शहरं
Join us  
Trending Stories
1
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
2
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
3
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
4
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
5
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
6
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
7
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
8
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार
9
रोहित शर्माने खरेदी केली Lamborghini, नंबरने वेधले चाहत्यांचे लक्ष; काय आहे ३०१५ चा अर्थ?
10
ट्रम्प टॅरिफचा पहिला फटका, अनेक कारखान्यांत काम बंद, भारतातील व्यापार गेला पाकिस्तानात
11
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
12
Video : भर पावसात बाबांचा स्वयंपाक, चिमुकल्यांनी डोक्यावर धरलं 'असं' छत, पाहून डोळ्यांत येईल पाणी! 
13
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
14
कियारा अडवाणीच्या बिकिनी सीन्सवर कात्री? 'वॉर २'ला प्रमाणपत्र देताना सेन्सॉर बोर्डाचे निर्देश
15
RCBच्या यश दयालवर बंदीची कारवाई; अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी 'या' स्पर्धेतून बाद
16
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
17
सर्वाधिक धावा कुटल्या, मग कर्णधाराला माघारी धाडलं, २२ वर्षांच्या ऑलराउंडरने जिंकवला सामना
18
सोशल मीडियावर मैत्री केली; चार तरुणींच्या जाळ्यात अडकलेल्या आजोबांनी आयुष्यभराची कमाई गमावली!
19
५ लाख देण्याचे आश्वासन अन् हातात पडले अवघ्या ५ हजाराचे धनादेश; उत्तरकाशीतील नागरिकांचा संताप
20
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...

पंचगंगा, भोगावती नदीत उपसाबंदी

By admin | Updated: January 4, 2016 00:40 IST

पाटबंधारे विभागाचा आदेश : ८ तारखेपासून अंमलबजावणी; संभाव्य पाणीटंचाईचे संकट लक्षात घेऊन निर्णय

प्रकाश पाटील-कोपार्डे --कोल्हापूर पाटबंधारे विभागाच्यावतीने जानेवारी, फेब्रुवारी व मार्च या तीन महिन्यांसाठी पंचगंगा व भोगावती नदीतून शेतीसाठी सलग आठ दिवस पूर्ण उपसाबंदीचे वेळापत्रक जाहीर आहे. धरणातील सध्याचा पाणीसाठा व संभाव्य पाणीटंचाईचे संकट लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. शेतकऱ्यांतून मात्र पूर्ण उपसाबंदी करण्यापेक्षा हा कालावधी कमी करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशा प्रतिक्रिया उमटत आहेत. यावर्षी पावसाने ओढ दिल्याने धरणातील पाणीसाठ्यात कमालाची घट झाली आहे. जिल्ह्यात उसाचे व रब्बीचे मोठे क्षेत्र असल्याने आॅक्टोबर महिन्यापासूनच नदीकाठावरील शेतकऱ्यांनी शेतीसाठी पाणी उपसाला सुरुवात केली. यामुळे जानेवारीनंतर मुख्य धरणातून नद्यांमध्ये पाणी सोडण्याऐवजी यावर्षी नोव्हेंबरपासूनच पाणी सोडण्याची वेळ पाटबंधारे विभागाला आली आहे. सध्या राधानगरी, दुधगंगा (काळम्मावाडी), वारणा (चांदोली) या तीन मुख्य प्रकल्पांबरोबर आठ मध्यम प्रकल्प, ५९ लघु प्रकल्पांमध्ये गेल्या २५ वर्षांमध्ये या महिन्यात सर्वांत कमी पाणीसाठा आहे. यामुळे भविष्यात पाणीटंचाईला तोंड द्यावे लागणार असल्याने पाण्याचे योग्य नियोजन करण्यासाठी कोल्हापूर पाटबंधारे विभागाचे उपकार्यकारी अभियंता (उत्तर) विजय पाटील यांनी ३० डिसेंबर २०१५ ला पंचगंगा व भोगावती नदीकाठच्या शेतीसाठी पाणी उपसाबंदीचे वेळापत्रक ग्रामपंचायत, पाणीसंस्था, विकास सेवा संस्था यांना माहितीसाठी पाठविले आहे. वास्तविक या आदेशाने सहकारी पाणीपुरवठा संस्था अडचणीत येणार आहेत. २४ तासांतील आठ तासच वीज मिळत असून, २० दिवसांनी शेतकऱ्यांना पाणी मिळते. जर आठ दिवस उपसाबंदी केली, तर शेतकऱ्यांना महिन्यानेही पाण्याचा फेर येणार नाही. पर्यायाने उत्पादनात घट होणार आहे. अगोदरच ऊसदर आणि शेतीमालाला मिळणारा कमी दर यामुळे शेतकरी पिचला आहे. त्यात हे संकट योग्य नाही.- सुभाष पाटील, अध्यक्ष, केदारलिंग पाणीपुरवठा संस्था, वाकरेशासनाने काढलेला आदेश म्हणजे शेतकऱ्यांना अडचणीत आणण्याचा हा प्रकार आहे. मुळात आताही आठ तासच वीज दिली जाते. त्यातही एक-दोन तास कपात असते. सोमवारी शेतीपंपांना वीज देतानाही हात आखडला जातो. या पूर्ण उपसाबंदीऐवजी चार तास कमी करून कालावधी द्यावा, अन्यथा पाण्यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन सुरू करणार.- राजेंद्र सूर्यवंशी, सदस्य, पंचायत समिती, करवीरउपसाबंदी वेळापत्रकभाग १ - भोगावती नदी (राधानगरी धरण ते कोगे खडक उर्ध्व बाजू)पाळक उपसाबंदी दिवस उपसा कालवधी दिवसक्रमांक कालावधी १०८-०१-२०१६८१६-०१-२०१६ ते ९ते १५-०१-२०१६ २४-०१-२०१६२२५-०१-२०१६ ते८२-२-२०१६ ते१-०२-२०१६१०-२-२०१६ ९३११-०२-२०१६ ते १९-०२-२०१६ ते ९१८-०२-२०१६ ८२७-०२-२०१६ भाग २ - पंचगंगा नदी (खडक कोगे अधो बाजू ते शिरोळ बंधारा)१११-०१-२०१६८१९-०१-२०१६ ते ९ते १८-०१-२०१६ २७-०१-२०१६२२८-०१-२०१६ ते८०५-०२-२०१६ ते९०४-०२-२०१६१३-०२-२०१६ ३१४-०२-२०१६ ते ८२२-०२-२०१६ ते९२१-०२-२०१६ ०२-०३-२०१६ नियम डावलून उपसा केल्यास कडक कारवाईउपसा कालावधीत अनधिकृतरीत्या उपसा आढळून आल्यास संबंधित उपसायंत्र जप्त करून परवानाधारकाचा उपसा परवाना एक वर्षाच्या कालावधीसाठी रद्द करण्यात येईल. यासाठी पाटबंधारे अधिनियमन १९७६ कलम ५१८३ व ९७ मधील तरतुदीतील अधिकारानुसार हा आदेश काढण्यात आला आहे. गेल्या २५ वर्षांत जिल्ह्यात प्रथमच पाटबंधारे विभागाने संपूर्ण उपसाबंदीचा आदेश काढल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, पुढील वर्षी पावसाळ्याला उशिरा सुरुवात झाली तर पिण्याच्या पाण्याचीही टंचाई निर्माण होणार आहे. हे टाळण्यासाठी ही उपसाबंदी करण्याचे धोरण असल्याचे संबंधित सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.