शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
2
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
3
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
4
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
5
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
6
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
7
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
8
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
9
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
10
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
11
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
12
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
13
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
14
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
15
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
16
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
17
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
18
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
19
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
20
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?

काँग्रेस कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरावे

By admin | Updated: July 2, 2015 00:25 IST

कल्लाप्पाण्णा आवाडे : इचलकरंजी शहर काँग्रेस समितीचा मेळावा

इचलकरंजी : सहकार चळवळीच्या माध्यमातून अनेक दिग्गज नेत्यांनी विकासाची गंगा आणली. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवीत कार्यकर्त्यांनी वाटचाल केली पाहिजे. मात्र, सध्या बदललेल्या शासनकर्त्यांकडून स्वार्थाचे राजकारण करीत वेगळ्या पद्धतीने लोकशाही रूजवली जात आहे. म्हणूनच गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी कार्यकर्त्यांनी रस्त्यावरील लढाई करावी, असे आवाहन माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे यांनी केले.इचलकरंजी शहर कॉँग्रेस समितीच्या मेळाव्यामध्ये माजी खासदार आवाडे बोलत होते. ते म्हणाले, आबासाहेब खेबुडकर, दत्ताजीराव कदम, बाबासाहेब खंजिरे यांच्या नेतृत्वाखाली सार्वजनिक जीवनामध्ये काम करताना काही पथ्ये आम्ही पाळली आहेत. यापुढे सुद्धा ग्रामीण परिसराचा विकास साधण्यासाठी हेच ध्येय कायम ठेवले पाहिजे. माजी मंत्री प्रकाश आवाडे म्हणाले, सत्ता आणि राजकारण बदलल्यानंतर भूलथापा देऊन जनतेची फसवणूक करण्याचे कारनामे भाजप करीत आहे. विकासकामांकडे दुर्लक्ष करून केवळ राजकीय पोळी भाजून घेण्याचे काम सुरू आहे. आता कॉँग्रेस कार्यकर्त्यांनी सजगपणे चुकीच्या कामाला विरोध करावा.सुरुवातीला प्रकाश मोरे यांनी स्वागत व अहमद मुजावर यांनी प्रास्ताविक केले. शामराव कुलकर्णी, शशांक बावचकर, आदींनी आपले विचार मांडले. मेळाव्यासाठी दत्त साखर कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील, प्रकाश सातपुते, रणजित कदम, विलास गाताडे, रणजित जाधव, सुनील पाटील, बाळासाहेब कलागते, अंजली बावणे, राहुल खंजिरे, चंद्रकांत इंगवले, अमृत भोसले, आदी उपस्थित होते. यावेळी कल्लाप्पाण्णा आवाडे यांना आर्य भूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. (प्रतिनिधी)बिरंजे यांच्यावर अविश्वास ठरावमेळाव्यामध्ये बोलताना माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी नगरपालिकेचे आयजीएम हॉस्पिटल, काळम्मावाडी नळ योजना आणि रस्ता कामासाठी मंजूर झालेले बारा कोटी रुपये आदींबाबत प्रश्न उपस्थित करून सत्ताधाऱ्यांवर टीका केली. तसेच संधिसाधूपणाने राजकारणात पोळी भाजून घेणाऱ्यांना धडा शिकवावा, असे आवाहन त्यांनी केले. एक वर्षाची मुदत संपताच नगराध्यक्षा शुभांगी बिरंजे यांच्यावर अविश्वास ठराव दाखल करावा, असेही निर्देश दिले.