शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

‘पाण्या’वरून काँग्रेसमध्ये फूट

By admin | Updated: August 20, 2015 23:11 IST

महापालिका महासभेत प्रचंड गदारोळ : प्रायोगिक तत्त्वावर सहा प्रभागांसाठी एजन्सी

सांगली : महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या खासगीकरणावरून गुरुवारी महासभेत प्रचंड गदारोळ उडाला. राष्ट्रवादी काँग्रेस, स्वाभिमानी आघाडीसह काँग्रेसमधील आ. पतंगराव कदम गटाने या ठरावाला कडाडून विरोध करीत मतदानाची मागणी केली; पण विरोधकांची मागणी फेटाळत महापौर विवेक कांबळे यांनी सांगली, मिरज व कुपवाड या तीन शहरांतील सहा प्रभागांत प्रायोगिक तत्त्वावर एजन्सी नियुक्त करण्यास मंजुरी दिली. महापौरांच्या आदेशानंतर राष्ट्रवादीच्या सर्व सदस्यांनी व्यासपीठासमोर गर्दी करून निषेधाच्या घोषणा दिल्या. या विषयावरून काँग्रेसमधील मदन पाटील व पतंगराव कदम गटांत संघर्षाची ठिणगी पडल्याचे स्पष्ट झाले.महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडील मीटर बसविणे, बिलांचे फोटो काढणे, बिले करून त्याचे वितरण व वसुली खासगी एजन्सीमार्फत करण्याचा विषय अजेंड्यावर घेण्यात आला होता. गेले चार दिवस या विषयावरून शहरातील वातावरण चांगलेच तापले होते. गुरुवारी महासभेत या विषयावर सत्ताधारी विरुद्ध विरोधकांत जुंपली. राष्ट्रवादीचे विरोधी पक्षनेते दिग्विजय सूर्यवंशी, शेडजी मोहिते, विष्णू माने, मैनुद्दीन बागवान, संजय बजाज यांनी ठरावाला विरोध केला. एजन्सी नियुक्त केल्याने नागरिकांना त्रास होणार असून, हा विषय लोकहिताविरोधात असल्याची भूमिका मांडली. तीन शहरांत महापालिका मुबलक पाणी देऊ शकत नाही. त्यासाठी मीटर कसे बसवायचे? बोगस कनेक्शनमधून प्रशासनाला हप्ते सुरू आहेत. एजन्सीला जगविण्यासाठी मीटर बदलण्याची टूम काढली आहे. पाणीपुरवठा विभाग तोट्यातून नफ्यात आणण्यासाठी सक्षम अधिकाऱ्यासोबतच कर्मचारी भरती करावी, अशी मागणी त्यांनी केली. स्वाभिमानी आघाडीचे गौतम पवार म्हणाले की, विषयपत्रात ठेकेदाराचे नाव घालून आणले असून, ही कंपनी आयुक्तांची जावई आहे का? त्यावर मतदान घ्यावे. भाजपचे युवराज बावडेकर यांनी पाणीपुरवठा कर्मचाऱ्यांवर अविश्वास दाखविल्याचा प्रकार असून, हा विषय स्थगित ठेवण्याची मागणी केली. सत्ताधारी गटाकडून गटनेते किशोर जामदार, राजेश नाईक, संतोष पाटील, हारुण शिकलगार, अनारकली कुरणे, प्रशांत पाटील-मजलेकर यांनी बाजू मांडली. नाईक म्हणाले की, महाआघाडीनेच शासनाला शंभर टक्के वसुली व मीटर बसविण्याची हमी दिली आहे. हा ठराव खासगीकरणाचा नसून, केवळ उत्पन्न वाढीचे एक पाऊल आहे. गटनेते जामदार यांनी पाणीपुरवठा विभागाचे खासगीकरण केले जाणार नसल्याचे स्पष्ट करीत सांगली, मिरज व कुपवाड या तीन शहरांतील प्रत्येकी दोन अशा सहा प्रभागांत प्रायोगिक तत्त्वावर एजन्सी नियुक्त करण्याची मागणी केली. महापौर विवेक कांबळे यांनी सहा प्रभागांत एजन्सी नियुक्तीला मान्यता दिली. यानंतर गोंधळाला सुरुवात झाली. राष्ट्रवादी, स्वाभिमानीसह काँग्रेसमधील पतंगराव कदम गटाच्या अकरा नगरसेवकांनी ठरावाविरोधात पत्र दिले. विरोधकांनी मतदानाची मागणीही लावून धरली. त्यासाठी सर्वच विरोधक महापौरांच्या आसनासमोर जमा होऊन घोषणाबाजी करू लागले; पण विरोधकांना न जुमानता महापौरांनी विषय मंजूर केला. त्यानंतर अजेंड्यावरील इतर विषयही गोंधळातच मंजूर झाले. (प्रतिनिधी)कोण काय म्हणाले...आम्ही पाणीपुरवठा विभागाचे खासगीकरण केलेले नाही. केवळ या विभागाची काही कामे एजन्सीमार्फत करण्याचा ठराव केला आहे. नदीतून पाणी उचलण्यापासून ते नागरिकांच्या घरापर्यंत पाणी पोहोचविण्याची जबाबदारी पालिकेचीच राहील. त्यात जाहीर निविदा काढून एजन्सी नियुक्त केली जाणार आहे. महाआघाडीच्या काळातच शंभर टक्के मीटर व वसुलीची हमी शंभर रुपयांच्या मुद्रांकावर दिली आहे. आता अमृत योजनेत शहराचा समावेश झाला असून, शासनाच्या विविध योजनांचा निधी मिळण्यासाठी ही कार्यवाही करावीच लागणार आहे. - किशोर जामदार, गटनेते, काँग्रेससभागृहात सत्ताधारी अल्पमतात होते. काँग्रेसमधीलच १० ते ११ नगरसेवकांचा या ठरावाला विरोध होता. त्यासाठी त्यांनी मतदान घेतले नाही. ठेकेदारांकडून अडीच हजारांचे मीटर घ्यावे लागणार आहे. जुन्या मीटरचे काय करणार?, ठेकेदाराला किती पैसे देणार?, यावर सभेत चर्चाच झालेली नाही. ठेकेदार नियुक्तीने दोन ते तीन कोटींचे उत्पन्न वाढणार आहे. तेच पैसे ठेकेदाराला दिले जाणार असतील, तर एजन्सीची गरजच काय? या ठरावाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस जनआंदोलन उभे करणार.- दिग्विजय सूर्यवंशी, संजय बजाज, राष्ट्रवादी काँग्रेसमहापौरांनी सभागृहात लोकशाहीचा खून केला आहे. या ठरावाला बहुतांश सदस्यांचा विरोध होता. तरीही त्यांनी मतदान घेतलेले नाही. यापुढे आमचा गट पालिकेतील गैरकारभाराविरोधात आवाज उठविणार आहे. - अतहर नायकवडी, काँग्रेस (कदम गट)काय आहे ठराव...1मीटर बदलणे, सर्वेक्षण करणे, बिलाचे छायाचित्र काढणे, बिलिंग व त्यांचे वाटप, बिलांची वसुली, आदी कामांचा ठेका देण्यास मंजुरी.2सांगली, मिरज व कुपवाड या तीन शहरांतील प्रत्येकी दोन अशा सहा प्रभागांसाठी एजन्सीची नियुक्ती3५० टक्क्यांपेक्षा कमी वसुली असलेल्या व ७० टक्क्यांपेक्षा जादा पाणीपुरवठा होत असलेल्या प्रभागांतच प्रयोग4पाणीपुरवठ्याचे दर ठरविण्याचा अधिकार महापालिकेकडेच!5तीन महिन्यांत पालिकेच्या उत्पन्नात वाढ न झाल्यास एजन्सीबाबत फेरविचार होणार6ठेकेदारांकडे कोणतेही आर्थिक व्यवहार नाहीतकदम गटाचा सवतासुभापाणीपुरवठा खासगीकरणावरून पतंगराव कदम गटाने महासभेत सवतासुभा मांडला होता. कदम गटाच्या अकरा नगरसेवकांसह सुनीता पाटील या काँग्रेसच्या नगरसेविकेने ठरावाविरोधात महापौरांकडे पत्र दिले. राष्ट्रवादी कॉँग्रेस व स्वाभिमानीनेही ठरावाला विरोध केला. विरोधकांनी विरोधाचे पत्र देऊनही त्याची पोहोच त्यांना मिळालेली नव्हती.