जीवनात प्रत्येकाची एकसारखी परिस्थिती राहत नाही. चढ-उतार, यश-अपयश, अपमान-सन्मान, पाप-पुण्य हे सुख-दु:खाचे प्रकार आहेत. काळ, वेळेप्रमाणे प्रत्येक परिस्थिती बदलते. जीवनात चांगली-वाईट परिस्थिती येते-जाते. कशीही परिस्थिती आपल्यासमोर आली तरी संयमाने वर्तन केले पाहिजे. संयम सोडला तर तुम्ही संपला. संयम असणारे लोक जीवनात यशस्वी होतात. जीवनाचा आनंद लुटतात. प्रेम नाही तेथे कलह आहे. कुटुंबात प्रेम वाढवा. कुटुंब एकत्र राहिल्यास समाज तयार होईल. समाजातून एकसंघ राष्ट्र घडते. कुटुंब, समाज आणि राष्ट्र वाचविण्यासाठी प्रेम महत्त्वाचे आहे. आपण भौतिक सुख मिळविले असून, माधुर्याचे सुख मिळविलेले नाही. सुख, संपत्तीबाबतच्या भीतीपाठोपाठ आता अज्ञात भय निर्माण झाले आहे. या भयाचे कारण समजत नसल्याने माणूस तणावाखाली राहतो. तणावापासून दूर जायचे असल्यास, सुखात जगायचे असल्यास प्रेम महत्त्वाचे आहे. यावेळी संजीवनीदेवी गायकवाड, धैर्यशील नलवडे, माणिक पाटील-चुयेकर, प्रसाद कांबळे, संजय बटकडली, संग्रामसिंह नलवडे, पी. डी. पवार, गौरी इंगळे आदी उपस्थित होते. बापूसाहेब भोसले यांनी प्रास्ताविक केले. अनंत पाटील यांनी आभार मानले. प्रवचनानंतर भैयूजी महाराज यांच्या दर्शनासाठी कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर जिल्ह्णांतील साधकांनी गर्दी केली होती. (प्रतिनिधी)