शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
2
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
3
Operation Sindoor : "ऑपरेशन सिंदूरमध्ये IC-814 प्लेन हायजॅक आणि पुलवामा हल्ल्यातील मास्टरमाइंडचा खात्मा"
4
एनआयएची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी बलबीर सिंगच्या मुसक्या आवळल्या
5
छत्रपती शिवरायांच्या कर्तृत्वाला साजेसा पुतळा; राजकोट किल्ल्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलं पूजन
6
Vikram Misri: भारत- पाकिस्तान युद्धविरामानंतर परराष्ट्र सचिव मिस्री ट्रोल, मुलीबद्दल आक्षेपार्ह कमेंट
7
'भारतीय सैन्याने 35-40 पाकिस्तानी सैनिक मारले', ऑपरेशन सिंदूरबाबत DGMO यांची मोठी माहिती
8
India Pakistan Latest Update: भारत पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे उडवणार, अमेरिकेला आठ दिवस आधीच होती माहिती
9
Eknath Shinde: ...तर जगाच्या नकाशातून पाकिस्तानचं नाव कायमचं गायब केलं जाईल, एकनाथ शिंदे पेटले
10
Operation Sindoor : "दहशतवाद्यांचा खात्मा करणं हे 'ऑपरेशन सिंदूर'चं उद्दिष्ट, १०० हून अधिक दहशतवाद्यांना केलं ठार"
11
...तर पाकिस्तानची खैर नाही, आणखी टेन्शन वाढणार; आता दरवर्षी 100 ब्रह्मोस तयार होणार! 
12
पन्हाळगडावर पावसाची जोरदार हजेरी, पहिल्याच पावसात मुख्य रस्त्यावर २ मोठ्या शिळा कोसळल्या
13
"वहां से गोली चलेगी, यहां से गोला चलेगा"; PM मोदींचा उच्चस्तरीय बैठकीत लष्कराला स्पष्ट मेसेज
14
"२६ जणांच्या मृत्यूचा बदला घेतला, आम्हाला मोदींचा अभिमान..."; आदिल हुसेनच्या भावाचं विधान
15
Operation Sindoor Live Updates: दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी भारत कोणत्याही थराला जाऊ शकतो
16
कर्जावर जगणारा पाकिस्तान लढाऊ विमानं, ड्रोन अन् बॉम्ब खरेदीसाठी एवढा पैसा आणतो कुठूण? सैन्याचे उद्योगधंदे जाणून थक्क व्हाल!
17
"गर्व वाटतो... जे मी करू शकलो नाही, ते मुलानं करून दाखवलं...!"; हुतात्मा मेजर पवन यांच्या वडिलांचे शब्द वाचून तुमचेही डोळे पाणावतील
18
'...तर पाकिस्तानला विनाशकारी उत्तर दिलं जाईल', अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांसोबत PM मोदींची चर्चा
19
लोणावळ्यात गुलाबी सुटकेसमध्ये आढळलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले, दोघांना अटक, हत्येचे कारण...
20
दहशतवाद्यांना स्थानिकांची मदत; काश्मीरमध्ये 20 ठिकाणी छापे, स्लीपर सेल मॉड्यूलचा पर्दाफाश

इचलकरंजीत सरकारच्या विरोधात काँग्रेसचा विराट मोर्चा

By admin | Updated: July 21, 2015 01:42 IST

जोरदार निषेध : भाजपला सळो की पळो करू : आवाडे

इचलकरंजी : निवडणूक काळामध्ये भाजपाने केलेल्या घोषणा वल्गनाच ठरल्या आहेत. स्वत:साठी ‘अच्छे दिन’ आणणाऱ्या मोदीप्रणित भाजपा सरकार गोरगरीब जनतेच्या मुळावर उठले आहे. गोरगरिबांचे हक्क हिरावून घेणाऱ्या या सरकारविरोधात कॉँग्रेसने आता ‘एल्गार’ पुकारला आहे. जनतेच्या हितासाठी जनआंदोलनाद्वारे संघर्ष करून भाजपाला सळो की पळो करून सोडू, असे प्रतिपादन माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी केले. शहर कॉँग्रेस समितीच्यावतीने प्रांताधिकारी कार्यालयावर काढलेल्या मोर्चावेळी आवाडे बोलत होते. मोर्चाच्यावतीने प्रांताधिकारी अश्विनी जिरंगे यांना निवेदन दिले. त्यानंतर बोलताना आवाडे म्हणाले, केसरी शिधापत्रिकांवर धान्य, खाद्यतेल व रॉकेल मिळाले पाहिजे. संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थींना गेले आठ महिने बंद करण्यात आलेले अनुदान पुन्हा सुरू करावे. झोपडपट्टीमुक्त शहर करण्यासाठी कॉँग्रेसने सुरू ठेवलेली मोहीम झोपडपट्टी निर्मूलनापर्यंत सतत सुरू राहावी. रमाई आंबेडकर योजनेतून दारिद्र्यरेषेखालील मागासवर्गीय कुटुंबीयांना त्वरित घरकुले बांधून द्यावीत. यंत्रमाग कामगारांना पाच लाखांची घरकुले मिळण्याबरोबरच त्यांच्यासाठी कल्याणकारी मंडळाची स्थापना करावी. घरेलू कामगारांच्या मुलांना शैक्षणिक शिष्यवृत्ती मिळावी, तर यंत्रमागासाठी विजेच्या दराची सवलत देण्यात यावी, अशा आमच्या मागण्या आहेत. यावेळी शहर कॉँग्रेसचे अध्यक्ष प्रकाश मोरे, शामराव कुलकर्णी, अहमद मुजावर, शशांक बावचकर, संजय केंगार, मोहन काळे, आदींची भाषणे झाली. मोर्चामध्ये जिल्हा कॉँग्रेसचे उपाध्यक्ष प्रकाश सातपुते, विलास गाताडे, उपनगराध्यक्ष रणजित जाधव, सतीश डाळ्या, सुनील पाटील, बाळासाहेब कलागते, अशोक सौंदत्तीकर, किशोरी आवाडे, अंजली बावणे, रवी रजपुते, राहुल आवाडे, शेखर शहा, आदी सहभागी झाले होते. मोर्चाच्या शेवटी आनंदा कोरे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)