शहरं
Join us  
Trending Stories
1
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
2
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
3
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
4
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
5
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
6
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
7
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
8
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
9
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
10
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
11
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
12
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
13
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
14
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
15
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
16
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
17
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
18
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
19
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
20
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसचे ठिय्या आंदोलन

By admin | Updated: January 7, 2017 01:20 IST

केंद्र सरकारच्या धोरणांचा निषेध : नुकसानीचा शासनाला अहवाल द्यावा - सतेज पाटील

कोल्हापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने जुन्या पाचशे व एक हजारांच्या नोटा चलनातून रद्द करण्याचा निर्णय घेऊन ५० दिवस उलटले तरी अद्यापही बँकांसमोरील रांगा कायम आहेत. नवीन चलन पुरेशा प्रमाणात उपलब्ध होत नसल्याने लोकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्याच्या निषेधार्थ शुक्रवारी काँग्रेस पक्षातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुमारे अर्धा तास ठिय्या आंदोलन करण्यात आले. कार्यकर्त्यांच्या घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला.दुपारी बाराच्या सुमारास आमदार सतेज पाटील व काँग्रेसचे निरीक्षक रघुजी देसाई, सुधीर ज्ञानजोत यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकारी व कार्यकर्ते जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकवटले. घोषणाबाजी करत ठिय्या आंदोलन करण्यात आले. त्यानंतर आ. सतेज पाटील यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन दिले.सतेज पाटील म्हणाले, जुन्या नोटा बंदीनंतरच्या ५० दिवसांच्या कालावधीत जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेसह शेतकरी, व्यापारी, उद्योजकांना झळ बसली आहे. त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. तीन शिफ्टऐवजी दोन शिफ्टमध्ये या ठिकाणी काम सुरू आहे. या सर्व नुकसानीची जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व्हे करून माहिती घ्यावी तसेच कृषी विभागालाही यासंदर्भात सूचना द्याव्यात. या सर्व माहितीचा अहवाल शासनाला सादर करावा. बँक आणि एटीएम सेंटरमधून पैसे काढण्यावरील निर्बंध हटवावेत, अशी कॉँग्रेसची मागणी आहे. ज्या कारणांसाठी हा निर्णय घेतला त्यापैकी काहीच घडलेले नाही, असे या निवेदनात म्हटले आहे. आंदोलनात शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण, अ‍ॅड. सुरेश कुराडे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष शशिकांत खोत, महापालिका सभागृह नेता प्रवीण केसरकर, परिवहन सभापती लाला भोसले, नगरसेवक तौफिक मुल्लाणी, शारंगधर देशमुख, महिला शहराध्यक्ष संध्या घोटणे, सरला पाटील, आदी सहभागी झाले होते.मोदींनी जनतेची माफी मागावी५० दिवस संपल्यानंतरही परिस्थिती काही बदललेली नाही. बँकांसमोरील रांगा अजूनही कायम आहेत. हातात रोख चलन नसल्याने सर्व स्तरांतील नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. मोदींच्या एका चुकीच्या निर्णयामुळे जगभर भारताचे हसू झाले आहे. डॉलरच्या तुलनेत रुपयांचे निचांकी स्तरावर अवमूल्यन झाले आहे. त्यामुळे मोदींनी आपल्या फसलेल्या निर्णयाची जबाबदारी स्वीकारून देशाची माफी मागावी, अशी मागणी कॉँग्रेसने केली आहे.आंदोलकांना अटक व सुटकाजिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुमारे अर्धा तास ठिय्या आंदोलन केल्यानंतर आ. सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी सैनी यांना निवेदन सादर केले. त्यानंतर आमदार पाटील यांच्यासह ३५ हून अधिक कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक करून अलंकार हॉल येथे नेण्यात आले. या ठिकाणी सर्व आंदोलकांची सुटका करण्यात आली.